मनामध्ये जुन्या पेंशनच्या ध्येयाची ज्योत प्रज्वलित करून कृती करा – सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाचे लोन शासनापर्यंत पोहोचवा
—————————————————
दिव्य शक्ती चमत्कार करेल व माऊली शासनाला नक्कीच शपथपत्र सादर करण्याची सदबुद्धी देईल पण कृतीलाही तेवढेच महत्व – डॉ.सौ.संगीताताई शिंदे (बोंडे)
—————————————————-
*2005 पूर्वीच्या जुन्या पेंशनसाठी संतनगरी शेगाव येथे बेमुदत आंदोलनचा श्रीगणेशा*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
शेगाव जि.बुलडाणा दि. 1 ऑगस्ट
पेंशनच नसल्यामुळे सेवानिवृत्त पेंशन पीडित बांधव शेतात, वेल्डिंगच्या दुकानात तसेच मिळेल ते मोलमजुरी करून दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागविण्याचा कसाबसा प्रयत्न करतात. सेवानिवृत्त शिक्षक बांधवांचं हे वास्तव व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षक बांधवांची घालमेल शिक्षकांची, शिक्षक संघटनेची एक प्रतिनिधी म्हणून मनाला अस्वस्थ करणारी असून महाराष्ट्र शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर झाल्याशिवाय आता आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे मत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉ.सौ.संगीताताई शिंदे ( बोंडे )यांनी व्यक्त केले.
संत नगरी शेगाव येथे सुरू असलेल्या बेमुदत आठवण आंदोलन दरम्यान पेंशन पीडित बांधवांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
ध्येय जर मनामध्ये असेल तर आपण काहीही करू शकतो. एकदा जर जुन्या पेंशनचा ध्यास लागला की, कुठल्याही कामाचा त्रास होत नाही. आंदोलनाला आलेल्या प्रत्येकांनी इथं नुसतं बसू नका तर सोशल मीडियाच्या ( Whatsapp, Facebook, Twitter, Video) माध्यमातून आंदोलनाचे लोन शासनापर्यंत पोहोचवा. आंदोलनाची माहिती खासदार, आमदार, शिक्षक व पदवीधरांचे 14 ही आमदार यांच्यापर्यंत पोहोचवा. घरी असणाऱ्यांनी हातावर हात धरून बसू नका, काहीतरी करा असा सल्लाही त्यांनी दिला.
सेवेत असेपर्यंत स्वाभिमानाने जीवन जगलो पण सेवानिवृत्त झाल्यावर लाचारीची वेळ किंवा कोणासमोर हात पसरण्याची वेळ शिक्षक बांधवांवर येता कामा नये.शासनाला आपण वेळोवेळी मदत करतो.विविध प्रकारचे कर भरतो तेव्हा कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क देणे ही शासनाची जबाबदारी आहे.हा हक्क आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही.शरद तिरमारे कार्याध्यक्ष
शिक्षण संघर्ष संघटना यांनी सांगितले.