“भारतातील क्रांतिकारी महिला” या पुस्तकाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
अमळनेर वार्ताहर-“भारतातील क्रांतिकारी महिला” या अनिल नथू पाटील, डॉ बळीराम पवार लिखित व संपादित पुस्तकाचे प्रकाशन मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी क्रांतिकारी महिलांविषयी लिखाण केल्याबद्दल अनिल पाटील यांचे कौतुक केले. या पुस्तकात राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई, ताराबाई शिंदे ,वि . मालिनीताई राजुरकर अशा विविध थोर महिलांचे लेख समाविष्ट आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक संस्कृती पब्लिकेशन ,लातूर हे असून पुस्तकाला ISBN नंबर प्राप्त आहे. अनिल पाटील हे उपशिक्षक असून विजयनाना पाटील आर्मी स्कूल व जुनियर कॉलेज येथे कार्यरत होते. सध्या सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथे कार्यरत आहेत. स्वर्गवासी आई जिजाबाई पाटील यांच्या प्रेरणेने हे मी पुस्तक लिहिले असे अनिल पाटील म्हणाले.प्रकाशन सोहळा वेळी मा. नगरसेवक विनोद कदम, नगरसेवक राजेश पाटील, विविध कार्यकारी सोसायटी, बाम्हणे चे चेअरमन व केशवा ऍडव्हर्टायझिंग चे संचालक गणेश भामरे, प्रफुल पाटील इत्यादी उपस्थित होते. अनिल पाटील यांच्या या पुस्तकाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, मार्गदर्शिका सौ. शिलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी. बी .पाटील, प्रशासकीय अधिकारी श्याम पवार, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य गायत्री भदाणे,तसेच विजयनाना पाटील आर्मी स्कूल व जुनियर कॉलेज चे प्राचार्य व्हि. जी. बोरसे, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, डी . एस पाटील ,तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विजयनाना पाटील आर्मी स्कूल व जुनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षकवृंद ,शिक्षिकावृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.