सुमठाणे गावात पाण्यासाठी वणवण, टँकर सुरू करण्याची मागणी
अमळनेर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असुन मे महिन्यात उन्हाचा पारा अधिक वाढल्याने मे महिन्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाई अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे.
यंदा अत्यल्प पावसामुळे सगळीकडेच टंचाई सदृश्य स्थिती आहे. यात अनेक तालुक्यांमध्ये विहीर, बोअर, नदीपात्र कोरडेठाक पडल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी ग्रामस्थ, महिला यांना शोधाशोध करावी लागत आहे. कमी अधिक प्रमाणात काही गावांमध्ये टंचाई जाणवत असली तरी प्रशासनाकडूनही उपाययोजना होणे अपेक्षित आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन पाणीटंचाई दूर करून समस्या सोडवावी अशी मागणी पारोळा तालुक्यांतील सुमठाने गावातील नागरिक महिलांकडून होत आहे.
पारोळा तालुक्यातील सुमठाणे या गावात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महिलांना रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील एक हजार लोकसंख्येचे गाव असून गावात तीन सार्वजनिक विहीर असल्याने दोन विहिरी लांब असून एक विहीर गावालगत आहे. त्या दोन विहिरीवरून या गावालगत विहिरीवर पाणीपुरवठा केला जातो. गावातील सगळेच महिला भगिनी त्या विहरिवर जाऊन दोर बादली च्या साह्याने पाणी काढून धुणी भांडी करत असतात. पाण्याकरिता चांगलीच कसरत करावी लागत आहे, सार्वजनिक विहिरींवरून हंड्या – गुंडांनी डोक्यावर पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. तसेच गावातील काही नागरिक सकाळी उठून आपापल्या विहरी वरून बैलगाडीच्या साह्याने पाण्याचे मोठे मोठे ड्रम ठेवून भरून पाणी आणतात.
हातपंप पडले बंद – गावात तीन हात पंप असून दोन हात पंप बंद पडले आहेत एक हात पंपाला अधून मधून पाणी येते. त्यामुळे त्या पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी व उसळते काहींच्या घरापासून हातपंप जवळ तर काहींच्या घरापासून हातपंप लांब आहे. वृद्ध व महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात हेलपट होत असते.
गुरांसाठी पाण्याची समस्या गंभीर – गावात अनेकांकडे मोठ्या प्रमाणात गुरे ढोरे आहेत. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी अडचण जाणवते. ज्याची त्याती गुरे – ढोरे जो तो आपापल्या शेतात नेऊन विहरीवरील पाणी काढून तहान भागवतो असतो.
गावात तीव्र पाणीटंचाई असून गावालगत असलेली ग्रामपंचायतची सार्वजनिक विहिरीवरून पाण्याचा वापर होत आहे. त्या ठिकाणी येऊन महिला भगिनी धूनी, भांडी तसेच पिण्यासाठी पाणी भरत असतात वापरतात त्या विहिरीची पातळी घटल्यास दुसऱ्या दोन सार्वजनिक विहिरीवरून पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करून विहिरीत पाणी टाकले जाते. तसेच गावात टँकर सुरू करण्यासाठी मागणी केली होती असून अद्यापही गावात टँकर उपलब्ध झाले नाही त्यामुळे पाण्याची मोठी समस्या उद्भवलेली आहे. त्यासाठी पुन्हा पाण्याची मागणी करण्यासाठी जावे लागणार आहे. (सरपंच- सविता अविनाश पाटील- सुमठाणे, पारोळा
वयोमानानुसार पायदळ चालणे अवघड झालेले आहे. पाण्याशिवाय घरात कुठलेही काम उमजत नाही. गावात पाण्याची समस्या बिकट असल्या कारणाने पाण्यासाठी उन्हातान्हात बाहेर पडावे लागते. एका छोट्याशा हात पंपावरून पाणी घराकडे घेऊन जावे लागते. उन्हामुळे रस्त्यावर सावलीचा आसरा घेत उठत, बसत बराच वेळ पर्यंत पाणी भरावे लागते. – हिरकनबाई पाटील वृद्ध महिला

