
माझं शिक्षण समाजाच्या परिवर्तनासाठी होणं हा महापुरुषांचा विचार पुढे नेण्याची गरज.-मुकुंद सपकाळे
वंचित उपेक्षित घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची शिक्षित घटकाची जबाबदारी असून समाजाच्या विकासासाठी परिवर्तनासाठी आवश्यक असल्याचा महापुरुषांचा विचार पुढे नेण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवसानिमित्त भीम रमाई प्रतिष्ठान तर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले समाज विद्रोही झाला पाहिजे स्त्रियांनी आपल्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने न्याय देत रूढी परंपरांना त्याज्य करत एक नवा इतिहास घडवण्याची गरज असल्याचे मत सुद्धा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे होत्या त्या म्हणाल्या आजचा काळ हा स्त्रियांनी शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचा असून अंधश्रद्धा रूढी परंपरा वादाला तिलांजली देत भारतीय लोकशाहीला भक्कम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले याप्रसंगी बोरखेडा ग्रामपंचायत निर्वाचित सदस्य प्रा. पूजा साळवे चांदसर ग्रामपंचायत सदस्य बेबी सोनवणे यांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पाटील यांनी केले. कार्यक्रमास संगीता माळी, सचिन धांडे, विजयकुमार मौर्य अनिल सुरडकर सुनील सोनवणे डी. एम.अडकमोल , प्रा. डॉक्टर सत्यजित साळवे आर. टी. सोनवणे, विजय लुल्हे ,संजय ठाकूर, प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर,बळीराम साळवे मान्यवर उपस्थित होते