कल्याण डोंबिवली महानगरपालिका, क्षेत्रात
नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची प्रथम चाचणी नियोजनबद्ध पध्दतीने संपन्न!
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी), महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना) विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी 23/03/2025 रविवारी घेण्यासाठी वेळापत्रक दिलेले होते. या चाचणीचे पुर्व नियोजन कडोंमपा शिक्षण विभागाने नियोजनबद्ध प्रकारे केलेले होते, त्यासाठी सि.आर.सी. प्रमुख आणि परिक्षा केंद्रांचे संचालक यांना मिटिंगमध्ये महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. सि.आर.सी. प्रमुखांचे परिक्षा केंद्रावर नियंत्रण होते. क. डो. मनपा शिक्षण विभाग क्षेत्रात एकूण असाक्षरांची नोंदणी 2249 एवढी झाली असून त्यापैकी मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती माध्यम मिळून एकूण 2055 असाक्षरांची प्रथम चाचणी घेण्यात आली असुन एकूण 352 परिक्षा केंद्रावर असाक्षरांची परिक्षा आज सकाळी 10.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत घेण्यात आली. सदरील परिक्षा केंद्रावर अधिकारी, समग्र शिक्षाचे कर्मचारी, कर्मचारी यांच्या भेटी परिक्षेच्या वेळी झाल्या. वरिष्ठ नागरिक यांनी देखील काही ठिकाणी असाक्षरांची चाचणी दिली. सदरील परिक्षेच्या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, यांच्या आदेशानुसार आणि सुचनेनुसार सदरील परिक्षा चांगल्या व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकारी, विस्तार अधिकारी, सहा. कार्यक्रम अधिकारी, विषय तज्ञ व विषेश शिक्षक (SSA) सर्व सिआरसी प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांचे सहकार्य मिळाले. शिक्षण विभागाचे सदरील परिक्षेचे कामकाज या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी विजय सरकटे शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली झाले या परिक्षेसाठी श्री. चंद्रमणी सरदार, सर्व विषय तज्ञ तसेच तंत्रस्नेही शिक्षक विलास लिखार यांनी विशेष परिश्रम घेत नियोजनबद्ध काम पाहिले.