


अमळनेर तालुका दुष्काळ घोषित करा ……..
पदाधिकाऱ्यांचे आगळे वेगळे आंदोलन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील शेतकरी शेतात अंगावर कपडे न घालता काबाड कष्ट करतो ही जान राज्य सरकारला नाही मंत्री – संत्री यांना का नाही? अरे 49% हुन कमी नजर आणेवारी असताना अमळनेर तालुका दुष्काळ घोषित नाही. आता पुढील महिन्यात शासनाची अंतिम नजर आनेवारी होणार ती तर 40% पेक्षा कमी येणार ह्यात शंका नाही मग तालुका दुष्काळग्रस्त का घोषित नाही?शेतकऱ्यांनची दिवाळी अंधारात जाणार त्यामुळे दिवाळी अगोदर दुष्काळग्रस्त तालुका घोषित करा ही मुख्य मागणी साठी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सह यांनी रेस्ट हाऊस समोर समोर आगळे वेगळे आंदोलन करत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन दिले…
शासनाने अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास पुढे भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा काँग्रेस पक्षाचे डॉ अनिल शिंदे, शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचीन पाटील,शहराध्यक्ष श्याम पाटील, उद्धव ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख अनंत निकम, काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेश प्रमुख तिलोत्तमा पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,अर्बन बँकेचे संचालक प्रविण जैन , शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, धनगर दला, सचिन वाघ, रोहिदास पाटील, मनोहर पाटील, डॉक्टर किरण पाटील, शेख जामीर ,अनिल पाटील ,सुभाष पाटील ,मधुकर पाटील, दीपक शिसोदे, लोटन पाटील ,अरुण पाटील, राकेश देशमुख,माजी जिप सदस्य शांताराम पाटील, अनिरुद्ध शिसोदे व पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.