• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले -प्रवीण दवणे‎ (सुप्रसिद्ध कवी ठाणे),

Oct 8, 2024

Loading

आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले -प्रवीण दवणे‎
(सुप्रसिद्ध कवी ठाणे)

समारोपप्रसंगी प्रवीण दवणे यांनी ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ यावर अनेक कविता सादर करत श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले आहेत.यामुळेच असे
कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेन मुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले. आतातर मोबाईल वरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो. खरेच या शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता आणि आहे.
पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे.
असे मराठी वाड्:मय मंडळ अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमालेत समारोप प्रसंगी सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ या विषयावर बोलतांना सांगितले..

ते पुढे म्हणाले की शाळांमध्ये शिक्षकांनी पत्र लिहिण्याची संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये राबवली पाहीजे. एखाद्या कवीला पत्र लिहून विद्यार्थ्यांचा आनंद पत्रातून व्यक्त झाला पाहिजे हेच उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात..
‘दीपस्तंभ : मनातले व जनातले” ‎ ‎ याबाबत कवी व लेखक प्रवीण‎ दवणे यांनी अगदी सोप्या भाषेत ‎ ‎ समजवले. प्रत्येकाच्या आयुष्यात‎ कोणी ना कोणी दीपस्तंभ हे‎ असतातच. काहींना सर्व‎ ओळखतात तर काही अगदीच ‎ ‎ अनोळखी असतात. या प्रसंगी‎ त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले‎ काही प्रख्यात व्यक्तींशी त्यांची‎ कशी अचानक भेट होऊन त्यांनी‎ आपल्या आयुष्यात कसे‎ दीपस्तंभाचे काम केले हे सांगितले.

मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींपासून‎ लता मंगेशकर, ग. दी. माडगूळकर‎ ते रेल्वेत अचानक भेटलेल्या‎ व्यक्तींनी कसे आयुष्यात‎ दीपस्तंभाचे काम केले हे त्यांनी‎ अगदी रसाळ व मधाळ वाणीतून‎ श्रोत्यांना सांगत मंत्रमुग्ध केले.‎
काही तरी ‘दाटून’ आल्यानंतर येणाऱ्या ओढीतून अभिव्यक्ती होते. त्या अभिव्यक्तीची रूपे आपापल्या प्रतिभाधर्मानुसार आकाराला येतात. कुणाला चित्र काढावेसे वाटते, कुणाला शिल्प कोरावेसे, कुणाला ‘काव्य’ करावेसे वाटते. हे अभिव्यक्त व्हावंसं वाटणं हीच माणूसपणाची खूण आहे. परंतु निर्मिती केवळ अभिव्यक्तीच्या असोशीवर थांबत नाही, तर काळाच्या गरजेनुसार आणि कलावंतांच्या संवेदनशील आत्मभानानुसार आपला पिंड घडवत जाते. हे आत्मभान जितके सजग जितके सकारात्मक तसा कस आपल्या नवनिर्मितीला येतो.
सेल्फीमग्न आभासी जगात जो युवक स्वतःच्या जाणिवांवर जागता पहारा ठेवेल, तेच पुढे टिकून राहणार आहे. हे मी आज आवर्जून सांगत आहे. ‘मी’चे रूपांतर ‘आम्ही’, ‘आपण’ मध्ये होण्याऐवजी जर ‘मी’त गोठवले गेले, तर पुढचा प्रवास विनाशाकडेच जातो. मित्रहो, युवकांमधील वाढती निराशा आणि ओघाने होणाऱ्या आत्महत्या ही मला माझ्यासारख्या या पिढीवर निस्सीम प्रेम करणाऱ्यांना विलक्षण चिंतेची बाब वाटते. ‘मी’त गोठवलेली अभिव्यक्ती आणि अपयश, पराभव, नकार पचवण्याची विरून गेलेली ताकद हेच या निराशेमागचं कारण आहे.
मराठी भाषेचा ऱ्हास थोपवण्याचे काम आपला गावाकडचा युवकच करताना दिसणार आहे. खेडयापाडयातील युवक ज्या हिकमतीनं अडचणींवर स्वार होऊन लेखन करतो आहे, प्रसिध्दी, पैसा याचा कणभर मोह न ठेवता ही मुलं त्यांच्या लोकभाषेत नाटके लिहितात; झाडाच्या पारावर त्याचे प्रयोग करतात. त्यांच्या प्रगटलेल्या प्रत्येक उद्गारामागे त्यांच्या आक्रोशाचा आवेग आपल्याला जाणवतो. पन्नास वर्षांपूर्वी जे काम विद्रोही साहित्यानं केलं, नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्या कवितांनी, अण्णा भाऊ साठे, दया पवार, गंगाधर पानतावणे, शाहीर अमर शेख ही सारी मूर्तिमंत ‘चळवळ’ असलेली माणसं होती. चळवळीतलं हे साहित्य मराठी वाङ्मयाचा प्रवाह सशक्त आणि समृध्द करणारं ठरलं. आज याच तोडीचे काम आजचा ग्रामीण युवक साहित्यिक करतो. अमळनेर ही साहित्य, शिक्षण ,सांस्कृतिक केंद्र आहे व तालुक्यामध्ये साहित्यिकांची खान आहे ही अभिमानाची गोष्ट आहे..
कवी बहिणाबाई चौधरी हे चालतं बोलतोय एक विद्यापीठ होते.बहिणाबाईच्या कवितांतून निसर्ग आपल्याला अनेक रुपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाची कितीतरी रुपं बहिणाबाईच्या कवितांतून भेटतात. बहिणाबाईचे आयुष्य शेती आणि घर अशा दोन टप्प्यांतले असल्यामुळे निसर्गविषयक काव्य करताना त्यातून आपोआपच आपल्याला शेतीशी संबंधित ब-याच घटनांचे चित्रण जाणवते.
केशवसुत, बालकवी,ना.धो महानोर, त्यांच्याही कविता जीवनाला दिशा देतात.
शिवाजी महाराज नाट्य सभागृहातील तुडंब भरलेला हॉल ही दर्दी लोक शांततेने ऐकताहेत याचा मोठा मला आनंद आहे… अमळनेरच्या रसिक श्रोत्यांनी ऐकलेत आणि त्यांच्या काळजाची जमीन मशागत करून यशस्वी झाले.
माझ्यातला शिक्षक , कार्यकर्ता, लेखक, वक्ता, पालक ताजा ठेवला असेल तर तो परमपूज्य सानेगुरुजीनीं..
समाज अंतर बाह्य सुंदर करण्यासाठी समाज निरोगी करण्यासाठी जो कार्यकर्ता तो शिक्षक जो लेखक जो स्वतः जो नागरिक अहोरात्र राबतो, कष्ट व तो घाम शिवतो असा जो कार्यकर्ता आहे त्याचा हात रात्री परमेश्वर हातात हात घेऊन तो दाबत असतो.
मला जर नियतीने चैतन्यांनी निसर्गांनी जर श्वास दिला असतील तर त्यांनी दिलेले आहेत.. पण मी काय करू? ते मला तरी देता आले तर कदाचित माझे श्वास संपतील.. तेव्हा त्याच्या श्वासातून मी जगणार नाही का? ती भावना आपण ठेवलीच तर आपले काम करण्याचा उत्साह वाढेल..
आईने मला विशेष म्हणजे लीन नम्र स्वाभिमान दिला..वडिलांनी ग्रंथालय लावून दिले होते..धान्य पोषण करतील, पुस्तक मशागत करतील..आयुष्यात मिळालेले डंक उदयाचे पंख होतात
दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे आहे..
धावतो तो झरा,थाबतं ते डबकं हे सांगत. माणसाला आत्मभान असावे .सुखी माणूस कलावंत होऊ शकत नाही..
हवं तेव्हा जे मिळत नाही याला जीवन म्हणतात असे त्यांनी सांगत शो त्यांना मंत्रमुग्ध केले व अनेक कविता त्यांनी सादर केल्या शिवाजी नाट्य सभागृहात 700 पेक्षा अधिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. याचा सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांना मनापासून आनंद झाला..

