• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर शहरात विजेचे लपंडाव तर पाणी करिता नागरिक त्रस्त —-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ने मांडली व्यथा

Apr 25, 2025

Loading

अमळनेर शहरात विजेचे लपंडाव तर पाणी करिता नागरिक त्रस्त —-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ने मांडली व्यथा

अमळनेर प्रतिनिधी-दिनांक २४ एप्रिल २५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांनी मान. अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री नेमाडे साहेब महावितरण कंपनी उपविभाग -१ यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की अमळनेर शहरातील कोणतेही भागातील उच्च दाब व लघु दाब वाहिनीवरील वीज दुरुस्ती करण्यासाठी कुठलेही पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा वारंवार खंडित केला जात आहे त्यामुळे वीज ग्राहकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे जसे नळांना पाणी आल्यास पाणी भरणे शक्य होत नाही तसेच दुपारी व संध्याकाळी उन्हाचे दिवस असल्याने घरात पंखे कुलर अचानक बंद होतात त्यामुळे वीज ग्राहकांना तसेच वयोवृद्ध, गृहिणी आणि बालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. चौकशी करता आपल्या कक्ष कार्यालयात फोन केल्यास ते कोणते प्रकारचे प्रतिसाद देत नाही किंवा फोन बंद असल्याचे समजते .तरी आपण जातीने लक्ष घालून वीज पुरवठा विना सूचना न देता खंडित करू नये अशी सूचना वजा तक्रार करण्यात आली आहे.

 

 

 

 

मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अमळनेर शहरात विविध ठिकाणी मुंदडा नगर व लक्ष्मीनगर आदी भागात जलवाहिनी फुटल्याने व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे आणि ग्राहकांच्या तक्रार झाले नसून आपण पाणी कराबाबत नियमित करवसुली करिता आहात व उशीर झाल्यावर त्यावर शास्ती दंड सुद्धा आकारत आहात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमान अतिशय वाढलेले आहे आणि पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे पाणी अत्यावश्यक सेवेमध्ये येते व पाणी पुरवठा बाबत विलंब हा एक नागरी अथवा ग्राहक सेवेची त्रुटी मध्ये गणली जाते व ती जबाबदारी आपण टाळू शकत नाही तरी आपण ग्राहकांची नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण तातडीने अंमलबजावणी करून ग्राहकांना नियमित पाणीपुरवठा करावा व याबाबत होणारा ग्राहकांना नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशी तक्रार वजा सूचना करण्यात आलेली आहे. तसेच निवेदनात पुढे म्हटले आहे की आगामी नूतन वर्षात सन २०२५-२०२६ या वर्षात आपण लोक वर्गणी नागरिकांकडून आकारणार नाही असे आम्हाला आश्वासन दिलेले होते तरी यावर्षीचे बिलात आपण ती आकारणी करू नये अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. अमळनेर नगर परिषदे तर्फे उपमुख्य अधिकारी श्री चव्हाण यांनी साहेब यांनी निवेदन स्वीकारले.
या प्रसंगी सौ स्मिता चंद्रात्रे अध्यक्ष, एडवोकेट सौ भारती अग्रवाल महिला प्रांत प्रमुख, सौ वनश्री अमृतकर सचिव, मकसूद बोहरी जिल्हा पालक, विजय शुक्ल जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख, जिल्हा ऊर्जा प्रमुख सुनील वाघ आणि जिल्हा उपसचिव व सेवानिवृत्त मुख्याध्यापक सतीश देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती पी आर ओ सौ मेहराज बोहरी कळवितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *