• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली

Mar 2, 2024

Loading

दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली

शेतकरी नेते चिमणरावदादा पाटील यांचं निधन झालं, तेव्हाचे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांच्या मुशीत वाढलेले, चिमणरावदादा, शेतकरी आंदोलनासाठी आघाडीवर असतं. शेतकरी राजावरचा अन्याय झाला, तर तो त्यांना कधीच सहन होत नव्हता.

तालुक्याला आणि दहिवदला आंदोलन करण्याची एक संस्कृती चिमणरावदादा यांनी निर्माण केली.

दहिवदच्या स्टॅन्डवर बस अडवून रास्तारोको करणारे दादा, त्या पिढीला आजही आठवतात.
कर्जमुक्तीसाठी नागपूर अधिवेशनात मोर्चा नेणारे दादा, कर्जमुक्तीसाठी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिणारे दादा, नामांकित वृत्तपत्रांसाठी लेख लिहिणारे दादा…

चिमणदादा खूप लिहायचे, वाचायचे. दादा कविता करायचे, एकदा त्यांनी घरी नेऊन कविता ऐकवल्या होत्या, त्यात माझं घर गळकं अशी एक कविता होती. दादांच्या नंतरच्या कविता, लेख या गळक्या घराच्या पाण्यातच भिजून गेल्या.

दादा आणि त्यांच्या समोरील व्यक्तीच्या वयात ३० ते ४० वर्षांचं अंतर असलं तरी कोणत्या विषयावर बोलायचंय, सध्याचा ट्रेन्ड काय आहे, हे दादांना कळायचं हे विशेष.

चिमणदादा आणि गुलाबराव बापू यांचे राजकीय विचार वेगवेगळे होते. चिमणदादांनी आमदारकीची निवडणूकही लढवली होती.

दादांना जिथे पटायचं नाही तिथे ते सहज एका वाक्यात विषय संपवायचे, मंडळी ऐकत नाही. दादांनी वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत आंदोलनाची, भाषणाची, परखड लिहिण्याची तयारी ठेवली, दादा शेतीचे तेवढेच अभ्यासक होते.

दादांच्या चेहर्यावर कधीच म्हातारपणाचा थकवा दिसला नाही, दहिवदमध्ये असे पर्यंत तरी. दादा गेले असं वाटतंय दहिवदच्या विचारांची श्रीमंतीच गेली.

दादा शेतकरी कर्जमुक्तीची गुढी उभारत असतं, दादा जिथेही असतील तिथे अन्याय मुक्तीसाठी झटण्याच्या तयारीत असतील.

आदरणीय दादांना भावपुर्ण श्रध्दांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *