नांदेडच्या वाळू लिलावावर गावकऱ्यांचे तीव्र आक्षेप
पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, ठेक्यावर पुनर्विचार करण्याची शासनाकडे मागणी

जळगांव प्रतिनिधी
वैयक्तिक यक्तिक स्वार्थासाठी काही मोजक्या लोकांनी भविष्यातील पिढ्यांचे नुकसान करू नये. राजकारणी दबाव आणून लिलाव साध्य करण्याचा प्रयत्न टाळावा व सारासार जनतेचा विचार करावा अशी कळकळीची विनंती नागरिक करताना दिसत आहेत. नांदेड तालुका धरणगाव येथील वाळू च्या घाटाच्या लिलाव बाबत गावकऱ्यांनी तसेच पर्यावरणवादी लोकांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. सदर प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही तसेच नांदेड येथील नदीच्या पात्रातून या आधीच बेसुमार अवैध उत्खनन झालेले आहे.. आणि परत सदरील ठेका देऊन परत पर्यावरणाचे व त्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे मुबलक नुकसान भविष्यात जनतेला भोगावे लागेल, त्या कारणाने सदर लिलाव तात्काळ रद्द करण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
सदर घाटाची पुन्हा विभागीय कार्यालय तसेच आदरणीय कोर्ट मार्फत पर्यावरण शास्त्रज्ञ तसेच भूजल शास्त्रज्ञ यांच्याकडून तपासणी अहवाल घ्यावा व त्या नुसार लिलाव विचारात घ्यावा अशी महत्वाची व वाजवी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. तापी नदीचा नांदेड येथील घाट हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील आहे, यावर आता बरेच लोकसंख्येचे पिण्याचे पाणी सुद्धा जवळील पात्रावर अवलंबून आहे. एवढे संवेदनशील प्रकार असताना वाळूचा मनमानी पद्धतीने करण्यात आलेला आहे अशी चर्चा आहे. वाळूचा लिलाव ची ऑर्डर निघण्याच्या आधीच गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून मनमानी ने जबरदस्ती रस्ते उकरून रस्ते बनवले गेले ज्याचे पंचनामे करण्यात आलेले नाही. वाळू लिलाव बाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेल्या ऑर्डर प्रमाणे अंमलबजावणी तर दूरच
आधीच धुडगूस घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप गावकरी लोकांनी केलेला आहे. त्यामुळे तात्काळ सदर पूर्ण कार्यपद्धती थांबवून फेर विचार करावा अशी मागणी जोर धरत आहे.
ठेका साठी नदी पात्राचा ताबा देण्या साठी अगदी आतातयीपणा चालू असल्याने ऑर्डर मध्ये लिहिल्याप्रमाणे सर्व अंमलबजावणी व्हावी यासाठी गावकरी मागणी करत होते. या मध्ये याआधी ज्या अधिकारी वर्गावर आधीच याच तापी नदी पात्रा मधून अवैध वाळू वाहण्यासाठी समन्वय केला असा आरोप होता तेच अधिकारी परत वाळू लिलावात ठेकेदार लोकं सोबत समन्वय साधून मनमानी करताना आढलून आल्याने सदर ठेका थांबवावा अशी विनंती, धरणगाव युवा सेना उपतालुका अध्यक्ष भरत सैदाणे, ठाकरे सेनेचे गिरीश चौधरी, तुषार अत्तरदे, ज्ञानेश्वर यांनी केली आहे.