वाढदिवस निमित्ताने सामाजिक बांधीलकी…
सुषमाताई देसले यांनी आपल्या वाढदिवस अनाथ मुलांबरोबर साजरा करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले..
अमळनेर प्रतिनिधी-दहिवद गावाच्या मा.लोकनियुक्त सरपंच व तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक
सुषमाताई देसले यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ मुलांबरोबर साजरा केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. हा कार्यक्रम त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा साजरा करण्यासाठी आयोजित केला होता.
सुषमाताईंची सामाजिक कार्याची वाटचाल त्यांच्या पती डिवायएसपी आण्णासाहेब वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने सुषमाताईंना सामाजिक कार्यात यश मिळवण्यात मदत झाली आहे.सुषमाताईंच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करणे आणि त्यांच्या यशाचा आदर्श घेणे योग्य आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
सविस्तर माहिती अशी कि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सौ सुषमा ताई वासुदेव देसले पाटील यांनी आपला वाढदिवस अत्यंत वेगळ्या आणि साध्या पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारातील अनाथ पाल्यांचे शिक्षण आणि संगोपन जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील “आधारतीर्थ “या आश्रमात भेट देऊन तेथील अनाथ पाल्य यांच्यासोबत पूर्ण दिवस राहून त्यांच्या समस्या जाणून त्यावर एक मदत रुपी फुंकर घालण्याचा प्रयत्न केला अनाथ पाल्य राहत असलेल्या वस्तीगृहात भेट देऊन त्या वस्तूगृहातील शुशोभीकरण मुलांसाठी टेबल खुर्च्या उपलब्ध करून दिल्या तसेच वस्तीगृहाला पडदे,मेटिंग अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्या .सोबतच संपूर्ण वस्तीगृहाचं पालकत्व स्वीकारलं ,सर्व अनाथ पाल्य सोबत भोजन केले त्यांचे सोबत जादूगाराचे जादू कार्यक्रम अनाथ मुलांना प्रेरणा व त्यांच्यामध्ये विकासाच्या वाटचाल होण्याचे दृष्टिकोनातून आश्रमात आयोजित करण्यात आले होते या सर्व मदतीने व त्यांनी अनाथ मुलांसमोर घेतलेला
आजच्या दिवसामुळे पाल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला या संस्थेचे प्रमुख श्री त्र्यंबक गायकवाड व अशोक गायकवाड यांनी पाल्यांची जी सुविधा व काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाय योजना यांचे देखील सुषमाताई यांनी कौतुक केले, सौ सुषमा ताई या नेहमीच आपला वाढदिवस सामान्य जनता व अनाथ सर्व गरजु लोकांसाठी साजरा करत असतात मागील वर्षी देखील त्यांनी अशाच अनाथ आश्रम या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा केला होता कृषी संचालिका असल्याने शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या समस्या त्याची जाण असल्याने त्यांनी आज आपल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांन सोबत अनाथ आश्रम मध्ये आपला वाढदिवस साजरा केलेला या ठिकाणी अनाथ आश्रम चे लहान मुलं मुलींनी देखील तेवढ्याच पद्धतीने सुषमाताई यांचे स्वागत केलं आणि आपापल्या विविध कला गुणांची एक चुनुक दाखवली त्यांचे दुःख हलके करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.