• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती म्हणजे मा.अशोकजी बिऱ्हाडे साहेब…

Dec 29, 2022

Loading

आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती म्हणजे मा.अशोकजी बिऱ्हाडे साहेब…

शिक्षण घेत असतांना, समाजात वावरतांना, विविध उपक्रमात, सामाजिक चळवळीत अनेक माणसे भेटतात... माझा ही सामाजिक चळवळीशी संबंध आला..जळगाव मधील सत्यशोधक चळवळीत काम करणारे तसेच पुरोगामी वक्त्यांच्या भाषणाने मन त्या विवेकी विचाराने भारावले गेले.. दैववादी विचाराचे जीवन जगत असतांना सत्य सांगणारे, वैज्ञानिक, विवेकवादी दृष्टीकोण देणारे विचार जीवनात आले आणि प्रत्यक्ष अनुभवांती ते स्वीकारले.. कळमसरे येथे शारदा माध्यमिक हायस्कुल मध्ये नोकरी लागली आणि अमळनेर परिसरात वावर सुरु झाला... अमळनेरात सत्यशोधक चळवळीचे काम करणारे नाशिकचे श्रावण देवरे महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी यायचे ते मुलांमध्ये महात्मा फुले यांचे विचार रुजण्यासाठी 8वी ते 12 वी च्या मुलांना महापुरुषाच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी परीक्षा घ्यायचे व नंतर बक्षीस वितरणासाठी एखाद्या वक्त्याला बोलवून कार्यक्रम घ्यायचे... ह्या माध्यमातून ह्या चळवळीशी जुळलो गेलो.. एकदा राज्यघटनेवर आधारित तालुक्यात निबंध स्पर्धा झाली त्यात मला बक्षीस मिळाले.. त्या कार्यक्रमात आदरणीय बिऱ्हाडे साहेबांशी ओळख झाली.. त्यावेळी ते शिक्षण विस्तार अधिकारी होते.. त्यांचे कळमसरे येथे सामाजिक कार्यक्रमात येणे जाणे चालू होते.. त्या माध्यमातून मी त्यांच्या वैचारिक भूमिका असलेला अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांच्याशी जुळलो गेलो.. अशा ह्या विज्ञानवादी विचार करणाऱ्या, प्रचंड वाचन असणाऱ्या, उदार अंतःकरण असलेल्या, मैत्री दुनियेतील राजा माणसाची ओळख झाली.. प्रत्येक शाळेतून चांगल्या लोकांना हेरण्याचे कौशल्य बिऱ्हाडे साहेबांकडून शिकण्यासारखे आहे..साहेबांना कोणतीही गोष्ट पूर्ण जाणूनच मत मांडण्याची सवय होती.. ही सवय खूप महत्वाची आहे.. अनेक पुस्तकांचा संदर्भ घेऊनच साहेब विचार मांडतात.. अगदी मार्मिक पद्धतीने विचार समोरच्यापर्यंत पोहचविण्याचे कसब त्यांच्याकडे आहे.. भाषणात नावीन्यता असायची.. बुद्धीला पटतील असे विचार ते सामाजिक कार्यक्रमात मांडायचे..वाचन करण्याची सवय त्यांना लहानपणापासून असल्याचे ते सांगतात.. घरात वडील चांगले वाचक होते..मोठे भाऊ हे व्यासंगी आहे.. चळवळीत त्यांचे योगदान आहे.. कोणतीही बाब समजल्यावर त्या मार्गाने कृती करण्याची जणू त्यांच्या पिढीला सवय आहे.. वडिलांच्या मुंबईच्या वास्तव्याने डॉक्टर बाबासाहेबांच्या घरी जाणे येणे व चळवळीत वडील मा. दामू अण्णा बिऱ्हाडे यांचे सक्रिय योगदान होते.. त्या विचाराचा वारसा मुलांनीही चालवून उतराई होण्याचा प्रयत्न केला.. खूप पुस्तके वाचून त्याचे टिपण काढण्याची सवय त्यांना अचूक मांडणी करण्यास उपयुक्त पडली.. चांगल्या लोकांच्या उत्तम सवयीला त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.. चळवळीत लोकांना प्रेमाने, आपुलकीने जवळ करणे हे त्यांचे प्रभावी कौशल्य आहे.. माणसाला जोडण्याची खुबी साहेबामध्ये ओतप्रोत भरलेली आहे.