संविधान हाच राष्ट्रग्रंथ हिच भारतीय नागरिकांची ओळख.
डॉ.मिलिंद बागुल
भारतीय लोकशाही समृद्ध आणि विशेषत्वाने जगाला पर्याय देणारी लोकशाही असून लोकशाहीची आणि भारतीय नागरिकांची मूळ ओळख भारतीय संविधान असून जगात होत असलेल्या अराजकतेला भारतीय संविधान आणि लोकशाही एक उत्तर असल्याचे मत साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी समाज कल्याण विभागातर्फे शासकीय वसतिगृहात आयोजित केलेल्या संविधान गौरव दिनाच्या निमित्त कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण अधिकारी वनिता सोनगत होत्या.डॉ.बागुल बोलतांना पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाची निर्मिती होत असताना यावेळी झालेल्या अनेक डिबेट्स या लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या आणि त्यातून एका सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या राष्ट्राची ओळख जगात निर्माण झाल्याचे मत देखील त्यांनी याप्रसंगी मांडले.कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त योगेश पाटील,प्रा.डॉ.सत्यजित साळवे,विनोद ढगे,गृहपाल एस.आर.पाटील,वैशाली पाटील, निरीक्षक महेंद्र चौधरी,आर.सी.पाटील विचारमंचावर उपस्थित होते. सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले.याप्रसंगी प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी मनोगत व्यक्त करतांना, संविधान भारतीय नागरिकांनी वाचून आणि बारकाईने हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून घेत लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन करताना तरुणाईने भारतीय संविधान हे आपल्यासाठीच आहे ही जागरूकता मनात बाळगण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी तालुका समन्वयक चेतन चौधरी, जितेंद्र धनगर, अनिल पगारे यांनी मान्यवर अतिथींचे स्वागत केले. संविधान उद्देशिकेचे वाचन मयूर साळवे यांनी तर स्वागत गीत करुणा साळवे, शुभांगी पंडित प्रणिता सुरवाडे यांनी सादर केले सूत्रसंचालन खुशी लहाने, शुभम मनोरे, अंकिता गजरे यांनी केले. आभार गृहपाल वैशाली पाटील यांनी मानले समांतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

