

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, लेडीज एक्स्प्रेस ग्रुप तर्फे सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडप्यांचे कन्यादान!
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप प्रमुखांचा राईपुर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्ट च्या वतीने भाईंदर येथे सन्मान….
मुंबई,भाईंदर (प्रतिनिधी) – राईपुर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्ट च्या मार्फत २१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा भाईंदर पश्चिम विश्वकर्मा गार्डन येथे आयोजित करण्यात होता. सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्ताने ५००० मुलींचे कन्यादान करण्याचा संकल्प या ट्रस्टने केला असून त्यादिशेने या ट्रस्टचे कार्य सुरू आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा देव तेथे ची जाणावा! या ऊक्तीप्रमाणे आम्ही सर्व मिळून हे सामाजिक कार्य करत आहोत.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.श्री. मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पने नुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.श्री.यशवंत अनंत म्हात्रे, भोकरी गावचे उद्योजक समाजसेवक डॉ.श्री. रामचंद्र शांताराम देसले, समाजसेवक उद्योजक डॉ.श्री. किशोर अधळकर, लेडीज एक्सप्रेस ग्रुपच्या मधूबेन ठक्कर, या सर्वांच्या सहकार्याने,तसेच इतरही समाजसेवी संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने सुरू आहे,नुकतेच मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.श्री. मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या माध्यमातून, कल्याण पश्चिम येथील प्रसिध्द समाजसेविका लेडिज एक्सप्रेस ग्रुप तर्फे भाईंदर येथील राईपुर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्ट आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यातील २१ जोडप्यांचे कन्यादान करण्यात आले. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपच्या कार्याचे अभिनंदन करत राईपुर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा गार्डन भाईंदर येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.श्री. मनिलाल शिंपी, श्री.दिलीप स्वामी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील व शिंपी समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद शिंपी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ट्रस्टच्या माध्यमातून आगामी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यासाठी काही साड्या भेट म्हणून दिल्या. तसेच “सुपर ॲक्शन फोर्स” बॅच देवून गौरविण्यात आले.यावेळी धर्मेंद्र लक्ष्मीचंद शर्मा शिला शर्मा, सीमा दोरुगडे,डॉ.उषा कनोजिया, आशा वैष्णव , सुनिता हेगडे, यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. यापुढे राईपूर धर्मलक्ष्मी ट्रस्ट आणि मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र,आणि गुजरात, यूपी,एम पी मध्येही असे सामुदायिक विवाह आयोजित करून समजामध्ये नवीन चैतन्य आणि सेवाभावी संस्थांना कर्तव्य करण्याची संधी उपलब्ध होईल असे नियोजन करण्यात येईल असे यावेळी दैनिक स्वराज्य तोरण शी प्रत्यक्ष बोलताना डॉ.मनिलाल शिंपी यांनी सांगितले.