उत्कृष्ट सूत्रसंचालिका मराठी वाड्:मय मंडळाच्या सदस्या वसुंधरा दशरथ लांडगे यांनी ‘शाल’ शब्दाला ‘महावस्त्र’ शब्दाची जोड दिल्यामुळे प्रवीण दवणे यांनी त्यांची अभिनंदन केले..
व्यासपीठावर प्रमुख सुप्रसिद्ध कवी प्रविण दवणे ,सौ प्रज्ञा दवणे,
मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी,मंडळाचे सदस्य भैय्यासाहेब मगर, प्रा.श्याम पवार,बजरंग अग्रवाल,
प्रमुख अतिथी नर्मदा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ अनिल शिंदे,डॉ दिपाली शिंदे होते..
पाहूण्याचा परिचय मंडळाचे सदस्य सौ वसुंधरा लांडगे यांनी केला.
साहित्य संमेलनाच्या अभिवाचन स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला..
निंबा पाटील मुंबई यांनी १ लाख ६० विद्यार्थ्यांना नोकरी, दिली त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविक करतांना डॉ अनिल शिंदे म्हणाले की अमळनेर साहित्यिक,शैक्षणिक, दानशूरांची भूमी आहे असे सांगत मराठी वाड्:मय मंडळाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या..
व्याख्यान मालीका यशस्वी करण्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ,कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप
घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब
मगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम
पवार, प्रा.शीला पाटील, स्विकृत
सदस्य अजय केले, बजरंगलाल
अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे यांनी
केले आहे.
सुत्रसंचालन मराठी वाड्:मय मंडळाचे सदस्या सौ वसुंधरा लांडगे यांनी केले तर
प्रा.डॉ.पी.बी.भराटे यांनी आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed