
महान विद्वानाची सावली झाली माता रमाई…
माणसाने किती झिजाव आणि किती सहन कराव याला काही मर्यादा असते. परंतु आपल्या जीवाचा काहीही विचार न करता डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यासाठी स्वतः दुःखाच्या पायवाटेने जाऊन उज्वल भारताची घडी बसवणाऱ्या विद्वानाची सावली झाली रमाई !!ती काहीही शिकलेली नव्हती. डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईला घरीच शिकवले. रमाईला त्यामुळे चांगले वाजता आले. माता रमाईने जगाच्या उद्धारासाठी विचार मांडणाऱ्या महापुरुषाची साथ दिली गोवऱ्या थापून, मिळेल ते काम करून तिने घर सांभाळले .असंख्य संकटे तिला आली परंतु तिने दुःखाची झळ बाबासाहेबांना पोहोचू दिली नाही. बाबासाहेबांना पैशासाठी दग दग केली नाही .एका खेड्यातून आलेली माता रमाई शहराच्या झोपडपट्टीत राहून जीवन जगत राहिली. आपल्या सख्यासाठी पायावर उभी राहिली. असंख्य उपकार आहेत या माऊलीची ते आम्हाला फेडता येणार नाही .मुलं वारली ,संकट आली रमाबाई घाबरले नाही .आपला साहेब हे सामान्य काम करीत नाहीत ते असामान्य काम करत आहेत याची जाणीव रमाईला झाली होती. मुलगा वारल्यानंतर रमाईकडे त्याच्या दफनविधीसाठी पैसे नव्हते बाबासाहेब बाहेर दौऱ्यावर होते ते आले .रमाईने बाबासाहेबांना पैशाची मागणी केली .परंतु बाबासाहेबांचे स्तब्ध राहणे पाहून रमा समजले बाबांच्या खिशात दमडी नाही.आपल्या नजरेने ती बाबासाहेबांना ओळखत होती. अशावेळी स्वतःच्या लुगड्याचा पदर फाडून कफन करणारी रमाई माता दुःखाला फुलासारखे स्वीकारणारी बाबासाहेबांची अर्धांगिनी होती. माता रमाईने गर्व कधी केला नाही की मी एका विद्वानाची पत्नी आहे. जेव्हा बाबासाहेब विदेशातून परत आले.. बंदरावर माता रमाई आलेली होती परंतु कोणती ही गर्दी न करता रमाई मागे उभी राहिली .बाबासाहेबांनी रमाईला पुढे बोलवलं आणि म्हटलं रमाई तू मागे का राहिलीस तेव्हा रमाई म्हणाली साहेब मी तुमच्या सदैव बरोबर आहे ..तुम्हाला भेटणाऱ्या लोकांना संधी मिळावी म्हणून मी मागेच थांबले आहे .रमाई संसार करण्यासाठी निर्माण झालेली नव्हती ती एका विचारवंताची ढाल होती. बाबासाहेब व रमाई यांच्या खूप आत्मीयतेचे संबंध होते. बाबासाहेब व रमाई एकमेकांना त्यांच्या नजरेने ओळखून घ्यायचे की त्यांची स्थिती कशी आहे .माता रमाई आयुष्यभर आमच्यासाठी झटत राहिली आणि देशाला समतेची दिशा देणाऱ्या बाबासाहेबांना सहयोग करीत राहिली. आज आपण बघतो एखाद्या स्त्रीचा पती जर घराकडे लक्ष देत नसेल व समाजासाठी देशासाठी वेळ देत असेल तर त्या स्त्रीला ते सहन होत नाही .परंतु रमाईने स्वतःच्या सुखाचे बलिदान केलेले होते. साऱ्या महाराष्ट्राची दिनदुबळ्याची, वंचितांची, गरिबांची आई बनली तिने दिलेल्या साथीने बाबासाहेबांना बिनधास्तपणे देशसेवेसाठी काम करता आलं ..जगाचं दुःख पाहता आलं ...देशाला उज्वल रूप देता आलं ...एकात्मतेची गुढी उभारता आली.. मनुवाद्यांची गुलामगिरी झुगारून देता आली.. हे सार माता रमाईच्या दिलेल्या योगदानामुळे जाता आलं ..ती झिजत राहिली न काही कुरबुर करता... आज रमाईची जयंती त्यानिमित्ताने तिला विनम्र अभिवादन
एस.एच. भवरे
पत्रकार