
जिल्हा आरोग्य विभागामार्फत जागतिक हिवताप दिन साजरा.
चोपडा प्रतिनिधी
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप आजाराविषयी जनजागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने, वर्षाच्या प्रत्येक एप्रिल महिन्यात २५ तारखेला “जागतिक हिवताप दिन” साजरा करण्यात येत असतो.
एवढ्या एकच दिवस हिवाताप आजाराविषयी जनजागृती करून न थांबता, संपूर्ण महिन्यात दिनांक- १ एप्रिल २०२४ ते दिनांक-३० एप्रिल २०२४ या दिवसामध्ये हिवताप जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येत असुन,
हिवतापा विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करून, हिवताप प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणी, त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे जनते पर्यंत माहिती पुरविण्याचा प्रयत्न करणे,हाच या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
मा.डॉ.सचिन भायेकर जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगांव/ जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ. तुषार देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली,
सम्पूर्ण जिल्ह्याभरातील सर्व प्राआकेंद्रामधील ग्रामीण भागातील जनतेत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने.. वर्षाच्या २५ एप्रिल हा दिवस जागतीक हिवताप दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे.
सदर प्रसंगी कुष्ठरोग सह संचालक-डॉ.जयवंत मोरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी-डॉ.रमेश दापते,
सथारोग अधिकारी-डॉ.सुधा बोरोले, डॉ-राजेश जैन, कार्यलय अधीक्षक-कांतीलाल पाटील, प्रसिद्धी प्रमुख-विद्या कंगाले, आरोग्य सहायक-जयंत पाटील, विस्तार अधिकारी-विजय विंचू, विद्या पाटील, आरोग्य सेवक-विजय देशमुख, मोहन टेमकर, किरण पवार, राजेंद्र चौधरी, श्रीम.अवचरे, साकीब शेख, श्रीम.भालेराव, पंकज दाबोरे, हेमंत पाटील,अतुल पाटील, तसेच इतर विभागातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
जिल्ह्यात सम्पूर्ण ग्रामीण भागात, आरोग्य कर्मचारी हे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून एप्रिल महिन्यात हिवताप आजाराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.
आज त्याच अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातील जनतेला हिवताप आजरा बाबत मार्गदर्शन कसे केले पाहिजे, याबाबतीत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी-डॉ.रमेश दापते.. यांनी उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग यांना मार्गदर्शन करतांना..
हिवतापाचा प्रसार हा अँनाफेलीस या जातीच्या डासांमार्फ़त होतो, या जातीच्या डासांची मादी घरातील वापरण्यासाठीच्या साठवण्यात आलेल्या पाण्याच्या साठ्यामध्ये, स्वच्छ पाण्याची डबकी,नारळाच्या करवंट्या, जुने टायर्स इत्यादी वास्तूमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात व तेथे त्या अंड्यापासून नवीन डासाची उत्पत्ती होऊन अशा प्रकारे डासांची संख्येत वाढ होते व हिवतापाचा प्रसार हा वेगाने वाढ होत जाते.
डास उत्पत्ती थांबवण्यासाठी, प्रत्येकाने दर आठवड्याला एक दिवस कोरडा दिवस म्हणुन पाळला जावा,
१)ज्यात प्रत्येक घरातील साठवलेल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या, रांजण, सिमेंट हौद, इतर सर्व भांड्यातील पाणी एकसाथ रिकामी करून, ती स्वच्छ, घासून पुसून कोरडे करून मगच दुसऱ्या दिवशी त्यात पाणी भरावे, एवढेच नाही तर त्याला वरून कापडाने घट्ट बांधून ठेवावे, जेणे करून त्यात डास शिरणार नाहीत व अंडी घालणार नाहीत.
२) जी भांडी धुण्यासाठी अडचणीत असतील त्या ठिकाणी डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे टाकावेत.
३) झोपतांना
मच्छरदाणीचा वापर करावा,
४) डासांना पळवून लावण्यासाठी, मच्छर अगरबत्ती, अगरबत्ती, लिक्वीड, वडी पेटवावीत,
५) संडासच्या टाकीवरील एअर पाईपला वर जाळी बांधावी,
६) दार-खिडक्यांना देखील जाळ्या लावाव्यात व संध्याकाळी लवकर दार-खिडक्या बंद कराव्यात.
७) कुणालाही अंगात ताप सोबत थंडी वाजून आल्यास, मळमळ होत असल्यास, तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवताप निदानासाठी जावे व निदान झाल्यानंतर तात्काळ गृहीत समुळ उपचार घेतल्याने हिवताप पूर्णपणे बरा होतो.
व हिवताप हा गृहीत उपचारने समूळपणे बरा होतो.
वरीलप्रमाणे सविस्तर मार्गदर्शन डॉ.दापते यांनी केले.
फोटो कँप्शन
कुष्ठरोग उप संचालक-डॉ. जयवंत मोरे,माता बाल संगोपन अधिकारी डॉ रमेश दापते, विजय देशमुख,जयंत पाटील, कांतीलाल पाटील, मोहन टेमकर आदी