
कथा प्रेमाची।। व्यथा पंगुत्वाची।।
जन्मतःच दुःखाने माझ्या आयुष्यात तळ ठोकला. पंगुत्वाच्या नामान मी आतळ्यासह कातळयाकडून हिनवला गेला. असंख्य जख्मा काळजाला घेवून मी जगत राहिलो ..जख्माच्या या जमिनीवर कोणी प्रेमाचा वर्षाव करेल या पुसटस्या आशेने..
कोणी तरी कधी तरी…!!!आपूलकीन गोजारेल, कवटाळून जवळ घेईल,कुरवाळेल…..परंतु संवेदनशून्य स्त्रीपुरुष प्रणाली युक्त समाज माझ्या भावना समजूच शकला नाही….वय वाढत गेल,तस निसर्गा तेने भावनिक गुंता वाढवला सर्वसामान्य भावना जोरधरू लागल्या.. मोठ्या आशेने ,आतुरतेने मी त्यांच्या पुरततेसाठी आशावादी झालो.सगळ्यांना काळजाचाच तुकडा मानायला लागलो..
पण सगळ्यांनी फक्त पंगुत्व च पाहील. शब्द वाचले, भावना कधीच नाही कळली. भावनांचा वाढतच गेला गुंता, ज्यांना ही जीव लावला , तेच स्वार्थापुरतेच ..... छळतायत आठवणीनी आता
“तरण्यावयात कोणी तरी प्रेमाच गूंजण कराव” अशी निसर्गदत्त हाक माझ्या ही ह्दयाच्या कोपऱ्यात निनाद ली…… आपल्या वर ही कोणी तरी मराव……… आपल्या शब्दाला लाडाने…झेलाव…..त्याच्या दुखात सहभागी कराव…..अधिकारान…. रात
रत्री बोलाव….न समजणार टायपिंग… का… आहे…..ते …..कळाव!!!!
आपणहून या दुखाच्या डोंगरात असणारी प्रेम सरीता प्रवाहीत करावी……मात्र जो तो माझ्याशी फायद्या पुरताच राहीला.................
काम संपताच पंगू विसरला गेला……..
व्हा विधात्या तुझा न्याय
आमच्या नशिबात ईश्क मोहब्बत प्यार..
लिहायच विसरलास काय?????
कधी कधी काही तात्पुरत्या मिळालेल्या गुलाबी मोरपंखी आठवणी मनाच्या गाभाऱ्यात शितलता पोहचवतात जसे निशेचा स्पर्श चंद्रास शीतल प्रकाशाश कारणीभूत ठरतो अगदीच तस्स, परंतु अचानक तिमिरमय आयुला प्रेमाचा मिळालेला सहवास तिळमात्र कमी होऊ नये अस वाटत…. म्हणुनच उतावीळपणा व सारख ते दुरावण्याच्या भीतीने … अधीरपणा वागण्या बोलण्यात येणे स्वभाविक प्रेमाच्या पावित्र्य च ते….प्रतिकच!!!!!! मी करून घेतो बोलून मन मोकळ कोणी करो किती ही भावनिकछळ
मानवी मनाच्या साऱ्या भावना अंध अपंगाना ही लागू निसर्गतः परंतु समाज हे समजून घेत नाही. अपंगाना समाजिक दया मिळते.,पण खऱ्याखुऱ्या प्रेम ला ते अजीवन तरसतात ते त्यांना कधीचमिळत नाही हे त्रिकालभाधि सत्य नाकारता येणार नाही.
मानवीय जगण्याला प्रेम अत्यावश्कच आहे मग दयामाया हेच प्रेमाचे रूप तर मग यांच्याकडे तरण्या बालांचा तुस्ड तिरका तिरसकारयुक्त डोळा का??
स्त्री च मन प्रेमाचा सागर
रानाच पाखरु प्रेमानं करते जवळ
पंगुत्वाच्या साठी तिरस्कार मात्र
जाते कुठे तिची माया प्रेम कळवळ
पंगु ची जग करी अवहेलना
कोणी त्याशी जीव लावीना
कळत सार पण क्रुतीत का बर उतरिना
ठगवती सारे काय म्हणावे या जना??
