
डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात ‘शिवजयंती’ सोहळा उत्साहात संपन्न
दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे व शिवचरित्रावर आधारित विविध प्रसंगांचे सादरीकरण या दोन्ही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या मा. प्राचार्या डॉ. सुनिता बाजपाई, इतिहास विभागप्रमुख डॉ. सुषमा देशपांडे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुनंदा चक्रनारायण, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. प्रभाकर गायकवाड, स्पर्धेच्या परीक्षक प्रा. उषा जोशी आणि प्रा. कविश्री देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
तर दुसऱ्या सत्राची सुरवात शिवप्रतिमा पूजनाने झाली. व छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुषमा देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दरवर्षी इतिहास विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला . विद्यार्थ्यांनींच्या सर्वांगीन विकासासाठी दरवर्षी इतिहास विभागातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवजयंती निमित्त विविध स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांनींपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांची कामगिरी, त्यांचा पराक्रम, स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेले प्रयत्न पोहचावे व त्यातून विद्ययार्थनींनी प्रेरणा घ्यावी हा त्यामागे उद्देश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगांचे सादरीकरणात, पोवाडा, नृत्य, गायन याद्वारे अतिशय सुंदर प्रकारे शिवचरित्राचे दर्शन विद्यार्थिनींनी घडविले .
यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धा व शिवचरित्रावर आधारित प्रसंगांचे सादरीकरण स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाच्या मा.प्राचार्या डॉ. सुनिता बाजपाई यांनी इतिहास विभागाद्वारे अतिशय सुंदर प्रकारे शिवजयंतीचा कार्यक्रम घेण्यात आल्याबद्दल विभागाचे अभिनंदन केले . छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे सर्व विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून असे उपक्रम महाविद्यालयात आयोजित होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. उषा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. साक्षी धवळानपुरे हिने केले तर आभार कु. धनश्री जोशीने मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुषमा देशपांडे, प्रा. कविश्री देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता शिवगर्जना व राष्ट्रगीताने झाली.