

शिक्षण आणि शाळा विद्यार्थ्यांच्या जीवन विकासाचा मार्ग आहे.
ना. गुलाबराव पाटील
शिक्षणाची वाट आपल्या जीवनासाठी आत्यंतिक महत्त्वाची असून ग्रामीण भागातल्या शाळा आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आपला दर्जा टिकवून असल्याचा सार्थ अभिमान जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला वाटतो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातला ज्ञानदान, ज्ञानप्राप्ती हा संवाद मोलाचा असल्याचे मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी व्यक्त केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गुलाबरावजी देवकर होते याप्रसंगी अमृत महोत्सवा निमित्त प्रकाशित केल्या गेलेल्या अरुण स्मरणिकेचे प्रकाशन ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तमजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. विचार मंचावर प्रमुख अतिथी आमदार सुरेश दामू भोळे, पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्था अध्यक्ष विलास यशवंत चौधरी, सचिव कमलाकर सावदेकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी बोलताना साहित्यिक उत्तम कांबळे यांनी शिक्षण हा माणसाला खरा चेहरा देत असतो आणि हा चेहरा निर्माण करणे सहजासहजी शक्य नसतं त्यासाठी शाळा आणि शिक्षक उत्तम असावे लागतात शिक्षणातून आपली प्रगती साधताना आपला विचार प्रगल्भ असावा लागतो आणि तोच प्रगल्भ विचार आपल्या देशाला मजबूत करत असतो आपल्या शिक्षकाप्रती आपल्या शाळेप्रती आपली कृतज्ञता आयुष्यभर बाळगणं म्हणजेच आपल्या जीवनाचं सार्थक होणं होय असं देखील मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केलं. माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. सुरेश भोळे, भालचंद्र पाटील यांनी याप्रसंगी समायोचित मनोगते व्यक्त केलीत. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माजी शिक्षक एम.डी. राणे, बँक ऑफ बडोदा व्यवस्थापक प्रफुल्ल कोल्हे, डॉ. राजेंद्र पाटील,श्रीमती रजुताई भोळे, उद्योजक प्रेमचंद भोळे, उद्योजक कुंदन भोळे यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट जनरल जगदीश बळीराम चौधरी यांनी शाळेचे माजी विद्यार्थी या नात्याने प्रातिनिधिक स्वरूपात शाळेला रणगाड्याची प्रतिकृती त्यांचे प्रतिनिधी जगदीश परदेशी यांनी भेट दिली. किशोर रामदास चौधरी, गोपाळ भागवत भोळे, पंडित सखाराम चौधरी, वसंत रामा चिरमाडे, सुनील भास्कर चौधरी, किशोर नारायण कोल्हे, दिलीप महाजन, दुर्गादास भोळे, प्रमोद नामदेव आटाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच सरस्वती पूजन, महाराष्ट्र गीताने तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्य गीताने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी तर अहवाल वाचन भावना चौधरी, अतिथी परिचय शुभांगीनी महाजन यांनी करून दिला सूत्रसंचालन एस. के. राणेराजपूत के.बी. तायडे, वृषाली चौधरी, संतोष कचरे यांनी केले आभार पर्यवेक्षक एल.जे. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास निखिल चौधरी, विपुल काळे, तुषार महाजन, संजय भोळे, दिलीप पाटील, वर्षा भोळे, रवी देशमुख, पल्लवी देशमुख, अरुण माळी, आर.सी. महाजन,का.दा.भोळे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या कोल्हे, माजी मुख्याध्यापक, शिक्षक,पालक व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.