माळी समाज ठरविणार महाराष्ट्र राज्यात राजकीय लोक प्रतिनिधित्वाची दिशा
कोकण ठाणे मुंबई विभागीय बैठक मुलुंड येथे माळी समाज हक्क परिषद संपन्न =============
मुंबई :- प्रतिनिधी महाराष्ट्रात माळी समाजाची मतदार संख्या ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. परंतु त्या तुलनेत महाराष्ट्रात राजकीय प्रतिनिधित्व माळी समाजातील बांधवांना लाभलेले नाही. प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित राजकीय सामाजिक चाणक्याकडून माळी समाजाची बांधवांची गाव वार्ड प्रभाग सहकारी सोसायटी बँका पंचायत समिती आमदार खासदार केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय कमिटी ओबीसी नेत्यांना सर्व राजकीय पक्षात प्रतिनिधीत्व करण्यापासून उपेक्षा सामाजिक राजकीय कोंडी केल जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष प्रस्थापित धुरंदर चाणक्य माळी समाजाला गृहीत धरूनच आपली वाटचाल प्रस्थापित प्रतिनिधी करीत आहे. त्यामुळे माळी समाजाचा राजकीय नेतृत्व हा खाली घसरत चाललेला आहे*.
*सन १९७८मध्ये जेवढे राजकीय प्रतिनिधित्व आमदार माळी समाजाचे होते, त्या तुलनेस २०२४ मध्ये सहभाग आणि प्रतिनिधित्व एक तृतीयांश एवढी कमी संख्या माळी समाजाच्या आमदारांची झालेली आहे. महाराष्ट्रात ज्या प्रस्थापित समाजाची संख्या १६ टक्के आहे त्यांना ३५ जागा व माळी समाजाची संख्या ११ टक्के असुन देखील १ जागा ,अशीच काहीशी स्थिती स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रतिनिध्वाचा अभाव लोकप्रति निधित्वाच्या बाबतीत माळी समाजाची आहे*.
*या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील माळी समाजातील इच्छुकांना विविध राजकीय पक्षांकडून ग्रामपंचायत सदस्य सरपंच सहकारी सोसायटी सदस्य चेअरमन नगरसेवक नगराध्यक्ष महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य पंचायत समिती सदस्य आमदारकी उमेदवारी मिळावी म्हणून माळी समाजाच्या लोक प्रतिनिधी विजय होत राजकीय टक्का वाढावा,यावर चिंतना साठी रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी मुलुंड मुंबई येथे मुलुंड हाई स्कूल, येथे “माळी समाज हक्क परिषद” आयोजित करण्यात आली होती. या हक्क परिषदेच्या समन्वयकाची जबाबदारी “माळी महासंघाने” उचलली असून या परिषदेला महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार ,लोकप्रतिनिधी व माळी समाजातील सर्व सामाजिक राजकीय माळी पोट संघटनाचे प्रतिनिधी विविध संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी म्हणून उपस्थिती राहिली*.
*या परिषदेत माळी समाज: एक उपेक्षित समाज, माळी समाज बांधव: एक दुर्लक्षित समाज बांधव, माळी समाजः एक राजकीय दृष्ट्या लोकशाहीत प्रतिनिधीत्व अस्तित्व नसलेला समाज या विषयावर विचार मंथन मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे महाराष्ट्रातील माळी समाजाला या हक्क परिषदेतून एक वेगळी दिशा सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या ऊर्जा मिळाली . सध्या महाराष्ट्रात ओबीसीं बहुजन समाजाचे आरक्षण सुरक्षित रहावे व मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे, याविषयी जो संघर्ष सुरू आहे, याबाबत माळी समाजची नेमकी ठोस भूमिका काय असेल याचेही विचार मंथन या हक्क परिषदेत केले गेले*.
*तसेच माळी समाजाला ४० विधानसभा पेक्षा जास्त प्रतिनिधित्व करण्यास संधी जो राजकीय पक्ष देईल त्या पक्षाला महाराष्ट्रातून विधानसभेसाठी तत्सम निवडणुकीत माळी समाज पाठिंबा देईल, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, या हक्क परिषदेत या दोन ठरावांना सर्वानुमते अनुमोदन दिले गेले*.
*या हक्क परिषदेचे आयोजन कोकण मुंबई विभागाने केले, मुख्य संयोजक राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती वनिता लोंढे, ठाणे शहर अध्यक्ष राहुल वाघमारे, मुंबई विभाग अध्यक्ष हेमंत भास्कर, कोकण विभाग सरचिटणीस सचिन केदारी, ठाणे शहर चेतन बटवाल, ठाणे शहर महिला अध्यक्ष नीता कलोरे आदींनी केले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुणजी तिखे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णा गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष हिरामण भुजबळ, सोशल मीडिया प्रमुख चंद्रशेखर दरवडे,काँग्रेस चे ज्येष्ठ नेते निलेश शेंडकर, राष्ट्रपती पुरस्कृत अशोक गोरे, नगरसेवक रोहिदास लोखंडे, नगरसेवक नितीन बनकर सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक चौधरी राजेंद्र करणे उद्धव भुजबळ लहू मलकमिर महेशकुमार राऊत सर्व पक्षीय राजकीय सामाजिक माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी या कार्यक्रमास कोकण , मुंबई विभागातील विविध संघटना पोट संघटना माळी मंडळाचे अध्यक्ष, समता परिषद सावता परिषद महात्मा फुले युवा दलचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते*.