• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

भाषा परात्मदुःखालाही प्रभावी शब्दांन्वये मानवी मूल्यांना कृतीशील करून वैश्विक नाते निर्माण करते “
मराठी राजभाषा गौरवदिनी कविसंमेलनात उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांचे प्रतिपादन

Feb 28, 2023

Loading

” भाषा परात्मदुःखालाही प्रभावी शब्दांन्वये मानवी मूल्यांना कृतीशील करून वैश्विक नाते निर्माण करते “
मराठी राजभाषा गौरवदिनी कविसंमेलनात उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांचे प्रतिपादन

” भाषा परात्मदुःखालाही प्रभावी शब्दान्वये मानवीमूल्यांना कृतीशील करून वैश्विक नाते निर्माण करते ” असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी भारदे यांनी केले.जिल्हा प्रशासन आयोजित काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन तथा कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिनानिमित्त दि . २७ फेब्रुवारी २०२३ रोजी निमंत्रितांच्या कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना भारदे मॅडम बोलत होत्या.कवी संमेलन ज्येष्ठ कवी रा.शे.साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.संमेलनाचे उद्घाटन आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे यांनी केले.उद्‌घाटकीय मार्गदर्शनात बोलताना बोबडे म्हणाले ” बोलीभाषा प्रमाण भाषेचा पाया असतो. बोलीभाषा दैनिक व्यवहारात वापरताना न्यूनगंड ठेवू नये भाषेचे बोलीत रूपांतर केल्याशिवाय भाषा जगणार नाही.नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ देऊन सदैव प्रोत्साहन दिले पाहिजे.” याप्रसंगी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मार्गदर्शनात म्हणाले , ” मातृभाषेतील शिक्षण ज्ञानोपासनेला व गुणवतेला गतीमान करते. मराठी भाषेचं वैभव व श्रीमंती सर्वसामान्यांना कळावी म्हणून मंत्रालय तथा शासन करीत असलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले.” कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.मिलिंद बागुल यांनी प्रास्ताविक केले. कवी संमेलन संयोजिका तथा उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.प्रा.डॉ.प्रदीप सुरवाडकर यांनी ( आमची राजभाषा मराठी ) , डॉ.अ.फ.भालेराव ( माय ), मुश्ताक करिमी ( पुकार ), विजय लुल्हे ( चांदरात ) , गोविंद पाटील (मराठी भाषा एक शिदोरी ) प्रा.सौ.माधुरी अहिरे (आई मला जन्म घेऊ दे ), इंदिरा जाधव ( शापग्रस्त ),सुखदेव पाटील ( लोकशाही नसती तर ) ,सचिन जंगले ( ती छोटीशी एक कळी ) ,धनराज सोनवणे ( कल्पना ) ,जितेंद्र कुंवर ( भेटशील कधी तर सांगेन ), शिवराम शिरसाट ( माय मराठी माझी ) , किशोर गायकवाड ( मराठी मातीत) भैय्यासाहेब देवरे (राजभाषा) ,अनिल ठाकूर ( कधीतरी एकदा ) , किशोर नेवे ( माय मराठी ), रागिनी चव्हाण ( वेदनांच्या वाटेवर ) ,राहुल निकम ( माय मराठी ) ,सिद्धार्थ भालेराव ( शिक्षण ) यांनी आपल्या कविता सादर केल्यात. कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.विनोद ढगे आणि सहकारी यांनी गायिलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली. सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार मुख्याध्यापिका ज्योती गोसावी यांनी मानले .कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा संस्थेचे उपसचिव सतीश खडके, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *