
” मराठी राजभाषा दिन” निमित्त लेख
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा” मराठी राजभाषा दिन” म्हणून पाळला जातो आणि त्यानिमित्त लेखन आणि वाचन चळवळ कशी वाढेल त्यासाठी प्रेरणादायी पुस्तक कसे प्रकाशित होतील . याची काळाला गरज का आहे? चांगलं सकत साहित्य निर्मिती होणे ही आजच्या काळाची गरज आहेच. याची जाणिव आपल्याला होत असते.
मुळात आजकल वाचन न करता लिखाण करणारी पिढी तयार होत आहे .त्यातच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आक्रमण ,अँड्रॉइड मोबाईलचे संक्रमण त्यामुळेच मराठी पुस्तकांपासून तरुण पिढी ही दूर जात आहे .असं वाटणे स्वाभिष स्वाभाविक आहे .तरीही प्रतिभा आणि लिखाणाची उर्मी कळत नकळत वाढत असताना सुद्धा वाचन संस्कृती जोपासली जात नाही, म्हणून वाचना करत लिखाण करणारी नवीनतरुण पिढी तयार होणे आवश्यक आहे.
आता तर पुस्तक प्रकाशित करणं म्हणजे प्रतिष्ठा समजली जाते. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ,कॉलेजमध्ये इन्क्रिमेंटच्या वाढीसाठी ,ठिकठिकाणी प्रस्ताव पाठवण्यासाठी सुद्धा पुस्तक काढली जात आहेत .त्यातच अगोदर लेखक कवीची इच्छा असायची की, माझ्या पुस्तकाच्या जास्तीत जास्त हजारो प्रती काढले जावोत .परंतु आता एक नवीन पिढी अशी तयार झाली की ,ती प्रकाशकाला विचारते की माझ्या पुस्तकाच्या कमीत कमी किती प्रती काढावे लागतील? म्हणजे हा असा काळाचा महिमा म्हणावा लागेल .
पूज्य साने गुरुजींच्या “श्यामची आई “वाचून हजारो संस्कारी मुले तयार झालेत .श्यामची आई मुळे जीवन जगण्याची जाणीव गेल्या पन्नास वर्षा पासून तरुणाना आली . जीवन जगण्याचा संघर्ष असेल, “रडत जगण्यापेक्षा लढत जगा “हा संदेश खरं तर प्रेरणादायी वाचनापासूनच मिळत असतो. आणि महाराष्ट्राची ही साहित्याची परंपराच म्हणावी लागेल की, त्यामुळे वि स खांडेकर ते ह. ना. आपटे, बाबुराव बागुल ते दया पवार , आनंद यादव, कवी कुसुमाग्रज पानिपत कार विश्वास पाटील, कोसला कार भालचंद्र नेमाडे ,पु ल देशपांडे, मृत्युंजय कार शिवाजी सावंत ही अशी समृद्ध लिखाणाची परंपरा आम्हाला लाभली .आणि त्यासोबतच समृद्ध वाचकांची सुद्धा परंपरा लाभली. पुस्तकांनी भरलेले ती वाचनालये शासनाच्या अनुदानावर कपाटाची कपाटा भरली जात होती. त्यावेळी वाचक त्या पुस्तकांवर अक्षरशः तुटून पडत होते .ग्रंथालये पुस्तकांनी कमी भरले असले तरी वाचकांनी समृद्ध होती. परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षात काळाचा महिमा म्हणा ,काळ बदलला, वाचन संस्कृती वाढली तर नाही.ती कमी होत आहे याची ही समाज मनाला जाणीव झाली .आणि त्यामुळेच आपणाला आज हे असे , “राजभाषा दिवस “म्हणून पाळावे लागत आहेत .
पुस्तकांचे वाचकांनी तेवढ्याच प्रेरणेने वाचन केलं पाहिजे ,ही शासनाची नाही खरतर गरज वाचकांची असली पाहिजे .तरीही शासनही त्याला सहाय्य करत आहे. मुळात अगोदर शिक्षण घेणारे प्रत्येक व्यक्ती वाचन करीत होता .
आता अशात वाचन करणारी पिढी घडत असताना आम्हाला मोबाईल मुळे वेळच मिळत नाही .
“आता काय सर्व काही मोबाईलवर मिळतं.” असं सांगितलं जातं .सहज बोलले जात आहे .परंतु वाचना अभावी माणूस माणसापासून दूर जात आहे .हे पण एक सत्य आहे. या समाजातून माणूस पण जपणारी माणसे नाहीशी होत आहेत .त्याला कारण आपली ही वाचन संस्कृती लोप पावली जात आहे.
मुळात आई-वडील आपलं पालनपोषण करीत असतात. शिक्षक आपल्याला ज्ञान दान देत असतात. खरं संस्कार देण्याची संस्कारक्षम बनविण्याची जबाबदारी आपलं हे ग्रंथ करीत असतात .म्हणून त्यांना आपण “गुरु “मानतो.
म्हणूनच आजच्या दिवशी. आपण सर्व वाचकांनी संकल्प करूया “मराठी राज्यभाषा दिवस “हा वाचन प्रेरणा दिवस ” म्हणून साजरा करूया..!
गोकुळ बागूल
अहिराणी साहित्यिक
21 टेलिफोन कॉलनी ,
मु.पो.ता.अमळनेर
जिल्हा जळगाव
मो. 9422276140