*’प्रताप’चे डॉ.जयंत पटवर्धन सेवानिवृत्त*
—————————————————
● डॉ.जयंत पटवर्धन यांनी 37 वर्ष सेवा दिली
● डॉ.पटवर्धन यांचे संस्थात्मक, सामाजिक,
राजकीय,शैक्षणिक योगदान महत्वपूर्ण
● डॉ.पटवर्धन यांनी सेवानिवृत्ती नंतर सामाजिक व सार्वजनिक हितास्तव कार्य करावे अशी अपेक्षा खासदार स्मिताताई वाघ,जेष्ठ कुंदनशेठ अग्रवाल यांनी केले.
● डॉ.पटवर्धन यांनी खान्देशातील पर्यटन यावर
ग्रंथ लिहावे-प्राचार्य डॉ.अरुण जैन
——————————————————–
अमळनेर: येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.जयंत बळवंत पटवर्धन हे नियत वयोमानानुसार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी 37 वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीतून सेवानिवृत्त झाले आहेत.
त्यांच्या सेवापूर्ती निरोप समारंभ प्रताप महाविद्यालयातील पूज्य साने गुरुजी सभागृहात दुपारी तीन ते साडेपाच दरम्यान संपन्न झाला. प्रस्तुत सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तथा खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस डॉ. अरुण जैन हे होते.याप्रसंगी विचार मंचावर खानदेश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष, ज्येष्ठ मा.कुंदन शेठ अग्रवाल,एरंडोल लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या सह खा.शि.मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विवेकानंदजी भांडारकर, माजी कार्याध्यक्ष श्री दिलीपजी जैन,सेवानिवृत्त प्रा.पी.टी.धर्माधिकारी, प्रा.एम एस बडगुजर दादा तसेच सत्कारमूर्ती डॉ.जयंत पटवर्धन आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ अनुपमा पटवर्धन या यावेळी मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम समारंभाचे अध्यक्ष, मुख्य अतिथी,शहरातील मान्यवर यांचे स्वागत संस्थेचे सहचिटणीस,उपप्राचार्य यांनी केले. याचप्रमाणे अन्य उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्रताप महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
प्रस्तुत सेवापूर्ती निरोप समारंभाच्या निमित्ताने प्रा. पी टी धर्माधिकारी, प्रा.एम एस बडगुजर, श्री विवेकानंद भांडारकर, श्री दिलीप जैन, श्री प्रा. यु.जी देशपांडे,प्रा.एस आर पाटील, प्रा.सोमानी दादा,डॉ. धनंजय चौधरी,खासदार स्मिताताई वाघ, लालाजी ऊर्फ कुंदनशेठ अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आदरणीय कुंदनशेठ यावेळी बोलताना असे म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे तसेच ते पुढे म्हणाले की सार्वजनिक जीवनात जगत असताना मन- विचार- अध्यात्म यांचा मार्ग स्वीकारला पाहिजे.त्याबळावर आपण सदाचरण व माणुसकीच्या मूल्याच्या संदर्भात मार्गक्रमण करू शकतो, सेवानिवृत्ती नंतर राजकारण न करता आदर्श मूल्य अंगीकारले पाहिजेत, उच्च शिक्षणात सातत्याने सेवा दिल्यानंतर जे अनुभव पाठीशी आहे त्या अनुभवाचा लाभ सार्वजनिक कल्याणासाठी आवश्यक आहे ही भूमिका कुंदनशेठ अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार श्रीमती स्मिताताई वाघ म्हणाले की, डॉ.जे बी पटवर्धन यांनी सेवानिवृत्ती नंतर आपलं आयुष्य राजकारणात समर्पित केले पाहिजे.ते एक शांत, संयमी व अभ्यासू प्राध्यापक आहेत त्यांचा सामाजिक ऋणानुबंध हा व्यापक आहे, अशी भूमिका लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांनी यावेळी व्यक्त केले.
सेवापूर्ती निरोप समारंभाच्या वेळी दहापेक्षा अधिक प्राध्यापकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. त्या सत्कारास उत्तर देताना
डॉ.जयंत पटवर्धन यांनी 1987 ते 2024 पर्यंतच्या आपला शैक्षणिक जीवनपट यावेळी उलगडून दाखविला, त्यांनी आपल्या 37 वर्षाच्या शैक्षणिक कारकीर्द मध्ये आलेले अनुभव कथन केले. याप्रसंगी त्यांनी ज्या ज्या शिक्षकांनी व प्राध्यापकांनी सहकार्य केले त्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केले. यावेळी पूज्य साने गुरुजी समवेत कार्य केलेले आदरणीय नारायण जयराम मराठे (वय वर्ष 97) हे सेवापूर्ती निरोप समारंभ प्रसंगी आवर्जून उपस्थित होते.
या समारंभाच्या निमित्ताने गावातील सामाजिक व राजकीय प्रतिष्ठित मंडळी देखील उपस्थित होते यामध्ये आदरणीय श्री नरेंद्र निकुंभ,श्री.राजेंद्र निकुंभ,दिनेश नाईक,अभिषेक पाटील त्याचप्रमाणे श्री शितल देशमुख,प्रा.सोमाणी दादा हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण जैन म्हणाले की,डॉ.जयंत पटवर्धन हे माझे बालमित्र असून त्यांना संस्थेने दिलेली जबाबदारी अत्यंत उत्साहपूर्णरित्या पार पाडतात. त्यांनी पटवर्धन सरांना उर्वरित आयुष्य हे समाधानाचे व सामाजिक दृष्टीने कार्याची जावो अशा पद्धतीच्या सदिच्छा यावेळी दिल्या. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सेवापूर्ती निरोप समारंभाचे सूत्रसंचालन व आभाराची जवाबदारी उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे यांनी पार पाडली.