• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले

Sep 5, 2023

Loading

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले

इतिहास तंज्ञ,सुप्रसिद्ध वक्ते
प्रा.डॉ श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचे प्रतिपादन

प्रा.अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
व्याख्यान संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. छत्रपतींच्या राज्यात भेदभावाला थारा नव्हता. छत्रपती शिवाजीराजे समतावादी होते.
त्यांनी रयतेचे हित जोपासले. शिवाजीराजांचे राज्य केवळ एका जातीचे, धर्माचे, घराण्याचे नव्हते, तर ते रयतेचे राज्य होते. “शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका” हा आदेश
छत्रपती शिवाजी राजांनी
आपल्या अधिकाऱ्यांना दिला.संकटसमयी ते गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.”तिजोरीवर लाख दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल, परंतु आपल्या राज्यातील गरीब उपाशी पोटी झोपता कामा नये” असा मानवतावाद छत्रपती शिवाजी राजांनी जपला. राज्यातील आणि परराज्यातील सर्व जाती
धर्मातील महिलांचा आदर – सन्मान केला
पाहिजे, शत्रूच्या स्त्रियांचाही उपमर्द होता कामा नये, हा नियम छत्रपती शिवाजी राजांनी घालून दिला असे अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात प्रा. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने व्याख्याते प्रा. डॉ श्रीकांत कोकाटे बोलत होते
ते पुढे म्हणाले की आधुनिक काळात सनातनी अर्थात वैदिक धर्माची बौद्धिक पातळीवरती चिरफाड करण्याचे महान कार्य महात्मा ज्योतिराव फुले
यांनी केले. सनातनी धर्म हा बहुजन समाजाचे शोषण करणारा आहे. त्यांना शिक्षणापासून,हक्क-अधिकारापासून वंचित करणारा आहे,त्यामुळे तो नाकारला पाहिजे, ही महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी तृतीयरत्न नावाचे नाटक, गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, छत्रपती शिवाजी राजांचा
पोवाडा इत्यादी लेखन केले. बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि तत्कालीन परिस्थिती यांची प्रेरणा घेऊन भारताच्या
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रबोधनाच्या क्षेत्रात महान क्रांती करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशासाठी रचनात्मक कार्य केले. हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या
देशाला संविधान दिले. शेतकरी, उपेक्षित,
वंचित वर्गाच्या हितासाठी त्यांनी मोलाचे
प्रबोधन केले. विपुल लेखन केले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. संसदेमध्ये आवाज उठविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान अभ्यासक होते. ते संपादक होते. ते महान
शिक्षणतज्ञ होते. ते महान कायदेपंडित होते. ते इतिहासकार होते. ते कृषीतज्ञ जलतज्ञ होते असे सांगत ते पुढे म्हणाले कीबुद्ध हा केवळ भारताचाच नव्हे, तर जगाचा महामानव आहे. तथागत गौतम बुद्धाने वेदप्रामाण्य नाकारले, महिलावरील निर्बंध नाकारले, अनिष्ट परंपरा नाकारल्या. गौतम बुद्ध हे समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, स्त्रियांचा आदर-सन्मान करणारे, मुलींच्या जन्माचे स्वागत करून मुलीला देखील वंशाचा दिवा मानणारे होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातनी परंपरां नाकारून,भारतीयांचा श्वास तथागत गौतम बुद्ध यांच्या
धम्माची १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षा
घेतली असे सांगितले.
विचारपीठावर व्याख्याते प्रा.डॉ. श्रीमंत शिवाजी कोकाटे,सामाजिक कार्यकत्या प्रतिभाताई शिंदे, अर्जुन कोकाटे सर,प्रा.अशोक पवार,प्रा.डॉ. लिलाधर पाटील,शिवमती मानसी पवार होते. अगोदर सर्व बहुजन समाजातील नेत्यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.
व्याख्यानमालेत अगोदर प्रा. अशोक पवार यांच्या प्रति कृतज्ञता लोकसंघर्ष संघटनेच्या नेत्या प्रतिभाताई पाटील,सुप्रसिद्ध युवा वक्ते प्रा.डॉ लिलाधर पाटील, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष
येवला येथील अर्जुन कोकाटे,मा.सरपंच महेंद्र बोरसे यांनी व्यक्त केली ते म्हणाले की बुद्धीजीवी माणूस समाजपरिवर्तन करत असतो त्याला हिणवले जाते,लोकशाही जिवंत करणारा हा कार्यक्रम आहे..आज देशात माणसाच्या बोलण्यावर बंदी घातली जाते पण तुम्ही प्रा.पवार सर आपण बोलणारे कार्यकर्ते तयार केले आहेत असे सांगितले.
प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मान पत्र,शाल देऊन सत्कार बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भागवत गुरुजी, समाधान धनगर,नितीन निळे
मच्छिंद्र लांडगे यांनी केला तर चेतनभाऊ शहा ,भारती गाला,गौतम मोरे
जयवंतराव पाटील,प्रा एस.टी.माळी यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.सौ वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना सादर केली.
तर व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचा परिचय प्रा.गौतम मोरे यांनी करुन दिला.
शेवटी प्रा.अशोक पवार सर यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की आज माणूस नैराश्य, ताणतणाव, अस्वस्थता यात गुरफटला आहे यावर उपाय एकच आहे महापुरुष वाचले पाहिजे व चळवळीत यावे असेही त्यांनी सांगितले.
रणजित शिंदे यांनी सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बापूराव ठाकरे,प्रेमराज पवार
डि.ए.पाटील,सोपान भवरे,अजय भामरे सह मित्रपरीवाराने सहकार्य केले.यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती व महिला व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *