



अशोक बिऱ्हाडे लिखित
डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून विमलकीर्ती प्रकाशनाच्या पुढाकाराने साकारलेले निवृत्त शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र या पुस्तकाचे प्रकाशन युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा अशोक पवार आणि शरद खैरनार यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी महाविद्यालयाचे नियतकालिक पालखी या ग्रंथाचेही प्रकाशन केले.
कोरोना निर्मित लॉकडाउन आणि सेवानिवृत्त या कारणाने अधिक वाचणं करण्याची संधी मिळाली त्याचा सदुपयोग करीत ऍड बी सी कांबळे आणि चां भ खैरमोडेंच्या ग्रंथांनी वाचनाची भूक भागवली, मात्र मी लिहिलेले पुस्तक नववाचकास बाबासाहेब समजून घेण्यासाठी ची पहिली पायरी आहे या नंतर खूप वाचावं लागेल तेव्हा बाबासाहेब आंबेडकर पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो असे प्रतिपादन लेखक अशोक बिऱ्हाडे यांनी केले.
पुस्तक बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ठळक घटनांचा उल्लेख करीत त्यांनी आपल्या ६६ वय वर्षेपर्यंत सुमारे ४० वर्ष अहोरात्र मेहनत करून या देशातील सर्व उपेक्षित वर्गांना प्रमुख प्रवाहात आणून सोडलं. देशातलं जातीच भूत गाडण्यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले,भाक्रा नांगल आणि दामोदर व्हॅली सारख्या महाप्रचंड प्रकल्पांच्या निर्मितीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिंहाचा वाटा आहे. नदी जोड प्रकल्पाची संकल्पनाही त्यांचीच आहे.आजच्या नवीन भारत त्यांच्या विचारांवर उभा आहे असेही ते म्हणाले.
प्रा अशोक पवार यांनी याप्रसंगी पुढील वर्षा पासून २५ आदर्श विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव केला जाईल अशी घोषणा केली. येत्या २६ नोव्हेंबर पासून संविधानावर लेखन/स्पर्धा घेण्यात येईल आणि त्याचा सर्व खर्च आणि व्यवस्थापनाची जबाबदारी युवा कल्याण प्रतिष्ठान ची राहील असे जाहीर केले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी डॉ जगदीश सोनवणे होते, प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष सुभाषदादादा भांडारकर, संदीप घोरपडे,,अरुण सोनटक्के, अजय भामरे,प्रा डॉ लीलाधर पाटील, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, पत्रकार ईश्वर महाजन,अरुण बापू देशमुख, शरद खैरनार, प्रज्ञा खैरनार,रत्नप्रभा बिऱ्हाडे,इत्यादी मान्यवर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थी सायली महाले आणि राहुल माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा भरत खंडागळे यांनी सदरच्या कार्यक्रमाची आणि महाविद्यालयाची भूमिका मांडली. प्रा विजयकुमार वाघमारे,डॉ अनिता खेडकर, डॉ अस्मिता, प्रा चव्हाण सर, यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रकाशन समारंभासाठी युवा कल्याण प्रतिष्ठानने पुढाकार घेतला त्यास पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास कक्ष,राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सहकार्य केले.
यावेळी सुंदर फलक लेखन करणाऱ्या सोमनाथ पाडवी या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.सुत्रसंचलन आणि आभार गौतम मोरे यांनी व्यक्त केले.
चौकट
निवृत्त पोलीस अधिकारी एम एस बैसाने साहेब यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेला बिऱ्हाडे कुटुंबातील सदस्यांचा सरळ संबंध आणि इतर आठवणींना उजाळा दिला.