‘प्रताप’ मध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम उत्साहात संपन्न
———————————————
● महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय
सेवा योजना विभागाचा उपक्रम
● स्वच्छ भारत दिवस उत्स्फूर्तपणे
साजरा
● १०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
———————————————
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचा एक उपक्रम अर्थात,महात्मा गांधींच्या १५५ व्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा अंतर्गत “स्वच्छ भारत दिवस” मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हा उपक्रम महात्मा गांधींच्या स्वच्छ भारताच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आला होता.
प्रस्तुत कार्यक्रमात प्राचार्य डॉ.अरुण जैन, सिनेट सदस्य प्रा.एस बी नेरकर, प्रमुख वक्ते प्रा.नितीन पाटील तसेच इतर प्राध्यापक यांच्यासह १०० हून अधिक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.भाग्यश्री जाधव यांनी केले तर डॉ.हेमंत पवार (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी) यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी उपस्थितांना महात्मा गांधींच्या विचारांचे सद्यकालीन महत्व सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन यांनी महात्मा गांधीजींचा “माझे जीवन हाच माझा संदेश” हा विचार उपस्थितांना स्मरण करुन दिले,त्यांनी गांधीजींच्या विचारांमधून स्वच्छतेचा संदेश आणि त्याची आपल्यावर असलेली जबाबदारी यावर प्रकाश टाकले.
सदर कार्यक्रमाचे वक्ते प्रा.नितीन पाटील यांनी “स्वातंत्र्य सैनिकांचे महत्त्व” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सैनिकांच्या त्यागाचा आणि त्यांच्याप्रती असलेल्या आपल्यातील कर्तव्याचा उल्लेख करून उपस्थितांना त्यांचे प्रेरणास्रोत बनण्याचे आवाहन केले.
यानंतर, प्रा.एस बी नेरकर यांनी महात्मा गांधींच्या विचारांवर आधारीत स्वच्छतेचे महत्त्व विषद केले आणि उपस्थितांना आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे संदेश दिले
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर संपूर्ण महाविद्यालयीन परिसरात स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. प्राचार्य डॉ.अरुण जैन, प्राध्यापक, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक एकत्र येऊन प्लास्टिक आणि कचऱ्याचे संकलन केले. प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यात आला.
प्रस्तुत कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.सचिन नांद्रे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
“स्वच्छ भारत दिवस” साजरा करून, स्वच्छता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवण्याचा दृढ संकल्प उपस्थित सर्वांनी केला.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.सुनील राजपूत यांनी सर्व प्रमुख उपस्थित, शिक्षक, आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.