• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर तालुक्यातील
शेतकरी सुखावला! एक महीन्यानंतर
वरुणराजा प्रसन्न…

Sep 7, 2023

Loading

अमळनेर तालुक्यातील
शेतकरी सुखावला! एक महीन्यानंतर
वरुणराजा प्रसन्न…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यात यावर्षी जून जुलै ऑगस्ट तीन महिन्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस मिळाल्यामुळे पावसाअभावी पिकांनी कात टाकली होती.. त्यात मका सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर पावसाअभावी नुकसान झाले आहे. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.
एक महिन्यानंतर काल वरूण राजाच्या सरी कोसळल्यामुळे व आज सकाळपासून वरूण राजा गोकूळ आष्टमीला प्रसन्न झाल्याने शेतकरी सुखावला असून शेतकऱ्यांनी पावसाच्या पडणाऱ्या सरींमध्ये नाचत आपला आनंद व्यक्त केला आहे…
सध्या कपाशी पिकाची सुद्धा पावसा अभावी वाढ खुंटलेली आहे. शेतकऱ्याने लाख मोलाची बियाणे, खते ,मशागत त्यासाठी वारेमाप पैसा खर्च केला आहे .. कालपासून पावसाच्या सरी कोसळल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे व शेतकरी थोडयाफार प्रमाणात का होईना सुखावला आहे.
दमदार पावसाची प्रतीक्षा
संपूर्ण राज्य यावर्षी दमदार पाऊस गेल्या दोन महिन्यातही पडला नाही. वरून राजा आतातरी चांगल्या प्रकारे प्रसन्न झाला. तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गुरांचा चाऱ्याचा प्रश्न व रब्बी हंगाम,कपाशी पिक चांगले येऊ शकते अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी दिली आहे.
दमदार पाऊस पडला तर सर्वच प्रश्न सुटतात सर्वसामान्यांनाही काम मिळते, आर्थिक उलाढाली होतात पण पावसाअभावी सर्व व्यवहार ठप्प झाले होते पण कालच्या पावसाच्या सरीमुळे व आजही सकाळपासून पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी थोडा वेळ का असेना सुखावला आहे हे तेवढेच निश्चित..

कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव
सध्या कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव अमळनेर तालुक्यातील शेती पिकावर झाला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे समाधानकारक पाऊसच नाही आणि दुसरीकडे पिकांवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हजारो रुपयाची वेगवेगळ्या प्रकारची फवारणी करून शेतकरी पिकांना जीवदान देत आहे. अमळनेर तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

ग्रामीण भागात लोडशेडिंग चे संकट
सध्या अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागामध्ये लोड शेळीगने कहर केलेला आहे. लोंडशडींगमुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देणे कठीण झाले. एकीकडे समाधानकारक पाऊस नाही थोडेफार विहिरींना पाणी असल्यामुळे शेतकरी विहिरीच्या मोटारी च्या साह्याने पिकांना पाणी देऊन जीवदान देण्याचा प्रयत्न करीत असतो पण त्यात लोड शेडिंग ने कहर केल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ग्रामीण भागातील लोड शेडिंग कमी करावी अशी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *