विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल नव्हे तर पुस्तक,
सकाळी 5 वाजता उठून विद्यार्थ्याना लागली अभ्यासाची गोडी
आर्यन स्कूल चे मुख्यध्यापक अविनाश जावळे यांनी सुरू केली नवीन चळवळ

सदरिल उपक्रमाला 40 दिवस पूर्ण होत असून एक ही दिवस न चुकता विद्यार्थी सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करतात
आजच्या विद्यार्थ्यांचा वेळ हा अभ्यास आणि मोबाईल यामध्ये विभागला गेला आहे.
मोबाइलचा अतिवापर हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम घडवून आणत आहे. त्यामुळे अभ्यासाविषयी एक उदासीनता निर्माण झालेली आहे.तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज प्रत्येकजण सहजरित्या मोबाईल वापरत आहे. अगदी २०१९ पर्यंत बहुतांश विद्यार्थी मोबाईल वापरत नसत, परंतु कोरोना काळात प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईलचा प्रवेश झाला. कोरोनाचा प्रभाव कमी झाला परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचे अस्तित्व मात्र वाढतच गेले.
विद्यार्थी सुरुवातीला ऑनलाईन तास, ऑनलाईन अभ्यास अशा निमित्ताने मोबाईल हाताळत होते. तेव्हा शिक्षणही ऑनलाईन होते, परंतु आता शाळा सुरू झाल्याने ऑनलाईन शिक्षण कमी झाले. तेव्हा अभ्यासासाठी हाताळत असलेला मोबाईल हा विद्यार्थ्यांसाठी कधी व्यसन बनून गेला हे पालकांना कळालेच नाही मोबाईल ग्रस्त पालकांनी आपल्या पाल्याची तक्रार शाळेचे मुख्यध्यापक अविनाश जावळे यांच्याकडे दिली यावर अविनाश जावळे यांनी एक उपक्रम सुरू केला , सर्वात अगोदर अविनाश जावळे यांनी विद्यार्थ्याना आपलं स करून घेवून त्यांना मोबाईल मुळे आपल्या बालपणावर होणारे नुकसान लक्षात आणून दिले त्यानंतर विद्यार्थ्याना मोबाईल मुळे विद्यार्थ्याचा जीवनातील मूल्यवान वेळेचे होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी विद्यार्थ्याना प्रेरित केल व सर्व विद्यार्थ्याना सकाळी 5 वाजता उठून लवकर आंघोळ करून उगवत्या सूर्याला नमस्कार घालून अभ्यासाला बसविण्याची सवय लावली यासाठी विद्यार्थ्यावर स्वतः लक्ष घालून सर्व विद्यार्थ्याना सूचना देवून सवय लावली की सकाळी 5 ला उठून मला(अविनाश जावळे यांना) कॉल लावायचा गुड मॉर्निंग बोलून अविनाश जावळे हे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा सकाळी 5 वाजता कॉल आल्यावर त्याना शालेय अभ्यासा व्यतिरिक्त अभ्यास देत असे फक्त सकाळी उठून कॉल करून झोपायचं नाही तर अभ्यास करत असताना च फोटो आणि काय अभ्यास केला याची तपशील माहिती लिहून अविनाश जावळे यांनी सकाळी दिलेला अभ्यास पूर्ण झाल्यावर सुद्धा कॉल करायला लावायचे व विद्यार्थी शाळेत आल्यावर त्यांना दिलेला अभ्यास त्यांनी तो सकाळी केला का नाही हे सुद्धा अविनाश जावळे तपासायचे यावर ही न थांबता अविनाश जावळे हे विद्यार्थी सकाळी 5ला उठून अभ्यास करता की नाही की फक्त अविनाश जावळे यांना फोन लावून विद्यार्थी परत झोपून जातात हे तपासण्यासाठी अविनाश जावळे यांनी विद्यार्थ्याच्या पालकांनाही फोन लावून सतत विचारत असत याचा एक चांगला परिणाम म्हणून जे विद्यार्थी शाळेतून घरी आल्यावर मोबाईल खेळायचे ते आज मोबाईल ला बघत सुद्धा नाही मोबाईल चा वापर फक्त कॉल साठीच करतात इतर गोष्टीसाठी विद्यार्थी आता मोबाईल घेत नाही किंवा ऑनलाइन गेम खेळण्यासाठी ही मोबाईल घेत नाही ही शिकवण अविनाश जावळे यांनी विद्यार्थ्याच्या मनात त्यांच्या या बालपणात या उपक्रमाच्या माध्यमातून रुजवली आहे ,
सदरिल उपक्रमाला 40 दिवस पूर्ण झाले असून एक ही दिवस न चुकता विद्यार्थी सकाळी उठून अभ्यास करता आहेत
या उपक्रमात जळगाव,पाळधी, शेरी, आव्हाणी, चांदसर, बांभोरी,पथराड, खेडी काढोली, इत्यादी गावातील मोठे मुलं यात सहभागी होऊन दररोज सकाळी 5 वाजता उठून अविनाश जावळे यांना नियमित दररोज कॉल लावून अविनाश जावळे यांनी दिलेला अभ्यास करतात
या उपक्रमाच्या माध्यमातून घडले अनेक बदल
दररोज सकाळी 5 वाजता उठून अविनाश जावळे यांना कॉल लावून विद्यार्थी अभ्यास घेत असत अविनाश जावळे यांनी दिलेला अभ्यास विद्यार्थ्याना दिलेला अभ्यास बरोबर केला की नाही हे अविनाश जावळे दररोज नियमित तपासत व पालकांनाही याबाबत विचारणा करत असल्याने विद्यार्थी प्रामाणिकपणे दररोज सकाळी 5 वाजता उठून अविनाश जावळे यांनी दिलेला अभ्यास वेळ करायचे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे 100 पर्यंत पाढे , 170 पर्यँर नंबर चे वर्ग (square) व वर्गमूळ (cube) , वाचन आणि लिखाण शुद्ध झाले आहेत म्हणजेच जे सामान्य अभ्यासक्रम मध्ये समाविष्ट नाही असा विशेष अभ्यास या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी अविनाश जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली केला.
या उपक्रमासाठी अविनाश जावळे यांना पालकांची ही विशेष साथ लाभली आहे.