साने गुरुजींनी लोकांना प्रेमाचा संदेश दिला-
सौ सुनिता मोरे
युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे साने गुरुजी जयंती निमित्ताने व्याख्यान संपन्न
अमळनेर प्रतिनिधी-
समाजकारण, राजकारण, साहित्यनिर्मिती, पत्रकारिता, सामाजिक तत्त्वज्ञान, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रांत भरीव व विधायक कामगिरी करून मातृत्व आणि क्षमाशीलता याचे नवे परिमाण स्वत:च्या उदाहरणाने जगासमोर ठेवणारे साने गुरुजी ही नियतीची मानवतेला दिलेली अलौकिक देणगी होती. १८९९मध्ये जन्माला आलेल्या साने गुरुजींनी वयाच्या अवघ्या ५१व्या वर्षीच आपली जीवनयात्रा संपवली; पण त्यांच्या कर्तृत्वाच्या छटा आजही महाराष्ट्रातील पिढ्यांवर पाहायला मिळतात सानेगुरुजी यांनी भारताच्या एकात्मतेसाठी कार्य करत त्यांनी सर्वधर्मसमभावाचा प्रचार केला
असे महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर येथे
समता युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत प्रा अशोक पवार व प्रा डॉ लीलाधर पाटील ,प्रा.गौतम मोरे रामेश्वर भदाणे आयोजित सौ सुनिता मोरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
विचारपिठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी होते.अगोदर पूज्य सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.अगोदर सौ सुनिता मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी बोलतांना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की
सानेगुरुजी यांनी ‘जागृत भारत’ या साप्ताहिकातून लोकांमध्ये देशभक्ती आणि सामाजिक सुधारणांचा प्रचार केला. साने गुरुजींनी जातीभेद, अज्ञान, आणि अन्याय यांविरुद्ध लढा दिला. असे सांगितले.यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते… कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आय.आर.महाजन यांनी केले.. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले..