
अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती अशोक बि-हाडे
गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांचे प्रतिपादन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट वाचक म्हणून ज्यांचा मोठा अनुभव आहे ते अत्यंत साधे व हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षकीपेक्षा पासून तर गटशिक्षणाधिकारी पदापर्यंत मजल मारून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने वैचारिक माणसे जोडणारा व्यक्ती म्हणजे अशोक बि-हाडे होय.
सेवानिवृत्तीनंतर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शनाची भूमिका अशोक बि-हाडे साहेबांनी पार पाडावी असे अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील अध्यक्षीय भाषणात
शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर व युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेरआयोजित अमळनेर येथील नांदेडकर भवन येथे
सेवापूर्ती सत्करात बोलत होते.
विचारपिठावर विश्वासराव पाटील गटशिक्षणाधिकारी व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी श्याम आहिरे माजी सभापती,सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन,सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव संदीप घोरपडे,प्रा.अशोक पवार,सेवानिवृत्त केद्रप्रमुख बन्सीलाल भागवत, होते. अगोदर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रस्ताविक-प्रा.अशोक पवार यांनी केले.
अशोक बिराडे साहेब यांच्या सेवापुर्ती निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर अनेक मान्यवरांनी उजाळा दिला .त्यात सोपान भवरे तालुकाध्यक्ष ओबीसी शिक्षक असोसिएशन अमळनेर,
सुदाम महाजन मा.तहसीलदार
प्रा.सुभाष पाटील,
दत्तात्रय सोनवणे आदर्श शिक्षक,
पी.डी.पाटील महात्मा फुले हायस्कूल धरणगांव, बन्सीलाल भागवत सेवानिवृत्त केंद्रप्रमुख,
विनोद मोरे,श्याम आहिरे माजी सभापती प.स.अमळनेर,
प्रा.प्रज्ञाताई बि-हाळे,
शरद सोनवणे केद्रप्रमुख,
जी.टी.टाक जेष्ट पत्रकार
प्रा.राहूल निकम
कैलास पवार धरणगाव यांनी शोषित वंचित पिढीचा आधारवड तर एक स्वाभिमानी प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आदर्श अधिकारी म्हणून त्यांनी कार्य करत सेवानिवृत्त झाले त्यांच्यावर अनेक संकट आली त्या सर्व संकटांवर मात करून बहुजन समाजाचे कार्य ते अविरतपणे करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सांगितले.
सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थित सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक
एस.डी.देशमुख,चिंधू वानखेडे मा.केद्रप्रमुख,जेष्ठ पत्रकार जी.टी.टाक,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, ओबीसी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष डि.ए.सोनवणे,माजी ग.स संचालक
वाल्मिक पाटील,आहिरिणी साहित्यिक गोकूळ बागूल,साहित्यिक
सोपान भवरे,मोहन ताडे,सुरेश गोसावी,विश्वास पाटील,
उपप्राचार्य प्रा.उल्हास मोरे, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष,एस.पी.वाघ,
रामकृष्ण महाजन,रवींद्र चव्हाण
पुरूषोत्तम माळी, साने गुरुजी विचार मंचाचे समन्वयक दर्शना पवार, सुनील पाटील मुख्याध्यापक सानेगुरुजी, उपक्रमशिल शिक्षक डि.ए.धनगर,भिका दामू बि-हाडे
प्रा.विजय गाढे,आदर्श शिक्षक दत्तात्रय सोनवणे,हिंदी अध्यापक मंडळाचे सचीव दिलीप पाटील,
दिलीप महाजन धरणगाव,नंदलाल बैसाणे,ज्ञानेश्वर पाटील केंद्रप्रमुख
प्रा.शिवाजीराव पाटील,शेख एनैद्दीन सय्यद हसन सेवानिवृत्तमुख्याध्यापक
शेख निजामोद्दीन हुस्नुद्दीन,सेवानिवृत्त मुख्याध्यापक
महेश पाटील ग.स.संचालक
यशवंत बैसाणे अध्यक्ष आरपीआय अमळनेर,पत्रकार अजय भामरे,ईश्वर महाजन यासह अनेक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवापूर्ती निमित्ताने सत्कार प्रसंगी माननीय गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाळे साहेब म्हणाले कि
परीवाराची साथ,वडीलांचे मार्गदर्शन,भावांची व मित्र परीवारांची साथ, यामुळे जीवन यशस्वी झाले पण कोरोना सारख्या महाभयंकर साथीत मुलगा गेल्याचे मोठे दुःख आहे. यावेळी मुलगी, पत्नी व नातेवाईक,मित्रपरिवार यांनी धीर दिला.ते म्हणाले कि आज तरुण पिढीच्या रक्तात बाबासाहेब गेल्यामुळे बहुजनांचा विकास झाला नाही. बाबासाहेब यांचा विचार डोक्यात जाणे अपेक्षित होते. समाज परीवर्तनासाठी सेवानिवृत्तीनंतर अमूल्य वेळ देईल असेही त्यांनी सांगितले. आदर्श जिल्हा परिषदचे शिक्षक अशोक पाटील यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार
प्रा.विश्वास पाटील यांनी मानले. यावेळी अनेक मित्रपरिवार नातेवाईकांनी त्यांचा सहपत्नीक सत्कार केला.















