
शिक्षक तथा कवि अजय भामरे काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित
अमळनेर, प्रतिनिधी-येथील शांतीनिकेतन प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक,कवी अजय भामरे यांना पारस, काव्य, कला , जनजागृती संस्था (रजि.) सानपाडा, नवी मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार व काव्य स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्यात राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कवि अजय भामरे यांचा स्वरचित कवितांचा “क्रांतीलहर” काव्यसंग्रह व इतर कवितांना मिळालेले राज्यस्तरीय पारितोषिके या कामगिरीची दखल घेऊन (काव्यरत्न पुरस्कार २०२२) सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सदर सोहळा नवी मुंबई येथे २६ डिसेंबर २०२२ रोजी पार पडला.
सदर सोहळ्यास संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष तथा कवि मंगेश चांदिवडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, प्रमुख पाहुणे साहित्यिक सुभाष झेंडे,लेखक संजय बर्वे, आयोजक सौ.शोभा चांदिवडे यासह आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
शिक्षक, पत्रकार,कवी अजय भामरे यांना हा पुरस्कार मिळाल्याने शैक्षणिक सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.