
पब्लिसिटी हेच आव्हाडांचे अंतिम ध्येय्य-भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे टिकास्त्र
मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाड येथे मनुस्मृतीला विरोध करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
दरेकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांची नौटंकी राज्यातील जनतेच्या समोर आली आहे. मनुस्मृती संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे कि असा कोणत्याही प्रकारचा समावेश केला जाणार नाही. परंतु केवळ राजनैतिक नौटंकी करायची, समाजातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या विषयाचा मी मोठा काही वाली आहे अशा प्रकारचे ढोंग मनुस्मृतीच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी घेतले होते, त्याची पोलखोल उघड झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपने उत्स्फूर्तपणे आंदोलन केले आहे. राज्यातील जनतेने जितेंद्र आव्हाडांचा बुरखा टराटरा फाडला आहे. तसेच भंपकपणाचे दुसरे नाव हे जितेंद्र आव्हाड आहे. पब्लिसिटी हेच त्यांचे अंतिम ध्येय्य आहे, अशी टिकाही दरेकरांनी केली आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, जागावाटपाचे अंतिम स्वरूप ठरायचे आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार उभा करत असतो. जसा लोकसभेला एकोप्याने, समन्वयातून मार्ग काढला तशाच पद्धतीचा विधानपरिषदेलाही महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा होऊन मार्ग निघेल. विधानपरिषदेवरून आमच्यात कुठल्याही प्रकारचे वितुष्ट होईल असे वाटत नाही.
राज्यातील दुष्काळी स्थितीवर बोलताना दरेकर म्हणाले की, निवडणुका संपलेल्या आहेत, राज्यात भीषण दुष्काळ पडलाय. माणुसकीच्या धर्तीवर निवडणूक आयोग याबाबत शिथिलता देऊ शकतात. अशा प्रकारच्या शिथिलता जेव्हा आपत्ती, नैसर्गिक संकट आले तेव्हा दिल्या आहेत. तशाच प्रकारची शिथिलता देण्याची मागणी राज्य सरकारने आयोगाकडे केली आहे ती आयोग मान्य करेल आणि राज्यातील दुष्काळग्रस्ताना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकार गतीने पावले उचलेल.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावषयी दरेकर यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले की, या देशात शंभर टक्के निर्विवाद ४०० पार पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील. महाराष्ट्रातही भाजपा आणि महायुती कुठल्याही परिस्थितीत ४० जागांचा आकडा पार करेल, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.
चौकट
महाराष्ट्र धगधगत असताना
विरोधी पक्षनेत्याचे अस्तित्वच दिसत नाही
विजय वडेट्टीवार यांच्यावर तोफ डागताना दरेकर म्हणाले की, गेले आठवडाभर विजय वडेट्टीवार कुठल्या बिळात लपले होते त्याचा पहिला शोध घ्या. महाराष्ट्रात एवढे विषय धगधगताहेत आणि विरोधी पक्षनेत्याचे अस्तित्वच दिसत नाही. अस्तित्व शून्य आहे असा टोला लगावला. तसेच आता मी आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु पुणे अपघात प्रकरणात पहिल्या दिवसापासून सरकार सतर्क आहे. दोषीवर कठोर कारवाई करेल. देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, गय केली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.
00000
पब्लिसिटी हेच आव्हाडांचे अंतिम ध्येय्य
भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे टिकास्त्र
मुंबई- महाड येथे मनुस्मृतीला विरोध करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
दरेकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांची नौटंकी राज्यातील जनतेच्या समोर आली आहे. मनुस्मृती संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे कि असा कोणत्याही प्रकारचा समावेश केला जाणार नाही. परंतु केवळ राजनैतिक नौटंकी करायची, समाजातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या विषयाचा मी मोठा काही वाली आहे अशा प्रकारचे ढोंग मनुस्मृतीच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी घेतले होते, त्याची पोलखोल उघड झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपने उत्स्फूर्तपणे आंदोलन केले आहे. राज्यातील जनतेने जितेंद्र आव्हाडांचा बुरखा टराटरा फाडला आहे. तसेच भंपकपणाचे दुसरे नाव हे जितेंद्र आव्हाड आहे. पब्लिसिटी हेच त्यांचे अंतिम ध्येय्य आहे, अशी टिकाही दरेकरांनी केली आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, जागावाटपाचे अंतिम स्वरूप ठरायचे आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार उभा करत असतो. जसा लोकसभेला एकोप्याने, समन्वयातून मार्ग काढला तशाच पद्धतीचा विधानपरिषदेलाही महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा होऊन मार्ग निघेल. विधानपरिषदेवरून आमच्यात कुठल्याही प्रकारचे वितुष्ट होईल असे वाटत नाही.
राज्यातील दुष्काळी स्थितीवर बोलताना दरेकर म्हणाले की, निवडणुका संपलेल्या आहेत, राज्यात भीषण दुष्काळ पडलाय. माणुसकीच्या धर्तीवर निवडणूक आयोग याबाबत शिथिलता देऊ शकतात. अशा प्रकारच्या शिथिलता जेव्हा आपत्ती, नैसर्गिक संकट आले तेव्हा दिल्या आहेत. तशाच प्रकारची शिथिलता देण्याची मागणी राज्य सरकारने आयोगाकडे केली आहे ती आयोग मान्य करेल आणि राज्यातील दुष्काळग्रस्ताना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकार गतीने पावले उचलेल.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावषयी दरेकर यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले की, या देशात शंभर टक्के निर्विवाद ४०० पार पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील. महाराष्ट्रातही भाजपा आणि महायुती कुठल्याही परिस्थितीत ४० जागांचा आकडा पार करेल, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र धगधगत असताना
विरोधी पक्षनेत्याचे अस्तित्वच दिसत नाही
विजय वडेट्टीवार यांच्यावर तोफ डागताना दरेकर म्हणाले की, गेले आठवडाभर विजय वडेट्टीवार कुठल्या बिळात लपले होते त्याचा पहिला शोध घ्या. महाराष्ट्रात एवढे विषय धगधगताहेत आणि विरोधी पक्षनेत्याचे अस्तित्वच दिसत नाही. अस्तित्व शून्य आहे असा टोला लगावला. तसेच आता मी आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु पुणे अपघात प्रकरणात पहिल्या दिवसापासून सरकार सतर्क आहे. दोषीवर कठोर कारवाई करेल. देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, गय केली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.