संविधान हाच भारतीयांचा स्वाभिमान!!
भारतात मानवतेचे बीज पेरणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. आमच्या देशात निर्माण केलेल्या विषमतेवरचे प्रभावी औषध म्हणजे संविधान होय. भारताच्या मूळ संस्कृतीचे अस्तित्व म्हणजे संविधान..समानतेची भक्कम रोवलेली वीट आहे संविधान ! समान संधीची वहिवाट देते ते म्हणजे संविधान.. भारतात विशिष्ट समाजाने निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेला पर्याय म्हणून संविधान होय. खर स्वातंत्र्य मिळण्याचा दिवस उजळण्यासाठी तयार केलेला मसुदा आहे संविधान. भारताच्या समता असलेल्या देशात मनुवादयांनी वर्णव्यवस्थेचे जाळ तयार करून स्वत:ची सत्ता बहुजनावर ठेवली. मनुस्मृती च्या माध्यमातून त्यांनी स्वत:ला उच्च घोषीत करुन तसेच भूदेव समजून बहुजनांना स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले. संविधानाने बहुजनासह सर्व स्त्री घटकाला मनुस्मृति च्या कार्बन पासुन मुक्त करुन संविधान रुपी ऑक्सिजन दिले. भारतात विदेशातुन आलेल्या मनुच्या वंशजांनी येथील प्रजेवर आपली गुलामी लादली. भारतात बहुजनावर मनुवादयांची व इंग्रजांची अश्या 2 गुलामी होत्या. इंग्रजांच्या गुलामी पेक्षा येथील बहुजनांना पशुहिन वागणूक मनुस्मृती च्या समर्थकांदवारे लादलेली होती. ती उखडुन फेकण्याचे काम एकटया प्रज्ञासुर्याने केले ते म्हणजे डाॅ. भिमराव आंबेडकर नावाच्या द्रष्टा महामानवाने आपले सारे जीवन आपल्यासाठी समर्पित करुन केले. अशा थोर मानवाने दिलेल्या संविधानाचा हा आजचा दिवस होय. अशा दिलेल्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. भारतात चाललेला जातीयतेच्या धुमश्चक्रीत दिलेल्या संधीचे हक्क निसटुन चालले. एकीकडे आरक्षण मागणी तर दुसरीकडे खाजगीकरणाने आरक्षणाचे संरक्षण मिटविले जात आहे. बहुजन आरक्षण मागण्या अगोदर संविधान साबुत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. नाहीतर केवळ आरक्षणाचा कागद घेऊन काहीच उपयोग होणार नाही. शिक्षणाच्या बाजारीकरणात बहुजनाचे स्वप्न होत आहे. चला तर मग अगोदर संविधान वाचवण्याची शपथ घेऊ या!!
एस.एच. भवरे
पत्रकार