एकीकडे देव एका पायाने लंगडा
भारतीय नर नारीचा काना डोळा
भारतीय संस्कृती चा अपंगा प्रती
तोकडा का इतका जिव्हाळा???सगळ सत्य
आज ही दिव्यांग नाव देवून सरकार सोबत करीतच आहे.समाजातील लोकांनी दिव्यांगाना साथ दिली तरच त्यांच दुःख कमी होईल.त्यांना वैवाहिक जीवन वाढवून देण सामाजिक न्याय होईल
एका अपंग मुलांचे मनोगत
नमस्कार मी एक अपंग बोलतोय..नव्हे….
विनंती..करतोय .. मीअपंग असल्यामुळे मला माहीती आहे .मी आपल्या(मुलींच्या आजच्या) लायकीचा नाही शारीरीक रित्या माझ्यावर कोणतीच मुलगी प्रेम करणार नाही अन् मी कसा प्रपोज करेल, मुलीचा हात मागेल ?सात जन्माची साथ कोणत्या तोंडाने मागेल. ? कोणी दूखाला जवळ करुन आयुष्य भर जख्म का करून घ्यावी…. परंतु भावना तर मला ही निसर्ग दत्तच ना ??त्यात माझा दोष तो काय हो??
दोष नसताना मला शिक्षा मिळालेली आहे. मी …..ही स्वप्न पाहिले आहे.पत्नीचे..औकात नसताना कारण देवाशप्पथ त
मला माहीती आहे माझ्यासाठी कोणीतरी असेलच येथे…ज्यांना शरीर नाही प्रेम कळेल.. अपंगांसाठी कोणी तरी खऱ्याखुऱ्या अर्थाने साथ देईल..उभ्या जगाला सांगेल.”यांना ही भावना आहेत..त्यांना खरी साथीदार ची आवश्यकता आहे ते दुःखी आहेत सूख आपण देवू या..असं ही जीवन दुःख चेच नाव …दुसरे..
आपण जर अपंगाशी लग्न केलं तर जीवनाचं सार्थक होईल…बाकी आपण विचार करा लोक तर पूरुष प्रधान संस्कृती त स्त्रीशोषण करीतातच ….अपंग मात्र देवीमानेल…खूल आकाश अन् खरं सांगायचं.तर खरं स्वातंत्र देईल ..सर्वस्वी आपलाच राहील..मरस्तव आपल्या ऋणात राहील …. पुण्यकर्म करा
पुण्यकर्म करा
वरा अपंग वरा
तुम्ही दैवी रूप
दुःख अपंगा पदरी खूप
द्या साथ
हातात हात
तो जगेल
तुमचं नाव निघेल
कीर्ती ही
तुमची चंद्र सुंऱ्या परी
दुःख दूर करणं
सौभाग्य अखंड तीच पोरं बिचारी
माझ्याही वाळवंटी आयुष्य त सूखाची सरीता यावी जी माझी प्रियंका व्हावी माझी ही आराधन सामाजिक दैवींनी ऐकूण मला कृता कृत करावे. माझी अपेक्षा आहे की मला आता जास्त प्रतिक्षा करायला लावू नये. माझी मनीषा लवकरात लवकर पुर्ण व्हावी..या पंगूची शेवटची आशा.. देवांनी पुर्ण करावी.. तीने स्वप्नना त येऊन मला म्हणावं….
……………………….तू माझा राजा
………………………………….मी तुझीच राणी
……………………….तुझ्या डोळ्यात
………………….येऊ देणार नाही पाणी
तू अपंग जरी असला
तरी तू मला हवा
तूझ्या च सह
माझा संसार फूलावा
दुःखाच्या उन्हात
होईल रे मी सावली
पवित्र प्रेमाची
काहानी आपली
स्त्री शोषणाचा
नाही तू पूजक
तू बोलतो रे
खरं रोखठोक
मला तूच देशील
मोकळं आकाश
खरं स्वातंत्र्य
जगणं मनमोकळ झकास
तू दिव्यांग…….
तुझी लाभो संग
प्रेमाचे उधळू
रे रंग…….
तीने माझ्या मनातील भावना समजून घ्याव्या.मी जीव देईल पण तिचे उपकारक विसरणार नाही.खरच ती फक्त माझी असेल जीचा जगातील पहीला राजकुमार अपंग असेल. आमच्या प्रेमाला स्वार्थाचा पुसटशी ही किनार नसेल….
………..तिला मी जगातील सर्व सुख देण्याचा प्रयत्न करेल……ती जरी अपंग असली तरी.. विधवा असली तरी………
……………..कारण
आपण कोणावर प्रेम करतो
हे महत्त्वाचे नसते
आपल्या वर प्रेम करणं
महत्त्वाचं असत
प्रकाश पाटील
स्वलेखन