• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शिक्षक हे शिक्षण आणि प्रशिक्षण यामधील महत्वाचे घटक आहेत – अनिल धात्रकअपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण महत्वाचे – डॉ.किशोर पाटील

Jun 3, 2024

Loading

शिक्षक हे शिक्षण आणि प्रशिक्षण यामधील महत्वाचे घटक आहेत – अनिल धात्रक
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण महत्वाचे – डॉ.किशोर पाटील

कल्याण येथे आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न!

कल्याण दि.३(स्व.रा.तो) पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर आयोजित आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सोमवार दिनांक ३/६/२०२४ रोजी विभागीय परिवहन अधिकारी श्री.अनिल रतन धात्रक यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात.
Brighton world school,( गुरुकृपा शिक्षणशास्त्र महाविद्यालय) गौरीपाडा, कल्याण पश्चिम येथे संपन्न झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन आवळे, आर एस पी ठाणे, नवीमुंबई विभागीय समादेशक तथा शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी,ठाणे,पालघर व नाशिक आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.श्री. मनिलाल रतीलाल शिंपी, ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे,नवी मुंबई हेड क्वार्टर कराटे प्रशिक्षक, नॅशनल खेळाडू श्री.चोगले आदी मान्यवर व मोठ्या संख्येने आर एस पी अधिकारी वर्ग उपस्थित होते.सदर आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन याच ठिकाणी दिनांक २ जून ते १० जून २०२४ पर्यंत करण्यात आले आहे. अशी माहिती आर एस पी अधिकारी तथा शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी व आर एस पी कमांडर डॉ.श्री.मनिलाल शिंपी यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.
आतापर्यंत आपण शाळेत असताना जे शिकलो ते शिक्षण, व आता आपल जे सुरू आहे ते प्रशिक्षण म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज, प्रात्यक्षिक आपण काय करू शकतो ते प्रशिक्षण होय. शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोणी सायन्सला जातो कोणी मेडिकलला जातो तर कोणी इंजिनिअरिंगला जातो. यामध्ये सायन्स व इंजिनिअरिंग मधला फरक काय आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो, सायन्स म्हणजे जे आपल्यासमोर घडते, कसे घडते व का घडते, हे आपल्याला शाळेत शिकवलं गेल् आहे.त्यामध्ये न्यूटनचे तीन सिद्धांत,त्यापैकी तिसरा सिद्धांत गुरुत्वाकर्षण व घर्शन त्याचबरोबर टेक्नॉलॉजी काय शिकवते व त्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो. हे प्रत्येकाला समजेल असे विभागीय परिवहन अधिकारी यांनी समजाऊन सांगितले. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे पालन कसे करावे त्याबाबतही विशेष माहिती यावेळी देण्यात आली. त्यामध्ये विशेष म्हणजे आपण दोन चाकी वाहन चालवत असल्यास सर्वप्रथम आपल्या सोबत गाडीचे कागदपत्र, आपला परवाना (लायसन्स), व हेल्मेट असल्याशिवाय आपण गाडी चालवू नये. तसेच चार चाकी वाहन चालवत असताना अगोदर आपल्या गाडीभोवती फिरून घेऊन गाडीच्या खाली मागे पुढे कुत्रा ,उंदीर, मांजर प्राणी आहेत का नाही याची दखल घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही अशी खबरदारी घेणे फार गरजेचे आहे त्यानंतरच आपण गाडी चालऊ शकतो तसेच गाडीत बसल्याबरोबर शिटबेल्ट लावणे आपणास बंधनकारक आहे. अशा प्रकारची सखोल माहिती उद्घाटनाप्रसंगी विभागीय परिवहन अधिकारी श्री. अनिल रतन धात्रक यांनी उपस्थित सर्वांना दिली.
आई-वडिलांनंतर आपले गुरु हे शिक्षक असतात. त्याचबरोबर आपले मित्र,मैत्रिणी देखील आपले गुरू असतात.कारण चार भिंतीच्या पलीकडे आपण जो पर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला काहीच ज्ञान आत्मसात होत नाही.तसेच बाहेर गेल्याने आपल्या विचारांची देवाण-घेवाण इतर कुणाबरोबरही होते तेव्हाच आपण आपल्यात बदल घडवू शकतो. आज या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण भविष्यात विद्यार्थ्यांना वाहतूक विषयाबाबत माहिती देऊन त्यांच्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून ते विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना गाडी चालवन्या अगोदर सांगतील बाबा हेल्मेट घाला, बाबा शिटबेल्ट लावा. तेव्हाच आपल्याला प्रशिक्षणाची पोहचपावती मिळेल.असे मार्गदर्शन करताना दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी सांगितले. आमच्या शाळेमध्ये निवडणूक काळात जवळजवळ ३०० पोलीस, अधिकारी , होमगार्ड टीम या ठिकाणी आठ दिवस मुक्कामाला होते. त्यांचा सर्व खर्च आमच्या शाळा व्यवस्थापन समितीने केला. आता तुम्ही आले आहात तुम्हालाही जी काही मदत लागेल ती मी प्रामाणिकपणे करायला तयार आहे. कारण मी ही तुमच्याबरोबर आज मुख्याध्यापक म्हणून नाहीतर एक शिक्षक म्हणून प्रशिक्षण घेणार आहे.असे शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन आवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस पी कमांडर डॉ.श्री. मनिलाल शिंपी यांनी केले तर आभार प्रदर्शन आर एस पी कमांडर तथा शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी यांनी केले.
हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी शिबिर प्रमुख श्री.दिलीप स्वामी,आर एस पी कमांडर डॉ.श्री. मनिलाल शिंपी,ठाणे जिल्हा अतिरिक्त समदेशक श्री.जितेंद्र सोनवणे व त्यांची संपूर्ण टीम विशेष मेहनत घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *