• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ठाणे वाहतूक आयुक्तालयाच्या रस्ता सुरक्षा अभियान समारोप जल्लोषात.

Feb 15, 2024

Loading

ठाणे वाहतूक आयुक्तालयाच्या रस्ता सुरक्षा अभियान समारोप जल्लोषात.

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी, शाळा महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे प्रबोधन करणे महत्वाचे ठरेल.: पोलीस आयुक्त आशुतोष डूबरे.

आर एस पी युनिट चा सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर राबवून वाहतुकीचे नियम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणार:: डॉ.विनयकुमार राठोड.

ठाणे(मनिलाल शिंपी) ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांचा नेतृत्वाखाली, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचा माध्यमातून,यशस्वीपणे राबविण्यात आला.या सप्ताहाचा समारोप प्रसंगी, पोलीस आयुक्त श्रीआशुतोष डुंबरे अध्यक्षतेखाली, सह.आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण,पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, डॉ.महेश पाटील,गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंजाबराव उगले,ठाणे वाहतूक उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांचा प्रमुख उपस्थितीत काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना रस्ता वाहतुकीचे नियम कळावेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी ठाणे वाहतूक विभागातर्फे गेल्या एक महिन्यापासून ३४ रस्ता सुरक्षा अभियान – २०२४ राबविण्यात येत होते. या कालावधीत स्तुत्य अभियानाचा आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सांगता सोहळा पार पडला. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेब यांनी वाहतूक उपायुक्त डॉ.राठोड यांचे कार्य खरोखर स्तुत्य उपक्रम हाती घेऊन, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात, आर एस पी युनिट चा माध्यमातून शाळा , महाविद्यालये, विविध स्थानिक स्वराज्य संस्था, आणि यांचा समावेश करून घेत समाजामध्ये प्रत्येक घरात वाहतुकीचे नियम पोहचवण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविले,आणि वाहतूक नियम पाळणे आवश्यक असल्याचे पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला, वाहतूक विभागातील सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले. सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनीही बोलताना सांगितले की, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी समाजामध्ये विविध उपक्रमांचा माध्यमातून, वाहन चालकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.त्यासाठी शाळा महाविद्यालये, आर एस पी युनिट व आवश्यक त्या घटकांचा समावेश करून सहकार्य घेणे गरजेचे आहे.असे सुचवले. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी प्रास्ताविक देताना सांगितले की, अभियानाच्या माध्यमातून वाहनचालक, शाळकरी विद्यार्थी, रुग्णालय विविध संस्था यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात आले. तसेच या अभियाना दरम्यान ठाणे वाहतूक उपायुक्त कार्यालय परिक्षेत्रातील सर्व , आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट, बाल सैनिक, एनसीसी पथक, स्काऊट गाईड, आणि एनएसएस छात्र सैनिक,तसेच विविध स्थानिक संस्था, सोशल वर्कर यांचा समावेश करून,संपूर्ण महिनाभर फोटोग्राफी स्पर्धा, रिल मेकिंग, शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग,चित्रकला यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होतें.हे उपक्रम फक्त सप्ताह साजरा करून थांबायचं नाही तर वर्षभर प्रत्येक शाळा महाविद्यालयात विविध कार्यशाळा आयोजित करून संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर देशात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील असे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ.राठोड यांनी प्रास्ताविकात जाहीर केले. कल्याण पश्चिम चे वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक गिरीष बने, उपनिरीक्षक बडगुजर, कोळसेवाडी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलीस उपनिरीक्षक वाघ, कळवा वाहतूक वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख पाटील यांच्यासह उल्हासनगर अंबरनाथ, मुंब्रा, भिवंडी येथील सर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक,आणि पोलीस कर्मचारी बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेत ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या समारोप समारंभ प्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी ठाणे वाहतूक पोलीस विभागाची विशेष दिनदर्शिकाही प्रकाशित करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांना हास्य जत्रा फेम कलावंत,लेखक समीर चौगुले, आणि त्यांचा सहकारी यांनी आपल्या विनोदीशैलीत विद्यार्थी,पालकवर्ग,शिक्षकवृंद, आणि पोलीस आयुक्त यांचासह सर्व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांना हसण्यात मंत्रमुग्ध केले. व या सादरीकरणाने खळखळून हसविले. अतिशय आनंदायी आणि उत्स्फूर्त आणि जलोष्यात, आनंदमय वातावरणात आजचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आर एस पी नागपूर चे पदाधिकारी श्याम फाळके, क्रीडा विभागाचे जॉइंट डायरेक्टर जयप्रकाश दुबे, ठाणे, नवी मुंबई विभागीय समादेशक दिलीप स्वामी,ठाणे पालघर व नाशिक विभागीय आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.याप्रसंगी आर एस पी अधिकारी शिक्षक जितेंद्र सोनवणे, शरद बोरसे, मधुकर पाटील, बगाडे सर, हंडाळ सर उपस्थित होते. एसीपी घेरडिकर साहेब यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात. अवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाका :: गीतांजली मुणगेकर .
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडवण्यासाठी बैठक संपन्न. *मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांनी वरील तीन जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवाव्यात-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.*
शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed