• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली पण तुमच्या आमच्या डोक्यातली मनुस्मृती अजून जळाली नाही !

Mar 12, 2024

Loading

बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली पण तुमच्या आमच्या डोक्यातली मनुस्मृती अजून जळाली नाही !

ॲड.वैशालीताई डोळस
(सामाजिक कार्यकर्त्या,छत्रपती संभाजीनगर यांचे प्रतिपादन

जळगांव विशेष प्रतिनिधी(विजय लुल्हे)
सत्यशोधक महिला संघ आयोजित पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशन नायगाव (ता.खंडाळा,जि.सातारा ) येथे रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी जि.प.प्राथमिक शाळे समोरील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभामंडपात प्रचंड उत्साहात संपन्न झाले.’ प्राचीन भारताची क्रांतिकारी महिला कालांतराने गुलाम का झाली ? ‘ या गटचर्चा सत्राच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना ॲड.डोळस बोलत होत्या.गटचर्चेत विशेष निमंत्रित माजी नगराध्यक्ष निता नेवसे ( माजी नगराध्यक्षा, फलटण ),सविता फाळके (माजी सभापती,न.प.सातारा ),सुनंदा जाधव (अध्यक्षा,सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समिती आदर्की, फलटण ),संगीता सूर्यवंशी ( आगारप्रमुख,रा.प.छत्रपती संभाजी नगर ), गायत्री इरले (जिल्हाध्यक्षा,अ.भा.माळी महासंघ,गोंदिया ),लता खाडे ( अध्यक्षा,सावित्री ज्योती वैश्विक विचारपीठ ), सुनिता माळी ( संचालिका,राष्ट्रीय श्रमिक सहकारी संघ मर्यादित दिल्ली, धुळे ),वैष्णवी राऊत ( श्री.संत शिरोमणी सावता माळी समाज मंडळ,महाड ),संगीता वसमाने (अध्यक्षा,मातंग समाज,शिरोळ ) यांनी आपले समयोचित विचार मांडले.गट चर्चेचे सूत्रसंचालन प्रतिभा महाजन प्रास्ताविक रिंपल जाधव आणि आभार कुमारी श्वेता शिंदे यांनी मानले. सकाळी ९ वाजता नायगावच्या सरपंच तथा स्वागत समिती अध्यक्षा साधना ताई नेवसे यांच्या हस्ते सत्यशोधक समाज महिला संघ आयोजित पहिल्या ऐतिहासिक महिला अधिवेशनाचे उद्घाटन झेंडावंदनाने करण्यात आले. त्यावेळी समस्त प्रमुख पाहुणे , प्रमुख वक्त्या ,अध्यक्ष अरविंद खैरनार,सचिव डॉ.सुरेश झाल्टे ,अर्चना तांबे उपस्थित होते.विधीकर्ते भगवान रोकडे व कैलास जाधव यांनी महात्मा फुले लिखित सत्यशोधकीय प्रार्थना सादर केल्यानुसार उपस्थितांनी अनुगायन केले.उद्घाटन सत्राच्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदनाताई वनकर ( संयोजीका,सत्यशोधक समाज महिला संघ,महाराष्ट्र राज्य ), उद्घाटीका सरपंच मा. साधनाताई नेवसे,स्वागताध्यक्षा शुभांगी नेवसे ( माजी सभापती,पं.स.खंडाळा ),प्रमुख अतिथी वैशाली पतंगे (अति.आयुक्त,वस्तू व सेवा कर,पुणे ), स्वाती कोरी ( नगराध्यक्षा,न.प.गडहिंग्लज ),मंजिरी धाडगे ( प्रदेशाध्यक्ष,महिला आघाडी,अ.भा.म.फुले समता परिषद ),आनंदी अवघडे (सामाजिक कार्यकर्त्या ,सातारा ), ‘ डॉ. कुंदा धुळे ( भुलतज्ञ ,छत्रपती संभाजीनगर ),मीनाक्षी कुंभार ( सामाजिक कार्यकर्त्या,जयसिंगपूर ),जयश्री लोंढे ( राज्य कार्यकारिणी सदस्या ,ईब्टा शिक्षक संघटना,श्रीगोंदा ) असून प्रमुख अतिथी वक्त्या स्मिता पानसरे ( अध्यक्ष,भारतीय महिला फेडरेशन,महाराष्ट्र राज्य ), सुजाता गुरव ( अध्यक्षा, सत्यशोधक ओबीसी परिषद – महिला ),झेबुन्निसा शेख ( प्रणेत्या,जबरन ज्योत शेतकरी संघटना,नागपूर ),दर्शना पवार ( सामाजिक कार्यकर्त्या ),ॲड.वासंती नलावडे (जिजाऊ सन्मान समिती,पुणे ),स्वागत समिती अध्यक्षा साधना नेवसे (सरपंच,नायगाव ),कार्याध्यक्षा रुपालीताई इंगोले उद्योजिका,पुणे ) मान्यवर विचार पिठावर उपस्थित होत्या.प्रमुख वक्त्यांनी आपले विचार मांडले.अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे म्हणाल्या की,’ स्त्रियांना शिकून नोकऱ्या मिळाल्या परंतु आजही हक्काचे वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नाही.विचार स्वातंत्र्य मिळाले मात्र योग्य विचार करून त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची नितांत आवश्यकता आहे.’ सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार मार्गदर्शनात म्हणाल्या की,’ स्रियांनी पिढीजात नकारात्मक विचारात गुंतवून घेऊ नये.स्री ही फक्त लैंगिक समाधान देण्याचे साधन व जन्म देणारी मादी नाही.संसारातील स्रियांचं निःस्वार्थी व समर्पित योगदान स्वीकारायला शिका ; आमचा सन्मान करा असे आवाहन त्यांनी पुरुषांना केले.तसेच स्त्रियांनाही त्यांनी बजावून सांगितले की,’ चामड्याचे जास्त कौतुक करण्यात स्वतःला अडकवू नका ; वांझोट्या गप्पा न करता सावित्रीमाईंच्या क्रांतिकारी कार्यपद्धतीवर चर्चा करून सदैव निर्भयपणे त्यांचा वारसा चालवा.समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात वंदनाताई वनकर म्हणाल्या की,’ माझं घर व माझा परिवार या संकुचित वृत्तीमुळे बहुजनांची अपरिमित सामाजिक व सांस्कृतिक अधोगती झाली आहे.यामुळे पुढच्या पिढीचं भविष्य अतिशय वाईट आहे.प्रबोधन मेळावे होतात त्यापेक्षा धार्मिक उत्सव जास्त होत आहेत.एका बाजूला कार्यकर्त्यांमध्ये पुरोगामी बदल दिसतो आणि दुसऱ्या बाजूला विसंगत वैदीक कृती कार्यक्रम सुद्धा चालतात याचा तीव्र निषेध त्यांनी केला.स्त्रियांच्या अन्याय व अत्याचारांकडे तटस्थ बघ्याची भूमिका घेणे ही मानवाची मोठी गंभीर शोकांतिका आहे.’
पुस्तक प्रकाशन
क्रियाशील कार्यकर्ता पी.डी.पाटील सर ( धरणगाव ) लिखित ‘आदर्श महामाता ‘ पुस्तकाचे प्रकाशन वैशाली ताई पतंगे (अति.आयुक्त वस्तू व सेवा कर,पुणे ) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पी.डी.पाटील म्हणाले की,’ सावित्रीबाईंच्या माहेरी माझे पहिले पुस्तक प्रकाशित होणे हे माझे परमभाग्य आहे यातून मला सावित्रीमाई फुले व ज्योतिबा फुले यांचे कार्य करण्यासाठी अक्षय चैतन्य व ऊर्जा मिळाली.सत्यशोधक समाज संघाचे दीपस्तंभ अनंतवासी हरी नरके लिखित नागनालंदा प्रकाशित ‘ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘ या पुस्तकाच्या सतराव्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक अर्चना तांबे सूत्रसंचालन माधुरी खैरनार व आभार अनुरिता झगडे यांनी केले.
[ ॲड.वैशालीताई डोळस यांच्या मार्गदर्शनातील अनमोल विचार‘ मनुस्मृतीच्या गुलामगिरीमुळे आपण आजही लाखमोलाची माणसं नाकारतो आहोत मग तुम्ही पुरोगामी कसे ? फुले,शाहू,आंबेडकरांचे अनुयायी आहात का ? स्री ही सौभाग्यवती आहे,घटस्फोटीत आहे,विधवा आहे असे न बघता पुरुषांनी स्री ही माणूस आहे असे बघण्याची नजर तयार केली पाहिजे.पुरुष अपेक्षा करतात – तू सावित्री हो..,जिजाऊ हो …,अहिल्याबाई होळकर हो …मात्र भावांनो तुम्ही प्रथमतः शहाजी राजांसारखे पत्नीला अधिकार द्यायला व त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला तयार आहात का ? भावांनो,नवरा कसा असावा तर महात्मा फुले व शहाजी राजांसारखा असावा.सासरा कसा असावा ? तर मल्हारराव होळकरांसारखा असावा.मुलांवर संस्कार देऊन घडवण्याची जबाबदारी फक्त स्त्रियांची नसून पुरुषांची सुद्धा आहे.महिलांच्या गुलामगिरीची कारणे : १) माता भगिनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या बंधन व नियमात अडकणे.२) शुभ – अशुभ या अंधश्रद्धांच्या आहारी जाणे.३) स्वतःचा मेंदू न वापरता ब्राह्मणी विचार प्रणाली,भांडवलदार व मीडियानुसार चालणे.४) शिक्षण व नोकरीने मिळालेली आर्थिक सुबत्ता मोबाईलवर व्हाट्सअप व फेसबुकवर मेसेज टाकून ब्राह्मणी प्रवृत्तीला मोठे करणे.स्रियांनी आता शरीर व मनाने माणूस होऊन जगले पाहिजे.तुम्ही स्वतःला गुलाम समजतात म्हणून पुरुष तुम्हाला गुलाम करतात.शिकून सुद्धा ‘ सबका हल एक लोटा जल ‘अशा कर्मकांडांच्या आहारी जाणाऱ्या बायका गद्दार आहेत.अशी प्रकट टिका ॲड.डोळस यांनी केली.तरुण पिढीला अधिवेशन व संमेलनास आपल्याला आणता येत नसेल तर पालक व कार्यकर्ते म्हणून आपण अपयशी आहोत.व्हॉटस् ॲप व फेसबुक वर मॅसेज टाकून चळवळ चालत नसते. चळवळ चालली पाहिजे किचन पासून कॅबीनेट पर्यंत ! धर्म व्यवस्थेनं नवरा आणि चूल भोवती स्रियांचं सिमित आयुष्य विणून ठेवलं ! परिणामी पितृसत्ताक पद्धतीमुळे स्त्रिया गुलाम झाल्या.हळदी कुंकू अन भांडी भांडी आता बंद करा.उच्च अधिकारी पदांवर आता बायका बसल्या पाहिजे.गुलामगिरीला आता कायमचा टाटा आणि बाय-बाय करायचा असेल तर धार्मिक जप न करता रोज एक तास वाचन केले पाहिजे.उपवास करायचाच असेल तर मोबाईल व टीव्हीचा केला पाहिजे ! ब्राह्मणी व्यवस्थेतील कर्मकांड,वेद,शब्द व पोथीपुराण प्रामाण्य यापुढे अमान्य केलेच पाहिजे.महात्मा फुले यांनी म्हटले होते, ‘स्रिया शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या ग्रंथांची ते होळी करतील आणि धर्म मार्तंडांची रेवडी करतील.पण अपेक्षा पूर्ण झाली नाही ! स्रिया जेव्हा स्वतंत्र विचार करून अनुसरण करतील त्यावेळी देशात सत्यशोधक समाज,शिवरायांचे स्वराज्य आणि संविधानाचे कल्याणकारी राज्य असेल.तुम्हाला आम्हाला कुठे गेले पाहिजे ; काय वाचावे काय वाचू नये याचही समग्र आत्मभान आले पाहिजे.बुद्धांनी सांगितलेलं बुद्धीप्रामाण्य व संतांनी सांगितलेली समता राजहंसासारखी निवडता आली पाहिजे.मेडिया राज्यकर्त्यांच्या प्रश्नांना कव्हरेज देते परंतू दीनदलीत बहुजनांच्या व प्रामुख्याने स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या बातम्या दाबून ठेवते याबद्दल त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.तुमच्या आमच्या प्रश्नांची उत्तरे महादेव आणि बालाजीच्या मंदिरात नाही तर तुमच्या आमच्या प्रश्नांची उत्तरे सत्यशोधकांच्या साहित्यात,भारतीय संविधानात, संत तुकारामांच्या गाथेत,शिवरायांच्या स्वराज्यात आणि बुद्धांच्या विचारात आहे ]
अधिवेशनाची क्षणचित्रे * स्मारक ते सभास्थळ भव्य रॅली * सत्यधर्म गीतगायन व जिजाऊ वंदन * तळभंडाराने सभा मंडपात पसरले मांगल्य * विशेष निमंत्रक भावपूर्ण सत्काराने भारावले


अधिवेशनात मांडण्यात आलेले महत्वपूर्ण ठराव
१ ) भविष्यात जर कुणी फुले दांपत्य,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील तसेच बहुजन महापुरुष यांचे बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यास कायदेशीर कडक शासन व्हावे.
२ ) सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन अहमदनगर येथे घेण्यात यावे.
३ ) महिला अधिवेशन महानायिकांच्या गावीच घेण्यात यावे.
४ ) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले – ३ जानेवारी व महात्मा ज्योतिराव फुले – ११ एप्रिल त्यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी.
५ ) सावित्रीमाई फुले,महात्मा जोतिराव फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,राजमाता जिजाऊ भोसले,अहिल्यामाई होळकर,फातिमा बी,मुक्ता साळवे,माता रमाई आंबेडकर या सर्वांचे चरित्र इयत्ता चौथी ते दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावे.
६ ) सत्यशोधक महानायकांचे स्मारकं शासनाने बनवावीत व त्यात ग्रंथालय,अभ्यासिका व संमेलन सभागृह उभारावीत .
७ ) प्रत्येक वर्षी उन्हाळा व हिवाळी सुट्टीत अभ्यासवर्ग निरंतर घेण्यात यावेत.


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मारकाजवळ क्रांतीमशाल साधनाताई नेवसे (सरपंच,नायगाव ) व शुभांगी नेवसे (माजी सभापती ) यांनी प्रज्ज्वलित केली.त्यानंतर अभिवादन रॅली असंख्य सावित्री माईंच्या लेकी व कार्यकर्त्यांसह सावित्रीमाईंचा नामघोष व जयजयकार करीत सभामंडपात पोहोचली.रॅलीत उज्ज्वला तांबे,वैशाली डोळस,प्रा.डॉ.नुतन नेवसे,वंदना वनकर यांच्यासह मान्यवर भगिनी उपस्थित होत्या.रॅलीसाठी क्रांतीज्योती अभिवादन रॅली संयोजन समिती ( कटगुण ते नायगाव )यांचे अमूल्य सहकार्य केले.तद्नंतर सभा मंडपात ह.भ.प.विजय महाराज भोईर ( शिरूर ) यांचे सत्यशोधकीय किर्तन झाले.
संमेलन पूर्व रात्री शनिवार दि .९ मार्च रोजी खंडाळा येथील विराज लॉन्स येथे सायंकाळी ७ वाजता ‘ मी सावित्री बोलतेयं ‘ हा वैशाली धाकुलकर (अमरावती ) यांचा एकपात्री प्रयोग झाला.प्रेरक प्रसंग व उत्कृष्ट अभिनयाने उपस्थित भगिनी मंत्रमुग्ध झाल्या.
अधिवेशनासाठी मान्यवरांची विशेष उपस्थिती :- क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या वंशज मालती डोंगरे व प्रा डॉ.नुतन नेवसे,डॉ.छाया पोवार,विधीकर्ते रघुनाथ ढोक ( पुणे ),अनिता देवतकर ( छत्रपती संभाजीनगर )
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी अमूल्य सहकार्य देणारे कार्यकर्ते व संस्था: – भैरवनाथ शिक्षण संस्था (नायगाव ),खंडाळा शिरवळ महात्मा फुले व सावित्रीमाईंची ध्येयवेडी लेकरं, हेमलता भालेराव ( पुणे ),उत्तरेश्वर मोहोळकर,ॲडव्होकेट संभाजीराव बोरूळे,गिरीष बनकर ( फलटण ),प्रा.दत्ताजी जाधव ( सातारा ) संजीवनी जाधव (नाशिक ),कैलास महाजन ( रायगड ),संगिता खोबरे ( औरंगाबाद ),संजय बाबा करपे,अजीत जाधव,सुनिल रासकर,साधनाताई नेवसे,भानुदास नेवसे,संतोष तांबे,रामचंद्र भागवतप्रेमीफुले शाहू आंबेडकर विचार मंच,नामदेव कांबळे,रोहित जाधव, किरण मोरे,स्वप्नील वाघमारे,अमोल डोळस,संजय जाधव तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या ज्योती तायडे,छाया अडसूळ,सरोजा राऊत,संध्या राऊत,शोभा गोगावले यांचे अमूल्य सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *