भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर तलाठी संघाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
आरोपींना अटक झाली नाही तर अमळनेर सह जळगांव जिल्हा काम बंद आंदोलन करेल प्रशासनाला दिले निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
दि.१९ नोव्हेंबर रोजी दहिवद गावाजवळ तलाठी पथकावर
झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत तलाठी संघा तर्फे उपविभागीय अधिकारी यांना
निवेदन देण्यात आले.
निवेदनात अमळनेर तहसिल कार्यालयातील अवैध गौण खनिज प्रतिबंधक पथकआपले कर्तव्य बजावित असतांना तालुक्यातील दहिवद गावाजवळ सकाळी साडे सहाच्या सुमारास पथकावर पातोंडा परिसरातील भुषण ऊर्फ सोनू राजेंद्र देवरे व त्यांच्या सोबतअसलेल्या इतर तीन आरोपींनी तलाठी पथकावर प्राण घातक हल्ला केला त्यात पथकातील तलाठी संदीप शिंदे,तलाठी प्रकाश महाजन यांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली.या भ्याड हल्ल्याचा अमळनेर तालुका तलाठी संघ जाहीर निषेध करित आहे सदर आरोपींवर अमळनेर पोलीस स्टेशन येथे कलम ३०७ व इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे तरी सदर गुन्हयातील मुख्य आरोपींना २४ तासापेक्षा जास्त कालावधी झाला असून देखील अटक झालेली नाही तरी सदर गुन्हयातील आरोपींना जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत अमळनेर तालुकातलाठी संघातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी हे काम बंद आंदोलन पुकारत आहेत. तसेच जर आरोपींना अटक झाली नाही तर अमळनेर उपविभाग व नंतर संपूर्ण जळगांव जिल्हा काम बंद आंदोलन पुकारेल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आंदोलनामुळे होण्याऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करित आहोत. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देते वेळी कार्याध्यक्ष एस.ए. कुलकर्णी,अध्यक्ष जी. आर. महाजन,जिल्हा पदाधिकारी पी एस सोनवणे,उपाध्यक्ष वाल्मिक पाटील,सहचिटणीस पी.पी.चव्हाण,संघटक व्ही.पी.पाटील,ऑडीटर वाय.आर.पाटील व अमळनेर तालुका तलाठी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.