पत्रकारांसोबतच समाजाचे प्रश्न उचलणारी लोकस्वातंत्र्य ही अभिनव संघटना- भाई प्रदिपराव देशमुख
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ३५ वा विचारमंथन मेळाव्यात विद्यार्थी व अतिथी सन्मान
अकोला – समाजऋणाचे भान ठेऊन पत्रकारांसोबतच समाजिक प्रश्न उचलून महाराष्ट्रभर लोकाभिमुख झालेली आणि त्यानंतर ईतर राज्यातही पाऊल ठेवणारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही एक अभिनव राष्ट्रीय संघटना आहे असे प्रतिपादन अकोला जि.प.चे माजी सदस्य गटनेता व शेकाप चे विदर्भ चिटणीस भाई प्रदिपराव देशमुख यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा व्दितीय अभियानातील ९ वा व सलग ३५ वा विचारमंथन मेळावा स्थानिक जठार पेठेतील जैन रेस्ट्रो येथे २८ जुलै रोजी संपन्न झाला.त्यावेळी अध्यक्षिय भाषणातून ते बोलत होते. याप्रसंगी सभासदपाल्य म्हणून कु. दिया विजय काटे व अथर्व सतिश देशमुख या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र,व स्कूल बॅग देऊन व त्यांच्यासह अतिथींचा व पग्रामगीता,सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गायक अथर्व देशमुख याने “जिंदगी मौत ने बना जाये” हे देशभक्तीपर गीत सादर केले.
याप्रसंगी सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांना हारार्पण आणि वंदन करण्यात आले.जम्मू काश्मिरमधील अतिरेकी चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील जवान प्रविण जंजाळ व ईतर शहिद जवानांना,अपघात,आपत्तीमधील बळींना व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना नियमित शिरस्त्याप्रमाणे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाला अ.भा.गुरूदेव सेवा मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे हे प्रमुख अतिथी म्हणून तर संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,पत्रकार निशाली पंचगाम,महाराष्ट्र राज्य संघटन,संपर्क प्रमुख परभणीचे भगिरथजी बद्दर प्रा. डॉ.संतोष हुशे, यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती. संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून तुकडोजी महाराज आश्रमातून संघटनेची स्थापना,महाराष्ट्रभर सभासदांची वाढती संख्या,लोकस्वातंत्र्य नावाने मासिक प्रकाशन,मुंबईत आणि राज्यातही दर महिन्याला सुरू झालेले कार्यक्रम,तथा समाज आणि पत्रकार प्रश्नांमध्ये संघटनेची भुमिका याबाबत माहिती दिली.याप्रसंगी भानुदास कराळे व निशाली पंचगाम यांनी संघटनेच्या गतीमान विस्ताराचा गौरव करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
केन्द्रीय पदाधिकारी सौ.जया भारती,इंगोले यांच्या संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख,उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे,किशोर मानकर, केंद्रीय पदाधिकारी अंबादास तल्हार,प्रा.राजाभाऊ देशमुख,साहित्य व संस्कृत मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे,विदर्भ संघटक डॉ.शंकरराव सांगळे, अॕड.विजयराव देशमुख,डॉ.विनय दांदळे, जिल्हाध्यक्ष सागर लोडम, मनोहर मोहोड, विजयराव बाहकर, प्रा.मोहन काळे,नानासाहेब देशमुख,दिलीप नवले,सौ.दिपाली बाहेकर,सतिश देशमुख,विजयराव देशमुख,सोनुबाप्पू देशमुख,प्रा.विजय काटे, अभि.सुरेश तिडके,के.एम.देशमुख,प्रशांत देशमुख, सुरेश पाचकवडे,पांडूरंग आगळे,डॉ.अशोक सिरसाट,अॕड.संकेत देशमुख,आशिषराव पाईकराव,वसंतराव देशमुख,अशोककुमार पंड्या,गौरव देशमुख,गणेश मुळे,आकाश हरणे,गजानन मुऱ्हे,गजानन चव्हाण, व ईतर पत्रकार उपस्थित आभारप्रदर्शन केंद्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.