मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपसह डॉ मनिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद : सुखदेव पाटील
कल्याण येथे अंध अपंग कुटुंबीयांना रेशन किट वाटप व मिष्टान्न भोजन.



ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक २९/५/२०२४ रोजी कल्याण परिसरातील अंध अपंग कुटुंबीयांना रेशन किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वाजता स्वामीनारायण सभागृह शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आआला होता.यावेळीप्रमुख पाहुणे म्हणून कल्याण विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक राजेंद्र सिरसाठ, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील,ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ. यशवंत सोरे,बिगबॉस मराठी फेम कलाकार,सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी, स्वामी समर्थ दरबार नाट्याचे स्वामी समर्थ महाराजांचा आविष्कार श्रीस्वामी मयुरेश कोटकर, शिंपी समाजाचे विश्र्वस्थ विजय बिरारी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. अशोक भोईर, कल्याण विशेष पोलिस शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील साहेब, कल्याण पश्चिम चे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी उपस्थिती देऊन मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे अध्यक्ष डॉ. मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे, भोकरी गावचे उद्योजक समाजसेवक डॉ.रामचंद्र शांताराम देसले, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेश भाई ठक्कर तसेच उद्योजक, प्रेरणा निर्माण करणारे डॉ. किशोर अढळकर, जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण, मिडटाऊन सहेली ग्रुपच्या डिंपल मॅडम, यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी तांदूळ,गव्हाचे पीठ, गोडेतेल,कोकोनट ऑइल,साबण, साखर,चहा पावडर, मीठ,बिस्किट्स, आंघोळीचे साबण तूरडाळ, मसुरडाळ,चहा पॉकेट अशा प्रकारे रेशन किट वाटप करण्यात आले, अंध दिव्यांग बंधु- भगिनींना” रेशन किट चे वाटप करण्यात येणार आहे.तरी शक्य असेल ती वस्तूरूप मदत करावी. असे आवाहन दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील
यांनी केले होते. यासाठी दानशूर दात्यानी सढळ हाताने मदतीचा हा पुढे केला त्यात
डॉ.किशोर अढळकर,लेडीज एक्स्प्रेस ग्रुप चा डॉ.स्नेहल बोधे, डॉ. सुमया,जायन्ट ग्रुप ऑफ मिडटाऊन सहेली चा डिंपल दहिफळे, कांचन नेवे, अस्तित्व फाउंडेशन चा रश्मी शर्मा, उषा कनोजिया, इच्छामनी भजनी मंडळाचा अध्यक्ष सौ.संगिता पस्टे,संध्याताई निकुंभ, वर्षाताई बाविस्कर, सुभाष सोनवणे, मनिषा आंबेकर, राजस्थान नामदेव दर्जी समाज सचिव नटवर वर्मा, सुरेश देवगीरिकर, यांनी विशेष सहकार्य केले. मनिषा आंबेकर, अरुणा भलसोल,ठाणे, नवी मुंबई , नाशिक विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांच्यासह आर एस पी अधिकारी शिक्षक योगेश अहिरे,जितेंद्र सोनवणे,बापू शिंपी अशोक निकुंभ, डॉ.अशोक गुप्ता डॉ.दिनेश गुप्ता, संतोष गोरडे, यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला
महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी गायक,कलाकार बिग बॉस फेम श्री.संतोष चौधरी उर्फ दादूस, यांच्यासोबत स्वामी दरबार नाट्याचे स्वामी आविष्कार श्री.मयुरेश कोटकर हे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण शिंपी समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद शिंपी, खजिनदार प्रविण भांडारकर,सचिव गणेश सावळे, इच्छामनी महिला भजनी मंडळ, हेमंत गव्हाणे, आशा मॅडम, डॉ.उषा कनोजिया,यांनी मोलाचे सहकार्य केले.डॉ.यशवंत सोरे यांनीही मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्य सुरू आहे, व त्यासाठी माझी कायम मदत उपलब्ध राहील असे आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांना शुभेच्छा देताना सांगितले.डॉ.किशोर बळीराम पाटील यांनी आभार व्यक्त करताना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य, आणि योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. व ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांना त्यांचा गृहलक्ष्मी महिला बालकल्याण विभाग सुपरवायजर सौ.संगिता शिंपी यांचे खुप मोठे योगदान,आणि प्रेरणा आहे. डोंबिवली स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप व राजू घुले यांनीही उपस्थित राहून शोभा वाढवली. उपस्थित सर्वांचे आभार मानले.
