*”भाजपा अमळनेरकडून विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली; पाडळसरे धरणास मान्यता – विकासासोबत संवेदनशीलतेचा आदर्श”*
अहमदाबाद येथे आज झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले असून, या दुर्घटनेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, गुजरातचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विजय रुपाणी यांचेही दुर्दैवी निधन झाले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अमळनेरच्यावतीने महाराणा प्रताप चौक येथे अपघातग्रस्त नागरिकांना व स्व. विजय रुपाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे मौन पाळत मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
आजचा दिवस अमळनेरसाठी अत्यंत महत्त्वाचा पण होता, कारण आजच केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड (PIB) कडून पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पास ₹८५९ कोटींची आर्थिक मान्यता मिळण्याचे संकेत प्राप्त झाले. हा प्रकल्प अमळनेर व परिसराच्या सिंचन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मात्र, देशात घडलेल्या या शोकांतिक घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव न साजरा करता, अत्यंत संयमितपणे श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कार्यकर्त्यांनी कृतज्ञता व शोक यांचा समतोल राखत आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
या वेळी भाजपा पदाधिकारी शहर अध्यक्ष योगेश महाजन, तालुका अध्यक्ष राहुल पाटील, ड्रॉ अनिल शिंदे, संदीप पाटील,नगरसेवक श्याम पाटील,महेश पाटील, हरचंद लांडगे,महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी पाटील,यु मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे,समाधान पाटील, सुभाष पाटील, भरतशिंग परदेशीं, रमेश देव शिरसाठ, सौरव पाटील,कल्पेश पाटील, तिल्लोतमा पाटील, नरेंद्र पाटील, नरेंद्र सोनवणे,भावेश जैन, सागर शेठे,राजेश खरारे,मनीषा पाटील, अक्षय पाटील, निखिल पाटील, आकाश पाटील व भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाने एकात्मता, मानवतेची जाणीव आणि जबाबदारीची भावना अधोरेखित केली.