
शिक्षण माणसाला डोळस बनवते
डॉ. मिलिंद बागुल
विद्यार्थी जीवनात मैत्रीभाव जोपासत असताना शिक्षणाची वाट आपल्या जीवनाला समृद्ध करत असते आणि त्यासोबतच माणसाला ते डोळस देखील बनवते असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ मिलिंद बागुल यांनी माध्यमिक विद्यालय भोलाणे येथील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते पुढे म्हणाले ग्रामीण भागात शिक्षणाची समृद्ध अशी पहाट निर्माण करणाऱ्या गावकऱ्यांच्या प्रति आपण कृतज्ञ राहत असताना आपला विचार प्रगतीचा समृद्धतेचा असणे आणि हा विचार विद्यार्थी दशेतच भक्कम करणे महत्त्वाचा असतो असेही त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.यावेळी कॉपीमुक्त अभियान संदर्भात माहिती दिली. संस्थेचे सहसचिव प्रकाश कोळी, एस. के. राणेराजपूत सचिन जंगले, बारी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, मुख्याध्यापक सदाशिव सपकाळे,विचारमंचावर उपस्थित होते.यावेळी श्रीमती एस.जी.सूर्यवंशी, आर. एम.सूर्यवंशी, एन.बी.सपकाळे, एम. ई.पाटील, व्ही. टी.सावळे, एम. व्ही.सुरवाडे,डी.पी.कोळी,पी. एल.सपकाळे, एस. आर.कोळी, पी.पी.सपकाळे, एस.के.गोसावी कार्यक्रमास उपस्थित होते. विद्यार्थी, विद्यार्थिनीनी ,सचिन जंगले,राजेंद्र आंबटकर यांनी समयोचीत मनोगत व्यक्त केली.सूत्रसंचलन कु.चैताली न्हावी तर आभार कु.गायत्री हिने मानले.