
मकर संक्रांति अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश!!
भारतीय संस्कृती मूल्य देणारी संस्कृती आहे. येथील मूळ परंपरा ह्या साम्यवादी विचाराच्या होत्या.मानवतावादी होत्या. मानव आदिम काळात असताना देव ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. निसर्गातील अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींना, घटकांना शक्तीचे केंद्र मानत असे. वेद पूर्वकाळात भारतीय संस्कृतीत सूर्य, चंद्र पृथ्वी, वायू ,आकाश ,पाणी या घटकांना फार महत्त्व होते. या घटकांना पूजनाची परंपरा होती .शरीर पंचतत्वांनी बनलेले आहे अशी मानवाची धारणा होती. सूर्य हा आपल्याला प्रकाश देतो .त्याची कृतज्ञता म्हणून सूर्याला अर्ध्य देण्याची, नमस्कार करण्याची रीत निर्माण झाली. चंद्र हा आपल्याला शितलता देतो. भरती ओहोटी घडवून आणतो .अशा घटकाची कृतज्ञता व्यक्त केली जात होती .निसर्गात असलेल्या महानद्या ,सागर, महासागर हे मानवाचे मोठे जलस्रोत होते .त्यामुळे नद्यांनाही पूजनाची प्रथा आहे. आपण ज्या भूमीवर राहतो त्या भूमीची कुठेतरी परतफेड झाली पाहिजे. हा भाव व्यक्त करण्यासाठी पृथ्वीला माता मानले जात होते. भूमीला हिरवळ करणारा पाऊस हा आकाशातून पडतो .त्या आकाशाला वंदन करण्याची परंपरा होती .मानवाला लागणारा प्राणवायू म्हणजे हवा त्यालाच ऑक्सिजन हे इंग्रजी नाव त्याची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून वेद काळात देवतेचे रूपे त्यांना देण्यात आली. वेदपूर्वकाळात विषमता आधारित मांडणी न होती. जसे जसे मानवाला विज्ञानाचे महत्त्व समजू लागले त्याप्रमाणे त्याने जिज्ञासेपोटी अनेक गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला .सूर्य हा बारा राशीत भ्रमण करतो असे शोधून कालगणना त्याने तयार केली. तो जंगलात विहार करीत असल्याने त्याने निसर्गाचा जवळून अभ्यास केला. त्याचप्रमाणे अवकाशातील ग्रहताऱ्यांचा बारीक सारीक अभ्यास केला .त्यातून विविध ग्रह ,तारे ,उपग्रह याबाबत माहिती घेतली. सुरुवातीला निसर्गातील शक्तींना मानव देव म्हणजेच सर्व शक्तिमान असे नामविधान देत असे. त्यातूनच सूर्याला त्याने प्रकाशाची देवता मानले. भारतीय सणांमध्ये मकर संक्रांत हा सण सूर्याच्या कृतज्ञतेसाठी साजरा करण्यात येतो .हा सण इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला येतो. हा एकमेव सण आहे हा जास्तीत जास्त एक दिवस मागेपुढे येऊ शकतो .मकर संक्रांत ह्या सणाचे महत्त्व असे की सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य हा संक्रमण करीत जातो. दरवर्षी 5.5 एवढ्या अंतराने त्याचे संक्रमण होत जाते. त्यामुळे धनु राशीतून होणा रे हे संक्रमण असते शरद या ऋतूतून सूर्य वसंत ऋतूत येतो .मकर संक्रांत हा सण हिवाळा ऋतू संपण्याची नांदी व उन्हाळा हा उबदार ऋतू सुरू होण्याची सुरुवात असते.संक्रांती ह्या एकुण12 आहेत. काही ग्रंथांमध्ये भगीरथ व गंगेची आख्यायिका जोडली आहे. गंगेचे सागरात मिळणं हे या कथेत दिलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून पित्तर घालण्याची प्रथा आहे. पूर्वी हिवाळा कडक असायचा .त्यामुळे तिळाचे पदार्थ खाण्याची परंपरा होती .शरीराला उब देतील असे पदार्थ करण्याची रीत होती .साखर ऐवजी गुळ खाण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे तीळ आणि गुळ याचे लाडू बनविले जात. या सणाचे औचित्य साधून समाजात समाजात तेढ कमी करण्यासाठी तिळगुळ वाटण्याची प्रथा निर्माण झाली. एकमेकांमध्ये कोणतेही वैर न ठेवता आज पासून प्रेमाने वागण्याची शपथ घेण्याचा दिवस हा मकर संक्रांती म्हणून मानला जाऊ लागला. त्यासाठी तीळ ज्यामध्ये स्निग्ध पदार्थ आहे जो चिकट असतो आणि इतर घटकांना जोडून ठेवतो त्याचप्रमाणे केवळ स्निग्ध पदार्थ असून चालणार नाही त्याच्यासोबत गोडवा म्हणून गुळ असावा म्हणून तिळातील आपुलकी आणि गुळातील गोडवा हे ह्या सणाचे प्रतीके बनली .मानवात मते मतांतर असतात परंतु वैश्विक धारणा सांगते वैर ठेवल्याने मानवाचा विकास होत नाही. त्यासाठी समजदार व्यक्ती वैर कायम ठेवत नाही. आपल्यात आपुलकी ,प्रेम, स्नेह ,ओलावा जपावा. तसेच दुसऱ्याच्या मनात हाच गोडवा निर्माण व्हावा यासाठी मकर संक्रांति हा सुंदर सण साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाला माणसाने दुसऱ्या वरील राग मस्त,क्रोध ,संताप ,ईर्षा दूर कराव्यात.त्यातून मानवाची प्रगती होत नाही तर अधोगती होते .बुध्दाने अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश दिला आहे. हा सण वैज्ञानिक बदल झाल्याचे सुचवितो. तीन गुण सारखे चिवट नाते आपले असावे हे हा सण सुचवितो. त्याप्रमाणे आपोआपसातील भेद मिटविण्याचे सांगतो आज जाती-जातीत, धर्माधर्मात ,वर्णा वर्णात भेद आहे तो आपण मिटवल्यास मकर संक्रांत साजरी केल्याचे म्हटले सिध्द होइल. आपला देश बहुभाषिक आहे. आपल्याला विविध आचार पध्दतीची देन लाभली आहे. देश हा वैश्विक मूल्य पाळतो म्हणून तरी अखंड राहिला... त्याला सर्व समाजाची उत्तम समज हेही ठेवून राहतो हेही आहे.
एस. एच. भवरे
पत्रकार