संघटनकौशल्य हे साहेबांना अवगत सर्वोतम कौशल्य आहे.. अनेक लोकांना जोडून त्यांना चांगल्या पदावर पोहचविण्यास साहेबांनी मदत केलेली आहे.. कित्येक लोकांना मार्गदर्शन करून मोठे केलेले आहे.हे सर्व करतांना कुठेही बडेजावपणा दाखविला नाही. कुठेही मी केले हा भाव दाखविला नाही.स्वतः बऱ्याच लोकांना आर्थिक मदत करून सामाजिक योगदान दिलेले आहे.. जो संपर्कात आला तो साहेबांचा झाला हे सर्वश्रुत आहे.. वरवर लोकांना कडक शिस्त जरी वाटत असली तरी मृदू हृदय असलेला व्यक्ती आहे.पंचायत राज कमिटीने त्यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव करून राज्य शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला होता व सन्मान केला होता .शैक्षणिक कामात त्यांनी चोख काम केले.. गुणवत्ता वाढण्यासाठी त्यांचा खटाटोप होता.. कित्येक शिक्षक, अधिकारी, सामान्य माणसे यांच्याशी प्रेमाचे संबंध आहे..आपल्या दातृत्वाने कुणाचे भले होत असेल तर ते पुढाकार घेऊन साहेब करीत आलेले आहे.. सामाजिक कार्यात झोकून देऊन त्यांनी काम केलेले आहे. कित्येक शिक्षक मंडळींना त्यांनी चांगलाच सल्ला दिला.. त्यांना पुढे नेण्यात सरांना आनंद होतो तो स्वतः पुढे जातांना होत नाही त्याच्या कैक पटीत त्यांना दुसर्यांना चांगलं पाहण्यात होतो... माणसातील अचूक गुण ओळखून त्यांना अजून यशस्वी कस करायचे हा विचार सदैव त्यांच्या मनात घोळत असतो.. भडगाव ला नोकरी करतांना श्री किसन सूर्यवंशी सारख्या मित्राला योग्य सल्ला देऊन पुढे जाण्यास सुचविले. पुरोगामी चळवळीत भाषण करण्यास प्रोत्साहन दिले.. अमळनेर तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी असतांना शाळेत महापुरुषांच्या जयंत्या, स्मृतिदिन या बाबत परिपत्रक काढून महापुरुषाची कृतज्ञता व्यक्त करण्यास प्रेरणा दिली.. शहरात व खेड्यात प्रगतीशील चळवळ कशी रुजेल यासाठी विविध कार्यक्रमाचे नियोजन करून वक्त्यांची भाषणे ठेवली.. खेड्यात महापुरुषाची चळवळ पोहचविण्यास हातभार लावला.. बऱ्याच पुरोगामी संघटनांबरोबर राहून चळवळ पुढे जाण्यासाठी सहकार्य केले.महापुरुषाच्या कार्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या सर्व चांगल्या संघटनाशी साहेबांचे चांगले संबंध आहे . धरणगाव येथे काम करीत असतांना अनेक कार्यक्रम आयोजित करून माणसांची फळी तयार केली. शिक्षक पारेराव गुरुजी सारखे अनेक लोक चळवळीशी जोडून नोकरीतून जो वेळ मिळेल त्याचा योग्य सदुपयोग करून धरणगाव तालुक्यात चांगली चळवळ वाढविली . घरून जाण्याची वेळ निश्चित होती पण घरी चळवळीचे काम करूनच घरी यायचे.. बऱ्याच गावात प्रगतीशील विचार पोहचविण्याचे धाडस करून जीवाला जीव लावणारे लोक उभे केले..

… मा. मुकुंद सपकाळे सारखा सामाजिक कार्यकर्ता भर सभेत साहेबांनी केलेल्या अनमोल सहकार्य केल्याची ग्वाही देतो की आम्हाला पुस्तके व कपडे साहेबांनी पुरवून दातृत्व दाखविले.. एक मोठया भावाप्रमाणे आम्हाला जपले असे बंधूत्वाचे नाते चळवळ उभी करतांना केले.. मानवता कशी निर्माण करता येईल हा विचार ह्या व्यक्तीने सतत केला.. छोट्या कार्यकर्त्याला कस मोठं करायचे ज्ञान साहेबांकडून शिकता येते.. सामाजिक कार्य चालू राहण्यासाठी साहेबांनी स्वतः बऱ्याच सप्ताहिकांना पेपर छापण्याचे आवाहन केले. काही लेखकांना पुरोगामी लेखन, वैचारिक लेखन करण्यास प्रेरित केले..
क्रांतिकारी बुद्ध, तात्यासाहेब जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मा. आ. ह. साळुंखे, मा. मेश्राम साहेब, मा. म. देशमुख, रावसाहेब कसबे ह्या विचारवंतांचा
त्यांच्यावर प्रभाव आहे. कोणताही पुरोगामी विचार बुद्धीने पडताळून पाहण्याची व नंतर स्वीकारण्याची सवय एका उत्तम समीक्षकाची पद्धत त्यांच्यात दिसते..कोणताही विचार पारखून घेत ते स्वीकारत असतात..
साहेबांकडे संवेदनशील मन आहे.. दुसऱ्याचे दुःख पाहून मन अस्वस्थ होते.. करुणा, दया ह्या गोष्टी जीवनात ठासून भरलेल्या आहे.. सर्वांचं भलं व्हावं ही मनिषा बाळगणारा माणुसकी असलेला साहेब माझ्या जीवनात मिळाला याचा आनंद मला आहे.. त्यांचे हृदय करुणा प्रसवत हे त्यांच्या मुलाचे देहवसान झाले तेव्हा त्यांनी चुकीच्या उपचाराने मुलाच्या मरणास कारणीभूत ठरणारास मोठया करुणामय हृदयाने माफ केले.. किती ही मोठी उदारता जी त्यांना तथागत बुद्धाच्या विचाराची मांदियाळी जीवनात आणल्याने मिळाली.. त्यांनी क्रांतिकारी बुध्द स्वीकारला जो बाबासाहेबांनी साहित्यात मांडला..महापुरुषांचे विचार जीवनात आणण्याचा अटोकाट प्रयत्न करतात..
साहेब हे प्रेमळ हृदयाचे आहेत त्यांनी मुला मुलीच्या मित्रांना ही स्वतः च्या मुलामुली प्रमाणे प्रेम केले.. युवकांना तेजस्वी विचाराने उभे केले.. त्यांची प्रेरणा बसलेल्याना उठविते, उठलेल्यांना चालवीते, चालणाऱ्यांना धावायला लागते..
बरेच लोक भाषणापूर्वी काय मांडावे यासाठी साहेबांशी चर्चा करतात इतका सखोल अभ्यास साहेबांचा आहे.. साहेबांना पारखी नजर म्हणतात ती उपजत लाभली आहे. डॉक्टरप्रमाणे कोणता उपचार कुठे लागू पडेल याचे ज्ञान असते त्याप्रमाणे कुठे कोणते विचार रुजतील याची माहिती साहेबांना तंतोतंत असते.. अनेक विचारवंतांशी त्यांचे खूप चांगले संबंध आहेत.चर्चा करून पुरोगामी व्यक्तींना जोडून ठेवणं त्यांना आवडत.. त्यांना एक उत्तम सवय आहे ती म्हणजे चांगले पुस्तक, विचार, लेख संबंधित लोकांना देणे.. जे आपल्याशी ठावे ते सकलाशी सांगावे ह्या अभंगाप्रमाणे कृती जोपासत असतात.. कुठेही पुरोगामी महापुरुषांच्या विचारबाबत प्रबोधन असेल तिथे जातात. नवीन गोष्टी शिकून घेण्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आपल्या कमाईतील काही हिस्सा ते सामाजिक चळवळीसाठी खर्च करतात. प्रसिद्धी पासून सतत लांब राहणारे साहेब स्वतःचा फोटो देण्यास टाळतात.चांगल्या गोष्टीतून सकस, सालस, दर्जेदार घेणारा गुणग्राहक साहेब खूप वेगळा व्यक्ती आहे..

श्री सोपान भवरे सर
अतिथी संपादक मराठी लाईव्ह न्युज