प्राचीन काळापासून विदेशात हिंदी भाषेचे महात्म्य टिकून
जापानचे पद्मश्री तोमियो मिजोकामी यांचे प्रतिपादन
देशभरासह श्रीलंका, जापान, बेल्जियम, जर्मनी, मॉरीशस, उजबेकिस्थान इत्यादी देशातून नामवंत लेखक- संशोधकांची उपस्थिती

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात (स्वायत) दि.२४ व २५ फेब्रुवारी दरम्यान “विदेश में शिक्षा, साहित्य, व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी” हया विषयावर दोन दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) च्या आर्थिक सहकार्याने संपन्न होत असलेल्या व दोन दिवस चालणाऱ्या ह्या परिसंवादात देश-विदेशातून अनेक हिंदी विद्वान, प्राध्यापक, संशोधक आदि सहभागी झाले आहेत.
दि. २४ फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी उद्घाटनच्या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, उद्घाटक प्रा. सुनील कुलकर्णी (निदेशक, केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा, तथा केंद्रीय हिंदी निदेशालय, नई दिल्ली) बीजभाषक पद्मश्री प्रा. मिजोकामी तोमियो,(माजी प्राध्यापक ओसाका विश्वविद्यालय, जापान, शिकागो विश्वविद्यालय अमेरिका) डॉ. संजीता वर्मा, (काठमांडू, नेपाळ) डॉ. प्रमोद पाब्रेकर,(रूसा, मुंबई), डॉ. सूरज प्रकाश बडतिया,(जापान), अखमादजान कासिमोव (उजबेकिस्थान, अडेले हेंनिश टेम्भे (जर्मनी), डॉ.ब्रसिल नागॉडवितान (श्रीलंका), खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, उपाध्यक्षा माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडे, सीए. नीरज अग्रवाल यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन, सहचिटणीस डॉ धीरज वैष्णव, आयक्युएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, उपप्राचार्य कल्पना पाटील, डॉ. जयंत पटवर्धन, डॉ. विजय मांटे उपस्थित होते.
प्रारंभी हिंदी विभागातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. परिसंवादाच्या आयोजनासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन यांनी भूमिका मांडली. हिंदी विभाग प्रमुख डॉ. कुबेर कुमावत यांनी परिसंवादाविषयीचे प्रास्ताविक सादर केले. या वेळी त्यांनी हिंदी भाषेचे महत्व, परंपरा, लौकिक, विदेशातील विविध विद्यापीठातील सद्यस्थिती मांडली.
प्रा. सुनील कुलकर्णी यांनी उद्घाटकीय मनोगतात म्हटले की, “ हिंदी केवळ राष्ट्रभाषा नसून ती आता विश्वभाषा बनू पाहतेय. अलीकडे अनेक देशांमधील लोकांमध्ये हिंदी भाषेविषयी जिज्ञासा निर्माण होत आहे. भारतीय माणूस विदेशात व्यवसायानिमित्त गेल्यामुळे तिथेही हिंदी भाषा रुजविण्याचे काम केले आहे. म्हणून हिंदी ही राष्ट्रभाषा न राहता ती विश्वभाषा बनते आहे.” असे मत व्यक्त केले.
बीजभाषक पद्मश्री प्रा. मिजोकामी तोमियो यांनी जगातील विविध विद्यापीठातील कार्य, तिचा प्रचार, प्रसार, योगदान यावर भाष्य केले. शिवाय जापानी भाषा, हिंदी भाषा, इंग्रजी भाषा यांचा तौलनिक अभ्यास, अनुवाद, व्याकरण, शब्दवैभव, उच्चार, इत्यादिविषयी पीपीटीच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात मांडणी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषा आणि साहित्याच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यात डॉ. कुबेर कुमावत यांचे ‘प्रकारांतर से’ (डायरी), डॉ.नूतन व दीपक पांडेय यांचे ‘प्रवासी साहित्यकार : तेजेंद्र शर्मा’ (व्यक्तिकार्य) डॉ. शशिकांत सोनवणे यांचे ‘गर्दीशों के गणतंत्र में’ (काव्यसंग्रह) ह्या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच दीप्ती अग्रवाल यांच्या कवितेवर आधारित चित्रकला प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले.
पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. कल्पना पाटील व शशिकांत सोनवणे यांनी केले. तर आभार डॉ. शैलजा माहेश्वरी यांनी मानले.
पहिल्या सत्रात ‘विदेश में शिक्षा के क्षेत्र में हिंदी’ या विषयावर डॉ. नूतन पांडेय (मॉरीशस) यांच्या अध्यक्षतेखाली अडेले हेंन्नीश टेंभे (जर्मनी), डॉ वेदप्रकाश सिंह (ओसाका विश्ववविद्यालय, जापान), डॉ. राजकुमारी गौतम (बेल्जियम), डॉ. उर्मिला पाटील (नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव), सुधीर ओखदे (जळगाव आकाशवाणी) यांनी आपले शोधनिबंध सादर केले. या सत्राचे आभार डॉ. अनिता राजबंशी मानले.
दुसऱ्या सत्रात ‘विदेश में साहित्य के क्षेत्र में हिंदी’ पद्मश्री प्रा. तोमियो मिजोकामी (जापान) यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. संजीता वर्मा (काठमांडू, नेपाळ) डॉ.दीपक पांडेय (नवी दिल्ली), डॉ. नूतन पांडेय (मॉरीशस), दीप्ती अग्रवाल (दिल्ली) यांनी आपले शोधनिबंध सादर केले. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अनिता राजबंशी यांनी केले तर आभार डॉ. संजय महाजन यांनी मानले.
संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्या दि.२५ रोजी परिसंवादाचा समारोप होईल.