
राजकारणात हारलो, आणि बँकिंग क्षेत्रात ‘सेट’ झालो.
आजकालची तरुणाई राजकारणाच्या नादाला लागून आपले आयुष्य बरबाद करत असल्याचा आरोप सातत्याने होतो. राजकारणात उतरल्या नंतर बऱ्याचदा पदांची दिखाऊ प्रतिष्ठा, कडक इस्त्री केलेले पांढरेशुभ्र कपडे याची जणू एक नशाच चढते. यातून मग इतर कामे कमी आणि प्रतिष्ठेचे वाटू लागतात.
परंतु यातून अपवाद ठरला आहे अमळनेर तालुक्यातील मुडी करणखेडा येथील ‘संदीप पाटील तरुण त्याने कमी वयात समाजकारण तथा राजकारणाचा ध्यास घेतला होता.
धुळे येथील खाजगी बँकेत नोकरी सोबत राजकारणात ही सक्रिय राहिले. त्यादिशेने त्यांनी अनेक सामजिक ऊपक्रम तथा जनसेवा ही केली.
राजकारणाची आवड असल्यामुळे त्याने सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले.
त्या दृष्टिकोनाने त्याने पाऊल ही टाकले आणि लोकांचे मन ही जिंकलीत.
राजकारण हे समाजाचे हितासाठी असते पण सध्याचे राजकारण फक्त स्वार्थासाठी आहे.
राज्यातील घडामोडी पाहिल्या तर कुठेच विचारधारा किंवा मानवता राहिलेली नाही, चार ही पक्ष मिळून राज्यात सत्ता भोगून बसलेत म्हणजे जनमताचा विचारच नाही.
मी ह्या मताचा आहे समाजकारण करावे पण त्या मध्ये राजकारण नसावं…!
संदीप पाटील यांची घरची परिस्थिती हालाखीची तसेच आज कालचे पैश्याचा जोरावर चालणारे राजकारण आपणास पुढे नेणार नाही ह्याच दृष्टीकोनाने ह्या तरुणाने आपले एक पाऊल राजकारणाचा दिशेतून माघे घेतले.
आणि गुजरात मधील भरूच जिल्ह्यात खाजगी बँकिग क्षेत्रात डेप्युटी मॅनेजर पदावर आहे तसेच त्यांची पत्नी ही एम.बी.ए. असून अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत.
तरुणांनो आधी स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा…
किंवा स्वतःच कुटुंबाचं तारणहार व्हा आणि त्या दृष्टी कोणाने मार्गक्रमण करा.
तरुणांनो आजकाल तरुण पिढीच बदल घडवू आणि शकते…
राजकारण मध्ये आपण अवश्य सहभागी व्हावच पन स्वतःची तेवढेच सक्षम असावे.
कारण…
सुशिक्षित लोकांनी राजकरानाकडे आजिबात दुर्लक्ष्य करू नये अन्यथा तुम्हाला अडाणी लोकांचे गुलाम व्हावे लागेल.
आणि तुम्हाला कार्यकर्ता व्ह्यायचाच असेल तर महामानव बाबासाहेब डॉ. आंबेडकर आणि छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे विचाराचे पाईक व्हा.
इथेच आपण अर्ध्या आयुष्याची लढाई जिंकली असाल.
तसेच मूडी करणखेडा येथील संदीप प्रदीप पाटील तरुणाला ११ सप्टेंबर वाढ दिवसाच्या मराठी लाईव्ह च्या वतीने खूप खूप शूभेच्छा.