
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून आदिवासी पाड्यात नववर्ष गुढीपाडव्याचे आयोजन
गुढीपाडवा निमित्त वीटभट्टी कामगार व आदिवासी पाड्यात आमरस पुरणपोळी व मिष्टान्न भोजन वाटप.
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)भारतीय नववर्षानिमित्त मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांचा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे, समाजसेवक उद्योजक डॉ. रामचंद्र देसले, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ दिनेश भाई ठक्कर , समाजसेवक उद्योजक आणि स्पीकर डॉ. किशोर अढळकर, लेडीज एक्स्प्रेस ग्रुप चा प्रमूख श्रीमती मधुबेन ठक्कर,सुंदरकांड महिला मंडळ पदाधिकारी ज्योती पुजारा , पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष श्री.सोमनाथ ठाकरे,समाजसेविकाश्रीमती अरुणा भलसोड यांचा सहकार्याने, वीटभट्टी कामगार व आदिवासी पाड्यात आमरस पुरणपोळी व मिष्टान्न भोजन देईन नववर्ष गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे,तरी दानशूर देवदूत प्रेरणादायी हितचिंतक बंधू भगिनी यांनी सकाळी 11वाजता आधारवाडी चौकात यावे, आणि अशिवासी पाड्यातील गरीब गरजू लोकांना मिष्टान्न भोजन वाटप करून त्यांच्यासह नववर्षाचा स्वागताचा आनंद घ्यायचा आहे, असे आवाहन दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी, समाजसेवक उद्योजक डॉ रामचंद्र देसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे, समाजसेवक उद्योजक मोटीव्हेशनल स्पीकर डॉ किशोर अढळकर, पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे,लेडीज एक्स्प्रेस ग्रुप चा मधूबेन ठक्कर, रोटी डे ग्रुप,के. वाय. सी. ग्रुप, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ दिनेश भाई ठक्कर, अरूणा भलसोल,अनुप तिवारी, समाजसेविका जया जाधव,साई संस्थान योगिधाम चे प्रमुख दास जाधव, इच्छामनी महिला भजनी मंडळ सुंदरकांड महिला मंडळ कल्याण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.