- अमळनेरला महिला करत आहेत समाज प्रबोधन….
- धकाधकीच्या आयुष्यात मुलींच्या सुरक्षिततेसाठी आईंची जागरूकता गरजेची
- योग्य मार्गदर्शनातून मुलींच्या भविष्याचा उज्ज्वल मार्ग – सामाजिक बदलाचा संदेश
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आजच्या धकाधकीच्या व तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगात पालक विशेषतः आई म्हणुन आपल्या मुलींकडे पुरेशी काळजी घेणे अवघड झाले आहे. आर्थिक ताणतणावांमध्ये अडकलेल्या पालकांसाठी मुलांची मानसिक व सामाजिक स्थिती समजून घेणे आणि त्यावर योग्य लक्ष ठेवणे हे आव्हान बनले आहे. मोबाइल, टीव्ही, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांच्या प्रभावामुळे किशोरवयीन मुली भावनिक त्रासात किंवा चुकीच्या निर्णयांत अडखळण्याची शक्यता वाढली आहे. या चुकीच्या निर्णयांमुळे केवळ त्या मुलींच्या जीवनावरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक व सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
या गंभीर समस्येकडे लक्ष देत “मुलींचे संरक्षण व योग्य जोडीदार निवडीची बाब” या विषयावर आयोजित केलेल्या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. शीला पाटील यांनी प्रास्ताविक करून पालकांचे कुटुंबातील नातेवाईकांशी असलेले संबंध, मुलांशी संवादाचा अभाव, लैंगिक शिक्षण आणि सामाजिक माध्यमांचा प्रभाव या विषयांवर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांच्या मार्गदर्शनातून पालकांनी आपल्या मुलींच्या नाजुक मानसिकतेला योग्य समजुन घेत पुढील काळजी घ्यावी, असे उपदेश दिले.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या सौ. सुलोचना ताई वाघ यांनी मुलांमधील बंडखोरीचे कारण काय असते, घरातील सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व आणि आईंच्या वर्तनामध्ये कसे बदल करावे जेणेकरून मुलींना अधिक सहकार्य व समज मिळू शकेल, याबाबतीत सखोल माहिती दिली. त्यांनी मातांसमोर मुलींची मानसिकता समजावून सांगितली आणि योग्य संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
सौ. तिलोत्तमाताईं पाटील यांनी पालकांना पुढे येऊन आपल्या समाजातील उपेक्षित महिला आणि मुलींसाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन केले. त्यांनी आवश्यक असल्यास संपर्क साधण्यासही प्रोत्साहित केले. चर्चेत सहभागी झालेल्या महिलांनी आपापले अनुभव सांगितले व विषयावर प्रगल्भ चर्चा घडवून आणली.
सुत्रसंचालिका सौ. करुणा सोनार यांनी कार्यक्रमाला सांगीतिकरित्या सुरेखपणे मार्गदर्शन केले तर सौ. कृपाली पाटील यांनी आभार प्रदर्शन करून या कार्यक्रमाला यशस्वी बनवले. सर्व महिलांनी या चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेत मुलींच्या पुढील भविष्याच्या दृष्टीने मुलींसाठी योग्य जोडीदार निवडण्याचे, त्यांच्या संरक्षणाचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा संदेश दिला.
या कार्यक्रमातून स्पष्ट झाले की, आजच्या बदलत्या सामाजिक प्रसंगांत आईंची जागरूक भूमिका गरजेची आहे. योग्य मार्गदर्शन व सकारात्मक संवादामुळे मुली भरकटण्याची शक्यता कमी केली जाऊ शकते व पुढील पिढीला मजबूत व सजग बनवता येऊ शकते. अशा सामाजिक उपक्रमांनीच समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची शक्यता निर्माण होते आणि काळाच्या गरजा ओळखून हराण होण्याऐवजी भरभराटीसाठी मार्गदर्शन प्राप्त होईल.
हा उपक्रम प्रत्येक कुटुंब व समाजासाठी एक प्रेरणादायक धडा असून, वेगवेगळ्या स्तरावर अश्या मार्गदर्शन बैठका नियमित करण्यात याव्यात, ही सर्वांचा मनापासून अपेक्षा आहे.