
लोकशाहीच्या उत्सवात लोकांचा सहभाग महत्त्वाचाच.
उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड
भारतीय लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी लोकशाहीच्या या उत्सवात लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा असून यासाठी निवडणूक कामे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं पहिलं कर्तव्य म्हणजे अधिकाधिक मतदानाचा टक्का वाढविणे होय, प्रत्येक नागरिकाला आपल्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत एका चांगल्या कार्यात आपला सहभाग असल्याचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचे मत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी आसोदा येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या(बी. एल. ओ.) बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांचा अधिकाधिक सहभाग घेत लोकांना मतदाना संदर्भात माहिती देवून अधिकाधिक मतदान होण्यासाठी त्यांना लोकशाहीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मतदाराचे मतदान किती महत्त्वाचे आहे याबद्दल जाणीव जागृती करणे आवश्यक असल्याचे तसेच बी.एल.ओ अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देखील त्यांनी याप्रसंगी दिल्यात. बैठकीच्या सुरुवातीस मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, निवडणूक नायब तहसीलदार डी.बी.जाधव, ग्रामसेवक देवानंद सोनवणे, सर्कल अधिकारी रमेश वंजारी यांचे स्वागत केले या बैठकीस पर्यवेक्षक एल.जे. पाटील, बी. एल.ओ. अतुल चौधरी, नरेंद्र जगताप,चंद्रशेखर घोलप, डी.जी महाजन ,जी.के.भुगवद्या, एल.जे.भूगवड्या,रवी बारेला, एस . ए.भोई, जयसिंग राठोड सर, पंकज नारखेडे, सुनील तायडे,सतीश वाणी व निवडणूक संबंधित अधिकारी उपस्थित होते.