• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बालविकास मंदिर व मराठी शाळा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

Jan 15, 2024

Loading

लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बालविकास मंदिर व मराठी शाळा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

अमळनेर -दिनांक -१३ जानेवारी २०२४लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर व नवीन मराठी शाळा या दोघांचे वार्षिक पारितोषिक वितरण व विविध क्रिडा स्पर्धा बक्षीस समारंभ शनिवारी शाळेचे प्रागंणात पार पाडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पदक पुरस्कृत मान. श्री राजाराम धर्मा भोई सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक व सौ कल्पना राजाराम भोई व दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी नवीन मराठी शाळा श्री मकसूद हुसेन नुरुद्दीन बोहरी व सौ.महाराज मकसूद बोहरी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली व दीप प्रज्वलन व श्रीरामाच्या मूर्तीला, मां सरस्वती माता, स्वामी विवेकानंद व मां साहेब जिजाऊ माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण प्रमुख पाहुण्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार श्रीफळ व शाल ने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री राजाराम भोई यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा जास्तीत जास्त अभ्यास करावा असे आपल्या भाषणात सांगितले.

दुसरे प्रमुख पाहुणे श्री मकसूद बोहरी आपल्या संभाषणात म्हणाले की मी या शाळेचा विद्यार्थी असून मला याचा अभिमान आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी काही बहुमोल असे टिप्स दिल्यात. वेळेचे महत्त्व सांगताना त्यांनी सांगितले की सकाळची वेळ ही सर्वात महत्त्वाची वेळ असते हे उदाहरणासह त्यांनी पटवून दिले सकाळची वेळ ही ब्रह्म मुहूर्त व पाणी ग्रहण आणि अजान ची पवित्र वेळ असते . सकाळी लवकर उठा. याप्रसंगी परमेश्वर आपल्या घरी आपल्याला आशीर्वाद व कृपा देण्याकरिता आलेले असतात. या आलेल्या संधीचा फायदा घ्या. वेळेच्या सदुपयोग करा. पाठ्यपुस्तकां सोबतच अवांतर वाचन आपण भरपूर करा असेही आव्हान त्यांनी केले. शिक्षण हे माणसाला घडविते व त्यामुळे उत्तम पिढी तयार होते. शिकण्याची प्रक्रिया फक्त चार भिंतीतच पूर्ण होऊ शकत नाही निरीक्षण म्हणजे खरे शिक्षण होय .त्यातून जिज्ञासा जागृत होते आणि नवीन गोष्टी शिकता येतात. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व जो पितो तो गुरगुरतो शिका व संघर्ष करा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. मोबाईलचा वापर शिक्षणा करता करा व आपल्या ज्ञानात भर पडेल यासाठी त्याचे उपयोग करा. वाईट मेसेज त्वरित डिलीट करा व अपडेट सुद्धा रहा. विद्यार्थी आत्महत्या करतात तेव्हा अतिशय दुःख होते . आई बाबांनी आपल्या करता किती खस्ता खाल्ले आहेत याची आपण विचार करावा. वृद्धापकाळी आपल्या आई बाबांना वृद्धाश्रमात पाठवू नका आपल्या आई-बाबांच्या शिक्षकांच्या आदर करा. तुम्हाला जीवनात काहीही कमी पडणार यासाठी त्यांनी एक शेर सुद्धा म्हटला-

जिंदगी में खुदा से इतना मांग लेना दोस्तों ….
मां के बिना कोई घर ना हो
और कोई मां बेघर ना हो….

विद्यार्थ्यांनी आत्महत्येच्या मार्ग न स्वीकारता आपण आत्मनिर्भर बना असे त्यांनी आवाहन केले. आत्मनिर्भर म्हणजे कोणाची मदत न घेता स्वतः आपल्या प्रयत्नाने परिश्रमाने आत्मसन्मानाने जीवन जगणे होय. झिजून झिजून मरावे पण जगात कोणाचीही मदत न घेता आत्मसन्मानाने जगावे यालाच तर आत्मनिर्भर म्हणतात.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न. म.चेअरमन श्रीराजेंद्र नवसारीकर , लोकमान्य शिक्षण संस्थेचे चिटणीस श्री विवेकानंद भांडारकर, प्रा. डॉ.प्रभाकर जोशी चेअरमन लोकमान्य विद्यालय, लोकमान्य शिक्षण मंडळाचे माननीय सदस्य पदाधिकारी प्रा.धर्मसिंह पाटील , श्री राजेंद्र खाडीलकर , प्रा. रमेश रामचंद्र बहुगुणे ,श्री व सौ भालचंद्र मंजुळ आणि लेखक कवी व पत्रकार श्री सुभाष पाटील घोडगावकर व तहसीन हुसेन कयूमी व तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर महाजन , श्री मच्छिंद्र मोरे ,सौ अनिता वैद्य खास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री मार्कंडे व श्री भोई यांनी केले तर आभार प्रदर्शन मार्कंडे यांनी केले. अशी माहिती पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर यांनी कळविलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *