• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राष्ट्रीय गुरु संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन ——-!!!!!

Feb 26, 2024

Loading

राष्ट्रीय गुरु संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन ——-!!!!!

अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय गुरु संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी संत रविदास यांच्या जीवन कार्याचा गुणगौरव करताना सांगितले की संत रविदास यांचा समतेचा विचारच जगाला तारणहार आहे. संत रविदास यांचं एकच ब्रीदवाक्य म्हणजे “मन चंगा तो कठोती मे गंगा” ज्यांचं मन शुद्ध आहे पवित्र आहे निस्कपट आहे अशी व्यक्ती कुठेही कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. त्यासाठी गंगा स्नान करण्याची काहीही आवश्यकता नाही. आपले शुद्ध मनच हे पवित्र गंगेप्रमाणे आहे. त्यांचे विचार असे होते की,
ऐसा चाहू राज मै,जहा मिले सबनको अन्न!
छोट बडे सब सम बसे ,रविदास रहे प्रसन्न !!
संत रविदास म्हणतात की, मला अशा राज्याची किंवा सत्तेची गरज आहे की, प्रत्येक मानवाला त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. तेव्हाच मला प्रसन्न वाटेल! समाधान वाटेल! आनंद वाटेल! असे म्हटले आहे.
मानवतेचा दिला सर्वत्र संदेश, समतेसाठी केला भारतभर जनादेश! स्त्री-पुरुष समानता केली सुरू,
संत मीराबाईचे झाले आद्यगुरु!
अमृतासम त्यांच्या काव्याचा संदेश
गुरु ग्रंथसाहेब ग्रंथात आहे समावेश!अमर कार्याची आहे जगभर कीर्ती, गुरु रविदासांच्या विचाराची अखंड शक्ती!
गुरु रविदासांचे विचार कार्य महान, सत्य, अहिंसा, शांतता, हाच मानवतेचा प्राण!
आपापसात नका करू दंगा आणि धोका,
रविदास कहे “मन चंगा तो कठोती मे गंगा”! ” मन चंगा तो कठोती मे गंगा !! सदर प्रसंगी उपशिक्षक व्ही. डी. पाटील, पी.एम. ठाकरे, वाय.जे.पाटील, ए.पी. जाधव, तसेच उपशिक्षिका भारती चव्हाण, वंदना जाधव, सुषमा तेले, छाया निकम, अर्चना महाजन उपस्थित होते.
संत रविदासांचे विचार कार्य कथन करताना ज्येष्ठ शिक्षक डी.एस. माळी यांनी” मन चंगा तो कठोती मे गंगा” हे ब्रीदवाक्य कसे लावा रुपाला आले ? याविषयी सविस्तर विवेचन केले. आणि वाराणसी या ठिकाणी संत रविदासांचे जे भव्य मंदिर आहे, आजचे गोल्डन मंदिर म्हणूनही प्रसिद्धी आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थी कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *