कल्याणचा आचार्य अत्रे नाट्यगृहात स्वामी समर्थ दरबार.
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपलास स्वामी समर्थांचा अनुभूती मुळे सेवची प्रेरणा मिळत आहे:: डॉ.मनिलाल शिंपी


आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण नाट्यगृहात स्वामी समर्थ दरबारात स्वामी भक्तांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळाली….
कल्याण:ठाणे दि.२३(प्रतिनिधी) कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृहात स्वामीराज प्रकाशन आयोजित,
ऑल सेट या संस्थेची निर्मिती असलेला हा दरबार स्वामीराज प्रकाशन यांनी आयोजित केला होता. अध्यात्मिक संगीत नाट्यविष्कार अनुभव नव्हे,अनुभूती देणारा” स्वामी दरबार” नाटकाच्या प्रयोगातून स्वामींच्या अनुभूतीचे प्रत्यक्ष स्वामीं महाराजांचे दर्शन घडले, स्वामींच्या अनुभूतीचे प्रत्यक्ष स्वामींच्या भूमिकेत मयुरेश कोटकर यांच्यासह सहकलाकार यांनी स्वामींचा महिमा आणि स्वामी समर्थ महाराजांनी सेवेकरी बांधवांचा उद्धार कसा केला , स्वामींच्या अध्दभुत शक्तीचे दर्शन या नाट्य दरबारात सर्व प्रेक्षकांना अनुभावास मिळाले.
अक्कलकोटचे श्री.स्वामी समर्थ यांचा ‘ दरबार ‘भक्तांच्या भेटीला कल्याण करांच्या भेटीला येणार असल्याचे सर्व स्वामी भक्तांना समजले होते. त्यामुळे स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. स्वामी दरबार नाट्यप्रयोगाचे गीत, संगीत, नृत्य, नाट्य आणि नामस्मरण असे या आगळ्या अध्यात्मिक रंगप्रयोगाचे स्वरूप असून ऑल सेट या संस्थेची निर्मिती असलेला हा दरबार स्वामीराज प्रकाशन यांनी आयोजित केला होता. या दरबाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे सदर प्रयोगाला काही नामवंत सेलिब्रिटी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांचे स्वामी बद्दलचे अनुभव प्रात्यक्षिक कथन केले. त्यामध्ये झी सिनेमा नाचू कीर्तनाच्यारंगी या मालिकेची प्रसिद्ध निवेदिका तृप्ती भागवत यांनी विशेष शैलीत स्वामी समर्थ महाराज महिमेचे निरूपण सादर केले.याच दरम्यान डोंबिवली पूर्व नांदीवली स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष नित्यानंद घाटे यांनाही स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती सांगितली,कल्याण स्वामी सेवा ट्रस्ट चे परमानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले सेवेकरी यांनी स्वामींचे नामस्मरण करीत आपल्या मठातील अनुभव कथन केले.कोळीगीतांचे, मराठी प्रसिद्ध गायक, बिगबॉस , गोल्डनमॅन श्री.संतोष चौधरी उर्फ ( दादूस) यांनी ही सत्कार स्विकारताना स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात परब्रम्ह सच्चिदानंद आहेत, साईबाबा , व स्वामी समर्थ यांच्या सेवेत आल्यावर कोणताही भक्त निराश होऊन परत जात नाही, प्रत्येक सेवेकरी भक्ताचे दुःख निवारण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या मदतीसाठी अनुभूती देतात, तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.अशीच अनुभूती मला आज आली आहे असे प्रतिपादन दादूस यांनी केले.
सागर देशपांडे संकल्पित – दिग्दर्शित या कार्यक्रमासाठी खास गीत लेखन श्रावण बाळा यांनी केले असून शशिकांत मुंबरे यांनी स्वरसाज दिला आहे. पद्मश्री सुरेश वाडकर आणि साधना सरगम हे गायक असून नाट्य दिग्दर्शन, नेपथ्य सुनील देवळेकर यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन सचिन गजमल यांचे असून नृत्य – नाट्य कलाकारांसह तरुण उमदा रंगकर्मी मयुरेश कोटकर याने ऊभेउभ स्वामींची भूमिका सादरीकरण केल्यामुळे स्वामी भक्तांना प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन घडले. सदर नाट्यप्रयोगाच्या निर्मात्या रजनी आणि पूजा राणे आहेत.हा दरबार सर्व स्वामी भक्तांसाठी अध्यात्मिक पर्वणीच आहे असे म्हणायला वावगे ठरू नये….
यावेळी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे ठाणे, पालघर आणि नाशिक विभागिय कमांडर डॉ.श्री.मनिलाल रातीलाल शिंपी यांना देखील स्वामी समर्थ महाराज यांच्या स्वामी दरबार नाटकाच्या प्रयोगातून स्वामींच्या अनुभूतीचे महत्व प्रतिक्रियेद्वारे व्यक्त करण्याचे भाग्य लाभले.यावेळी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील, कल्याण शिंपी समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री.अरविंद शिंपी, कल्याण जिल्हा मराठी कलाकार अभिनेते शिवाजी शिंदे,सौ.संगिता मनिलाल शिंपी यांनी स्वामी दरबार या नाट्य प्रयोगाचा लाभ घेतला व प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन घेतले.
सदर स्वामी दरबार या नाट्यप्रयोगाला तसेच सर्व कलाकारांना दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील व मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप चे प्रमुख डॉ.श्री. मनिलाल रतिलाल शिंपी यांनी
सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत….